शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आराखड्याचा ‘आखाडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:10 IST

एकवेळा स्थगित व तीनवेळा मुदतवाढ मिळवून २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठी मुंबईच्या विकासाला दिशा देणारा आराखडा तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नुकताच महापालिकेच्या महासभेत मंजूर झाला.

एकवेळा स्थगित व तीनवेळा मुदतवाढ मिळवून २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठी मुंबईच्या विकासाला दिशा देणारा आराखडा तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नुकताच महापालिकेच्या महासभेत मंजूर झाला. यापूर्वी १९६४ व १९९१ असे दोन आराखडे अमलात आले आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने शहरातील पायाभूत व नागरी सुविधांचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या उद्दिष्टांनी प्रत्येक २० वर्षांनी विकास आराखडा तयार होत असतो. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांसाठी मोकळ्या जागांवर आरक्षण, मूलभूत सुविधांकरिता तरतूद आदी शिफारशी करण्यात येतात. पहिल्यांदाच नागरिकांच्या सहभागातून विकास आराखडा साकार झाला आहे. यंदाचा आराखडा मुंबईचा कायापालट करण्याची हमी देत असला तरी पहिल्या दोन आराखड्याच्या अंमलबजावणीने घोर निराशा केली. जेमतेम २० टक्क्यांपर्यंतच या आराखड्यानुसार मुंबईचा विकास झाला. त्यामुळे जागतिक दर्जाच्या या शहराचा हवा तसा विकास झाल्याचे दिसून येत नाही. पुढील २० वर्षांचा हा आराखडा मुंबईला विकसित करण्याचे लक्ष्य ठेवून आहे. मात्र राजकीय वादामुळे हा आराखडा अंमलबजावणीपूर्वीच अडचणींचा आखाडा बनला. मेट्रो रेल्वे हा भाजपाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, यामुळे मेट्रोची गाडी रुळावर आणण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र यासाठी गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत असलेला मुंबईतील सर्वांत मोठ्या हरित पट्ट्यावर कुºहाड पडणार आहे. मेट्रो रेल्वे मुंबईचा प्रवास वेगवान करेल. पण मुंबईतील वृक्षसंपदा यासाठी नष्ट करून पर्यावरण धोक्यात आणणार का? यावर वाद सुरू आहे. राजकीय प्रतिस्पर्धी भाजपाला मात देण्यासाठी शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरला आहे. विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी एक लाख कोटी रुपये खर्च येईल. यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात किमान चार ते पाच हजार कोटी तरतूद होणे आवश्यक आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करून विकासाच्या मार्गावर पहिले पाऊल टाकले आहे. मात्र तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या राजकीय वादाने आराखड्याचेच नियोजन बिघडवले. आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडचे आरक्षण वगळून शिवसेनेने हा आराखडा महासभेत मंजूर केला. मात्र राज्यात भाजपाची सत्ता असल्याने शिवसेनेची खेळी उधळून लावण्यासाठी पुन्हा या आराखड्याची मोडतोड होण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे तीन वर्षे रखडूनही विकासाचे स्वप्न साकार होण्याचे चिन्ह तूर्त तरी दिसत नाही. त्यामुळे मुंबईकर या आराखड्यावरून रंगलेल्या आखाड्याकडे रंजक नजरेने पाहात आहेत. त्यांच्याही करमणुकीत भर पडते आहे, हे मात्र तूर्त खरे.