शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वपक्षीय ‘ठग्ज आॅफ अहमदनगर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 06:32 IST

सांगली, जळगावनंतर आता अहमदनगरवरही झेंडा फडकवून शहरी भागात आमचीच हवा आहे, हे दाखविण्याचा भाजपाचा आटोकाट प्रयत्न आहे.

- सुधीर लंके

विधिमंडळ अधिवेशनापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपाला ‘ठग्ज आॅफ महाराष्ट्र’ तर भाजपाने त्यांना ‘गँग आॅफ वासेपूर’ संबोधले. अहमदनगर महापालिकेची निवडणूक व येथील राजकारण पाहिले तर भाजपा-सेना व दोन्ही काँग्रेस या सर्वांना मिळून ‘गँग आॅफ वासेपूर’ व ‘ठग्ज आॅफ अहमदनगर’ या दोन्ही उपमा लागू पडतील, अशी परिस्थिती आहे.

महापालिकेच्या १७ प्रभागातील ६८ जागांसाठी रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी तब्बल ७१५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. या वेळी प्रथमच भाजपा-सेना स्वतंत्र लढत आहे. दोन्ही काँग्रेसने आघाडी केली आहे. सांगली, जळगावनंतर आता अहमदनगरवरही झेंडा फडकवून शहरी भागात आमचीच हवा आहे, हे दाखविण्याचा भाजपाचा आटोकाट प्रयत्न आहे. त्यासाठी खास मुख्यमंत्री लक्ष घालणार असल्याचे बोलले जाते. पण, भाजपाने ज्या पद्धतीने सुरुवात केली त्यात वेगळेपण व नावीन्य काहीच नाही. सोवळे खुंटीला टांगून मांसाहार करावा, अशीच त्यांची नीती दिसते. उमेदवारी देताना निष्ठा, सज्जनपणा, चारित्र्य हे न पाहता उमेदवाराकडील पैसा व नातेगोते हाच निकष भाजपानेही ठेवला. एका घरात दोन-दोन उमेदवार दिले. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला काँग्रेसचा माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर याच्या पाच समर्थकांना या पक्षाने एका रात्रीत उमेदवाऱ्या दिल्या. ‘आम्हाला फक्त विजय महत्त्वाचा आहे’ असे समर्थन त्याबाबत केले. निष्ठावंतांना बाजूला फेकले. त्यामुळे ‘आम्ही साधनसूचिता पाळतो’ हा भाजपाचा दावा फोल ठरतो.

केवळ आम्हीच ६८ जागांवर उमेदवार दिले असा दावा भाजपा करत होता. पण, खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र व सुनबार्इंचाच अर्ज बाद झाल्याने ते तोंडघशी पडले. गांधी यांना स्वत:च्या बंगल्याचे अतिक्रमण भोवले. या मुद्यांवरून शिवसेना आता भाजपाला घेरण्याचा प्रयत्न करेल. सेनेने ६० जागांवर उमेदवार दिले. पण, त्यांनीही उमेदवार आयात केले. ज्यांनी पक्षाला फसविले त्या ठगांना या पक्षाने उमेदवारी दिली. कारण त्यांच्याकडेही नव्या चेहऱ्यांचा दुष्काळ आहे.

जागावाटपात राष्ट्रवादीला ४३, तर काँग्रेसला २५ जागा आहेत. पण, काँग्रेसचे पाच उमेदवार ऐनवेळी भाजपात पळाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे यांना ‘अहमदनगर’ मतदारसंघातून खासदार व्हायचे आहे. पण, त्यांचा पक्ष सर्वात कमी जागांवर लढतो आहे. कोणत्याही पक्षाला न दुखावता जमेल तेवढे करा, अशी विखेंची पडखाऊ नीती दिसते. विखेंमुळे बाळासाहेब थोरातही शांत दिसतात.

विकासाचे सांगण्यासारखे मुद्दे कोणत्याच पक्षाकडे दिसत नाहीत. निवडणूक सुरू असताना गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे ६१९ जणांना प्रशासनाने हद्दपार व तडीपारीच्या नोटिसा काढल्या. त्यात आजी-माजी आमदार व सर्वपक्षीय नावे आहेत. ही शहरासाठीच एकप्रकारे नामुष्की आहे. निवडणुकीत तुम्हाला शहरात थांबता येणार नाही असा धब्बा ज्या लोकांवर आहे त्यांच्याकडेच शहराची सूत्रे जाणार हा केवढा मोठा विरोधाभास आहे.

या सगळ्या मुद्यावर सर्व पक्षांचे नेते मतदारांना काय उत्तर देणार? हे महत्त्वाचे आहे. नागरिक यापैकी कोणाला निवडणार याबद्दलही अर्थातच सर्वांना उत्सुकता आहे. पालकमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि सेनाप्रमुखही इतरवेळी शहरात लक्ष घालत नाहीत. त्यांना थेट निवडणुकीतच शहर आठवते, असा इतिहास आहे. शहर सर्वांनी फायद्यापुरते वापरले, अशी मतदारांची भावना झाली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका