शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा विरुद्ध सारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:49 IST

पालघर जिल्हा निर्मितीनंतर जवळपास साडेतीन वर्षे अस्तित्वात नसलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता रंगात आली आहे.

पालघर जिल्हा निर्मितीनंतर जवळपास साडेतीन वर्षे अस्तित्वात नसलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता रंगात आली आहे. तीन आमदार व दोन खासदारांची प्रतिष्ठा पणाला लावणाºया या निवडणुकीनिमित्ताने ग्रामीण राजकारणाचा, खासकरून शेतकºयांच्या मनातील सरकारबद्दलच्या भावनेचा कल समजणार असल्याने तिला आजवर कधी नव्हते एवढे महत्त्व आले आहे. भिवंडीत सर्वाधिक जागा असल्याने तो तालुका आणि त्याखालोखाल शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या तालुक्यातील राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघाले आहे. वेगवेगळ्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न टोकदार बनले. शिवसेनेला साथसंगत करणाºया श्रमजीवी संघटनेला त्यांच्यापासून तोडून आपल्याकडे खेचत बेरजेच्या राजकारणात भाजपाने आघाडी घेतली. तसेच आक्रमकता दाखवत अन्य पक्षांत फोडाफोडी करून प्रभाव असलेल्या नेत्यांच्या पळवापळवीचा सिलसिला कायम ठेवल्याने इतर पक्ष सावध तर झालेच; पण त्यांनी आजवरचे सर्व मतभेद दूर सारत परस्परांना सहकार्य करून गरज भासेल तशा वेगवेगळ्या युती-आघाड्यांचे नवे पर्व ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात सुरू केले. भाजपा विरुद्ध सारे असेच या लढतींचे स्वरूप बनले. ग्रामीण राजकारणावरील आपला, आपल्या पक्षाचा, आपल्या चिन्हाचा ठसा पुसला जाऊ नये, याची काळजी प्रत्येक पक्ष घेत आला; पण यंदा त्याला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारिप, मनसे, सेक्यूलर आरपीआय अशा पक्षांनी परस्परांशी चर्चा करत उमेदवार दिले. एकीकडे हे राजकीय बदल होत असतानाच आपल्या आरक्षणात वाटेकरी निर्माण होईल, या अस्वस्थेतेपोटी कुणबी समाजही एकवटला. आगरी नेतृत्वाने वरचश्मा कायम राहील, याची तयारी केली. आदिवासींनी आजवरचा एकचएक आदेश न मानता अस्मितेचा हुंकार दिला. त्यातून ओलांडल्या गेलेल्या राजकीय लक्ष्मणरेषा व त्याला लाभलेली जातीय संघर्षाची किनार यामुळे येथील राजकारणाचा बाज बदलून गेला. रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्याच्या सोयी, शिक्षण अशा मुद्द्यांपेक्षा पक्षीय कुरघोडीभोवती ही निवडणूक फिरण्यास सुरुवात झाली आहे. दोन वर्षांनी होणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सध्या सर्वच पक्षांची चाचपणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीने मतदारांचा कौल अजमावण्याची संधी राजकारण्यांना उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच तिच्या निकालातून काय हाती लागते यावर सर्व पक्षांचे, त्यातील इच्छुकांचे व निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराच्या तयारीत असलेल्यांचे लक्ष आहे.