शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भाजपा विरुद्ध सारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:49 IST

पालघर जिल्हा निर्मितीनंतर जवळपास साडेतीन वर्षे अस्तित्वात नसलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता रंगात आली आहे.

पालघर जिल्हा निर्मितीनंतर जवळपास साडेतीन वर्षे अस्तित्वात नसलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता रंगात आली आहे. तीन आमदार व दोन खासदारांची प्रतिष्ठा पणाला लावणाºया या निवडणुकीनिमित्ताने ग्रामीण राजकारणाचा, खासकरून शेतकºयांच्या मनातील सरकारबद्दलच्या भावनेचा कल समजणार असल्याने तिला आजवर कधी नव्हते एवढे महत्त्व आले आहे. भिवंडीत सर्वाधिक जागा असल्याने तो तालुका आणि त्याखालोखाल शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या तालुक्यातील राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघाले आहे. वेगवेगळ्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न टोकदार बनले. शिवसेनेला साथसंगत करणाºया श्रमजीवी संघटनेला त्यांच्यापासून तोडून आपल्याकडे खेचत बेरजेच्या राजकारणात भाजपाने आघाडी घेतली. तसेच आक्रमकता दाखवत अन्य पक्षांत फोडाफोडी करून प्रभाव असलेल्या नेत्यांच्या पळवापळवीचा सिलसिला कायम ठेवल्याने इतर पक्ष सावध तर झालेच; पण त्यांनी आजवरचे सर्व मतभेद दूर सारत परस्परांना सहकार्य करून गरज भासेल तशा वेगवेगळ्या युती-आघाड्यांचे नवे पर्व ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात सुरू केले. भाजपा विरुद्ध सारे असेच या लढतींचे स्वरूप बनले. ग्रामीण राजकारणावरील आपला, आपल्या पक्षाचा, आपल्या चिन्हाचा ठसा पुसला जाऊ नये, याची काळजी प्रत्येक पक्ष घेत आला; पण यंदा त्याला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारिप, मनसे, सेक्यूलर आरपीआय अशा पक्षांनी परस्परांशी चर्चा करत उमेदवार दिले. एकीकडे हे राजकीय बदल होत असतानाच आपल्या आरक्षणात वाटेकरी निर्माण होईल, या अस्वस्थेतेपोटी कुणबी समाजही एकवटला. आगरी नेतृत्वाने वरचश्मा कायम राहील, याची तयारी केली. आदिवासींनी आजवरचा एकचएक आदेश न मानता अस्मितेचा हुंकार दिला. त्यातून ओलांडल्या गेलेल्या राजकीय लक्ष्मणरेषा व त्याला लाभलेली जातीय संघर्षाची किनार यामुळे येथील राजकारणाचा बाज बदलून गेला. रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्याच्या सोयी, शिक्षण अशा मुद्द्यांपेक्षा पक्षीय कुरघोडीभोवती ही निवडणूक फिरण्यास सुरुवात झाली आहे. दोन वर्षांनी होणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सध्या सर्वच पक्षांची चाचपणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीने मतदारांचा कौल अजमावण्याची संधी राजकारण्यांना उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच तिच्या निकालातून काय हाती लागते यावर सर्व पक्षांचे, त्यातील इच्छुकांचे व निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराच्या तयारीत असलेल्यांचे लक्ष आहे.