शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सर्वं मधु।

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 04:31 IST

धूच्या वडिलांचे निधन झाले. अंत्येष्टी संस्कार तीर्थक्षेत्री करण्याचे ठरले. दिवस थंडीचे. सकाळी उठून तीर्थक्षेत्रावर तीनदा गार पाण्याचे स्नान. मधू पार गारठला. वडिलांचे और्ध्वदेहिक आपल्या हातून व्यवस्थित पार पडावे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी या हेतूने मधूने सर्व विधी व्यवस्थित केले. विधी चालू असताना पुरोहितांनी सर्वं मधु। सर्वं मधु।

- डॉ. गोविंद काळेमधूच्या वडिलांचे निधन झाले. अंत्येष्टी संस्कार तीर्थक्षेत्री करण्याचे ठरले. दिवस थंडीचे. सकाळी उठून तीर्थक्षेत्रावर तीनदा गार पाण्याचे स्नान. मधू पार गारठला. वडिलांचे और्ध्वदेहिक आपल्या हातून व्यवस्थित पार पडावे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी या हेतूने मधूने सर्व विधी व्यवस्थित केले. विधी चालू असताना पुरोहितांनी सर्वं मधु। सर्वं मधु। सर्वं मधु असे मधुकडून त्रिवार म्हणून घेतले. मधूला वाटले वडिलांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून भटजीनी ‘सर्वं मधु’ असे त्रिवार म्हणून घेतले. म्हणजे तुमचे सर्व काही मधूच आहे असा अर्थ मधूने काढला.मधु म्हणजे मध हा सर्वांना माहीत असणारा लौकिक अर्थ. देवपूजेमध्ये पंचामृत स्नान देवास घालताना ‘मधुस्नानं समर्पयामि’ असे म्हणून पळीतील मधाचा थेंब देवाच्या अंगावर घातला जातो. तर भा. रा. तांबेंच्या गीतात ‘मधु मागसी माझ्या सख्या परि। मधु घटची रिकामे पडती घरी’ असा संदर्भ येतो. जीवनात मधाची आवश्यकता फार आहे. एखादे काम होईना तर लावा साहेबांना मधाचे बोट म्हणजे लवकर काम फत्ते होईल, असे म्हटले जाई. म्हणजे कार्यपूर्तीसाठी मधाचे बोट पाहिजे तर.वैदिक ऋषींची तर प्रार्थनाच होती.‘‘मधु वाता ऋतायते मधुक्षरंति सिन्धव:’’ ऋग्वेदाच्या प्रथम मंडलातील ९०वे सूक्त. या ठिकाणी मधुचा अर्थ पोषक शक्ती, सुमधुर, सुखकर असा करण्यात आला आहे. मधुने आपल्या जीवनात कायमचेच घर केले आहे. मधुचा मधुकर महिमा भारतीय संस्कृतीने सर्वमान्य केला आहे. आचार्य विनोबा भावेंच्या लहानशा परंतु विचाराने परिप्लुत असलेल्या पुस्तकाचे नाव आहे मधुकर.मधूच्या वडिलांची अंत्येष्टी करणाऱ्या भटजींना ‘सर्वं मधु’ हे जे तुम्ही वदवून घेतले या ठिकाणी मधुचा अर्थ काय घ्यावयाचा असे आम्ही विचारले. तेव्हा ते म्हणाले तुम्ही अजून लहान आहात. आपल्या संस्कारांची व्यवस्था पूर्वजांनी मानवी कल्याण डोळ्यापुढे ठेवूनच केली हे नि:संशय सत्य अभ्यासाअंती स्वीकारावे लागते. ‘मधु’ म्हणजे ब्रह्म. ‘सर्वं मधु’ म्हणजे सर्व ब्रह्ममय आहे. मधुचा अलौकिक अर्थ पहिल्यांदाच कुणीतरी समजावून सांगितला होता. नाशवंत विश्वाच्या ठिकाणीसुद्धा पूर्वजांनी ब्रह्म पाहिले. ब्रह्म अनुभविले. ‘ऋषे: तु दर्शनात््’ अशी ऋषींची व्याख्या केली जाते. ब्रह्मैक्य भावच त्यांनी ऋचांतून गायिला. तो जर कळला तर ‘सर्वं मधु। सर्वं मधु। सर्वं मधु हेच गाणे विश्व आनंदाने गायील.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या