शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

‘जीएमसी’त कुणाचा धाक उरलाय की नाही?

By किरण अग्रवाल | Updated: March 19, 2023 11:30 IST

Akola GMC : अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अलीकडेच घडलेल्या अशा प्रकाराने तेथील अनागोंदीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

- किरण अग्रवाल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आत्महत्या केलेल्या भगिनीचा मृतदेह दोन-दोन दिवस तसाच लटकलेला राहतो, हा अव्यवस्थेचा व असंवेदनशीलतेचा कळस झाला. कामकाजातील इतके दुर्लक्ष माफीयोग्य ठरू नये.

सरकारी रुग्णालयांमधील अव्यवस्था हा आता नवीन मुद्दा राहिलेला नाही; मात्र या अव्यवस्थेबरोबरच तेथे घडून आलेल्या आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटनेकडेही दुर्लक्षच होत असेल तर ही असंवेदनशीलता गंभीरच म्हणायला हवी. अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अलीकडेच घडलेल्या अशा प्रकाराने तेथील अनागोंदीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका भगिनीने मुलगी झाल्यावर शौचालयात जाऊन आत्महत्या केली, तिचा मृतदेह दोन दिवस लटकलेलाच राहिला. जुन्या पेन्शनसाठीच्या संपात कर्मचारी सहभागी झाल्याने शौचालयाकडे सफसफाईसाठी कोणी फिरकले नाही, त्यामुळे ही घटना उशिरा निदर्शनास आली अशी मखलाशी आता केली जात आहे, पण अशा गंभीर घटनांकडेही इतके दुर्लक्ष होणार असेल तर अन्य बाबींत काय? असा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित व्हावा. आमदार रणधीर सावरकर यांना हा विषय थेट विधानसभेत उपस्थित करण्याची वेळ आली, इतका निर्ढावलेपणा येथील व्यवस्थेत आला असेल तर ‘जीएमसी’त कुणाचा धाक उरलाय की नाही? असाही प्रश्न उपस्थित व्हावा.

बरे, हे असे पहिल्यांदाच होते आहे असेही नाही. मागे येथे एक बोगस डॉक्टर ॲप्रन घालून वॉर्डात फिरल्याचे व त्याने एका रुग्णाच्या नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे प्रकरणही घडले आहे. त्याबद्दल पोलिसांत अधिकृतपणे गुन्हाही दाखल करण्यात आला होता. रुग्णांच्या होत असलेल्या हेळसांडबद्दल तर विचारू नका इतक्या तक्रारी व ओरड आहे. स्त्रीरोग विभागात प्रसूतीसाठी आलेल्या भगिनींना खाटा उपलब्ध होत नाहीत म्हणून चक्क फरशीवर झोपून राहावे लागते, अशी स्थिती कधीकधी बघावयास मिळते. अतिदक्षता विभागातील रुग्णांना इकडून तिकडे न्यायचे म्हटले तर स्ट्रेचर ओढायला कर्मचारी नसतात, रुग्णांचे नातेवाईकच अनेकदा ती जबाबदारी पार पाडताना दिसतात. तक्रारींचा पाढाच वाचायचा तर ती यादी आणखीही मोठी होईल, पण येथे कुणाचे नियंत्रणच उरलेले नाही, हेच यातून निदर्शनास यावे.

मागे बच्चू कडू पालकमंत्री असताना या रुग्णालयातील खानावळीचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवले जात नाही म्हणून त्यांनी एकाच्या कानशिलात लगावली होती. बरीचशी औषधी बाहेरून आणावी लागतात, येथे दलाली वाढली, असा आरोप त्यावेळी झाला होता व दलाल कोण आहेत त्यांची नावेही सांगितली गेली होती. पण, दिवस उलटले आणि आता पुन्हा तेच दलाल तेथे सक्रिय झाल्याची ओरड होत आहे. दोन-चार वर्षांपूर्वी या रुग्णालयातील रक्त संकलनाचे कामकाज राज्यात अव्वल ठरले होते, आता त्याकडेही दुर्लक्ष झाले असून, रक्तदान शिबिरेच होताना दिसत नाहीत; उलट गेल्या काही महिन्यांपूर्वी रक्त चाचणीच चुकीच्या पद्धतीने केली गेल्याचे प्रकरण समोर आले होते. थोडक्यात, या सरकारी रुग्णालयात रामभरोसे कारभार सुरू असून कोणी वालीच उरला नसल्याचे चित्र एकापाठोपाठ एक उघडकीस येणाऱ्या प्रकरणांमुळे समोर आले आहे.

कोरोनाच्या संकटकाळात याच रुग्णालयाने खूप मोठा आधार जनसामान्यांना दिला होता. वैद्यकीय व अवैद्यकीय वर्गानेही स्वतःच्या जिवावर उदार होत रुग्णसेवा करून एक चांगला आदर्श घालून दिला होता. पण, अलीकडे असे काय झाले, की याच सेवार्थींना आरोप सहन करावे लागत आहेत, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. कमी मनुष्यबळात वाढती रुग्णसेवा सुरळीत ठेवणाऱ्या अनुभवी अधिकाऱ्यांना बाजूला सारून अनुभव नसलेल्यांना नेमणुका दिल्याने ही घडी विस्कटते आहे का, हे तपासले जाण्याची गरज आहे. गेल्यावर्षीच येथील अधिष्ठातांवर मनमानी व हुकूमशाहीचा आरोप करणारी तक्रार वरिष्ठांकडे केली गेल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी आरंभिली गेली होती. पुढे त्या चौकशीचे काय झाले, हे देखील गुलदस्त्यातच राहिले.

सारांशात, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील अव्यवस्था पुन्हा एकदा समोर आली असून, ती दूर करण्याबद्दल तातडीने व गंभीरपणे पावले उचलली जाणे गरजेचे बनले आहे. अकोल्यास प्राप्त ‘मेडिकल हब’चा लौकिक टिकवून ठेवायचा असेल तर ते गरजेचे आहे.

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला