शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

भाजपा विरुद्ध सारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:49 IST

पालघर जिल्हा निर्मितीनंतर जवळपास साडेतीन वर्षे अस्तित्वात नसलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता रंगात आली आहे.

पालघर जिल्हा निर्मितीनंतर जवळपास साडेतीन वर्षे अस्तित्वात नसलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता रंगात आली आहे. तीन आमदार व दोन खासदारांची प्रतिष्ठा पणाला लावणाºया या निवडणुकीनिमित्ताने ग्रामीण राजकारणाचा, खासकरून शेतकºयांच्या मनातील सरकारबद्दलच्या भावनेचा कल समजणार असल्याने तिला आजवर कधी नव्हते एवढे महत्त्व आले आहे. भिवंडीत सर्वाधिक जागा असल्याने तो तालुका आणि त्याखालोखाल शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या तालुक्यातील राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघाले आहे. वेगवेगळ्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न टोकदार बनले. शिवसेनेला साथसंगत करणाºया श्रमजीवी संघटनेला त्यांच्यापासून तोडून आपल्याकडे खेचत बेरजेच्या राजकारणात भाजपाने आघाडी घेतली. तसेच आक्रमकता दाखवत अन्य पक्षांत फोडाफोडी करून प्रभाव असलेल्या नेत्यांच्या पळवापळवीचा सिलसिला कायम ठेवल्याने इतर पक्ष सावध तर झालेच; पण त्यांनी आजवरचे सर्व मतभेद दूर सारत परस्परांना सहकार्य करून गरज भासेल तशा वेगवेगळ्या युती-आघाड्यांचे नवे पर्व ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात सुरू केले. भाजपा विरुद्ध सारे असेच या लढतींचे स्वरूप बनले. ग्रामीण राजकारणावरील आपला, आपल्या पक्षाचा, आपल्या चिन्हाचा ठसा पुसला जाऊ नये, याची काळजी प्रत्येक पक्ष घेत आला; पण यंदा त्याला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारिप, मनसे, सेक्यूलर आरपीआय अशा पक्षांनी परस्परांशी चर्चा करत उमेदवार दिले. एकीकडे हे राजकीय बदल होत असतानाच आपल्या आरक्षणात वाटेकरी निर्माण होईल, या अस्वस्थेतेपोटी कुणबी समाजही एकवटला. आगरी नेतृत्वाने वरचश्मा कायम राहील, याची तयारी केली. आदिवासींनी आजवरचा एकचएक आदेश न मानता अस्मितेचा हुंकार दिला. त्यातून ओलांडल्या गेलेल्या राजकीय लक्ष्मणरेषा व त्याला लाभलेली जातीय संघर्षाची किनार यामुळे येथील राजकारणाचा बाज बदलून गेला. रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्याच्या सोयी, शिक्षण अशा मुद्द्यांपेक्षा पक्षीय कुरघोडीभोवती ही निवडणूक फिरण्यास सुरुवात झाली आहे. दोन वर्षांनी होणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सध्या सर्वच पक्षांची चाचपणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीने मतदारांचा कौल अजमावण्याची संधी राजकारण्यांना उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच तिच्या निकालातून काय हाती लागते यावर सर्व पक्षांचे, त्यातील इच्छुकांचे व निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराच्या तयारीत असलेल्यांचे लक्ष आहे.