शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

भाजपा विरुद्ध सारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:49 IST

पालघर जिल्हा निर्मितीनंतर जवळपास साडेतीन वर्षे अस्तित्वात नसलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता रंगात आली आहे.

पालघर जिल्हा निर्मितीनंतर जवळपास साडेतीन वर्षे अस्तित्वात नसलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता रंगात आली आहे. तीन आमदार व दोन खासदारांची प्रतिष्ठा पणाला लावणाºया या निवडणुकीनिमित्ताने ग्रामीण राजकारणाचा, खासकरून शेतकºयांच्या मनातील सरकारबद्दलच्या भावनेचा कल समजणार असल्याने तिला आजवर कधी नव्हते एवढे महत्त्व आले आहे. भिवंडीत सर्वाधिक जागा असल्याने तो तालुका आणि त्याखालोखाल शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या तालुक्यातील राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघाले आहे. वेगवेगळ्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न टोकदार बनले. शिवसेनेला साथसंगत करणाºया श्रमजीवी संघटनेला त्यांच्यापासून तोडून आपल्याकडे खेचत बेरजेच्या राजकारणात भाजपाने आघाडी घेतली. तसेच आक्रमकता दाखवत अन्य पक्षांत फोडाफोडी करून प्रभाव असलेल्या नेत्यांच्या पळवापळवीचा सिलसिला कायम ठेवल्याने इतर पक्ष सावध तर झालेच; पण त्यांनी आजवरचे सर्व मतभेद दूर सारत परस्परांना सहकार्य करून गरज भासेल तशा वेगवेगळ्या युती-आघाड्यांचे नवे पर्व ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात सुरू केले. भाजपा विरुद्ध सारे असेच या लढतींचे स्वरूप बनले. ग्रामीण राजकारणावरील आपला, आपल्या पक्षाचा, आपल्या चिन्हाचा ठसा पुसला जाऊ नये, याची काळजी प्रत्येक पक्ष घेत आला; पण यंदा त्याला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारिप, मनसे, सेक्यूलर आरपीआय अशा पक्षांनी परस्परांशी चर्चा करत उमेदवार दिले. एकीकडे हे राजकीय बदल होत असतानाच आपल्या आरक्षणात वाटेकरी निर्माण होईल, या अस्वस्थेतेपोटी कुणबी समाजही एकवटला. आगरी नेतृत्वाने वरचश्मा कायम राहील, याची तयारी केली. आदिवासींनी आजवरचा एकचएक आदेश न मानता अस्मितेचा हुंकार दिला. त्यातून ओलांडल्या गेलेल्या राजकीय लक्ष्मणरेषा व त्याला लाभलेली जातीय संघर्षाची किनार यामुळे येथील राजकारणाचा बाज बदलून गेला. रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्याच्या सोयी, शिक्षण अशा मुद्द्यांपेक्षा पक्षीय कुरघोडीभोवती ही निवडणूक फिरण्यास सुरुवात झाली आहे. दोन वर्षांनी होणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सध्या सर्वच पक्षांची चाचपणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीने मतदारांचा कौल अजमावण्याची संधी राजकारण्यांना उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच तिच्या निकालातून काय हाती लागते यावर सर्व पक्षांचे, त्यातील इच्छुकांचे व निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराच्या तयारीत असलेल्यांचे लक्ष आहे.