शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
5
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
6
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
7
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
8
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
9
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
10
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
11
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
12
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
13
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...
14
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
15
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
16
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
17
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
18
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
19
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
20
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!

‘आघाडी’च्या जागी ‘युती’?

By admin | Updated: October 20, 2014 00:37 IST

भारतीय जनता पक्षाने हरियाणा विधानसभेत स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळविली असून, महाराष्ट्रात तो पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे

भारतीय जनता पक्षाने हरियाणा विधानसभेत स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळविली असून, महाराष्ट्रात तो पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. गेली पंधरा वर्षे महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर रखडलेला हा पक्ष पहिला क्रमांकावर नेण्यात त्याच्या राष्ट्रीय व प्रादेशिक पुढाऱ्यांनी जे यश मिळविले ते नि:संशय अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे. त्याचवेळी एवढी वर्षे राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेला आपला पक्ष चौथ्या क्रमांकापर्यंत खाली उतरविण्यात काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी जी राजकीय व बौद्धिक दिवाळखोरी उघड केली ती चिंताजनक आहे. ही निवडणूक आरंभापासून मतदाराच्या हाती होती. त्याने भाजपालाही त्याच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण बहुमत दिले नाही. परिणामी शिवसेनेसमोर याचक होऊन मदत मागण्याची पाळी त्याने त्या पक्षाच्या नेत्यांवरही आणली. ‘मीच मुख्यमंत्री’ अशी वल्गना करणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनाही त्याने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानायला लावले. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने भाजपाला आपला पाठिंबा आता आगंतूकपणेच जाहीर केला आहे. मात्र, तो घ्यायचा की नाही याचा विचार आम्ही करू, अशा शब्दांत भाजपाने त्याची बोळवणही तत्काळ केली आहे. या निवडणुकीवर लोकसभेच्या निकालांचाही परिणाम फारसा दिसला नाही. त्या निवडणुकीत विधानसभेच्या अडीचशेवर मतदारसंघांत भाजपा-शिवसेना युतीने विजयी मते मिळविली होती. तेवढे मतदारसंघ त्या दोन पक्षांना नंतरच्या फुटीनंतर आपल्या ताब्यात राखता आले नाही. मात्र, कोणत्याही एका पक्षाला बहुमत न देण्याच्या मतदारांच्या निर्णयामुळे भाजपा व शिवसेना यांना एकत्र येणे व त्यासाठी देवाण-घेवाण करणे आता आवश्यक झाले आहे. तशा वाटाघाटींनाही आता लवकरच सुरुवात होईल. आम्हाला चांगली आॅफर दिली गेली तर आम्ही युतीला तयार होऊ, अशी भाषा शिवसेनेच्या अनिल नाईकांनी उच्चारली, तर शिवसेना हा आमचा विरोधी पक्ष नव्हे, असे उद्गार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन पक्ष त्यांच्यातील कडव्या हेव्यादाव्यांमुळे एकत्र येणार नाहीत आणि आले तरी ते सत्तेवर जाण्याच्या स्थितीत नाहीत. या निकालाने स्पष्ट केलेली एक गोष्ट मात्र या दोन्ही पक्षांनी गंभीरपणे घ्यावी अशी आहे. त्या दोहोंवरही मतदारांचा राग आहे. तो ते इतकी वर्षे सत्तेवर राहिले एवढ्याचसाठी नाही तर या काळात त्यांनी जनतेबाबत दाखविलेली बेफिकिरी आणि त्यांच्यातल्या अनेकांना चढलेला सत्तेचा कैफ यावर आहे. त्याचमुळे कधी नव्हे एवढ्या मोठ्या संख्येने राज्यातले मंत्री पराभूत झाले आहेत. काँग्रेसचे नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, राजेंद्र दर्डा, नितीन राऊत आणि राजेंद्र मुळक यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे गणेश नाईक व अनिल देशमुख यासारखे बलाढ्य उमेदवार पार भुईसपाट झाले आहे. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अखेरच्या फेरीत फार थोड्या मताधिक्याने विजयी होऊ शकले आहे. महाराष्ट्र हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्याची समाजरचनाही काँग्रेस व राष्ट्रवादीला अनुकूल अशीच राहिली आहे. तरीही या प्रदेशाने त्या पक्षांना एवढी मोठी शिक्षा केली असेल तर तिची कारणे त्यांनी आपल्या राजकारणात व वर्तणुकीत शोधली पाहिजे. या निवडणुकीत काँग़्रेसच्या नेत्यांचे अस्तित्व फारसे जाणवले नाही. त्या पक्षाने ही निवडणूक लढविलीच नसावी, असे त्याचे प्रचारकाळातले वर्तन होते. राष्ट्रवादीचे तथाकथित राष्ट्रीय व प्रादेशिक पुढारीही आपआपल्या मतदारसंघांखेरीज फारसे कोठे फिरकताना दिसले नाहीत. याउलट भाजपाचे प्रादेशिक नेतेही त्यांचे मतदारसंघ सोडून राज्यभर प्रचार करताना आढळले. भाजपा हा पक्ष आरंभापासूनच या निवडणुकीत आत्मविश्वासाने उतरलेला दिसला. तर, शिवसेनाही पुरेशा उमेदीने तीत आल्याचे दिसले. काँग्रेसने मात्र ही निवडणूक आरंभापासूनच गमावल्याच्या मनोवृत्तीत लढविली. राष्ट्रवादीलाही आपल्या अपयशाविषयी आरंभापासूनच खात्री असावी असेच त्याच्या वागणुकीतून दिसले. लोकसभेच्या निवडणूक निकालापासून तयार झालेली काँग्रेस व राष्ट्रवादीमधील पराभूत मनोवृत्ती आणखी किती काळ टिकते ते आता पाहायचे. या मानसिकतेतून बाहेर पडून नव्याने उभारणी घेणे हे त्या दोन्ही पक्षांचे कर्तव्य आहे व ती लोकशाहीचीही मागणी आहे.