शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

आराखड्याचा ‘आखाडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:10 IST

एकवेळा स्थगित व तीनवेळा मुदतवाढ मिळवून २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठी मुंबईच्या विकासाला दिशा देणारा आराखडा तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नुकताच महापालिकेच्या महासभेत मंजूर झाला.

एकवेळा स्थगित व तीनवेळा मुदतवाढ मिळवून २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठी मुंबईच्या विकासाला दिशा देणारा आराखडा तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नुकताच महापालिकेच्या महासभेत मंजूर झाला. यापूर्वी १९६४ व १९९१ असे दोन आराखडे अमलात आले आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने शहरातील पायाभूत व नागरी सुविधांचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या उद्दिष्टांनी प्रत्येक २० वर्षांनी विकास आराखडा तयार होत असतो. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांसाठी मोकळ्या जागांवर आरक्षण, मूलभूत सुविधांकरिता तरतूद आदी शिफारशी करण्यात येतात. पहिल्यांदाच नागरिकांच्या सहभागातून विकास आराखडा साकार झाला आहे. यंदाचा आराखडा मुंबईचा कायापालट करण्याची हमी देत असला तरी पहिल्या दोन आराखड्याच्या अंमलबजावणीने घोर निराशा केली. जेमतेम २० टक्क्यांपर्यंतच या आराखड्यानुसार मुंबईचा विकास झाला. त्यामुळे जागतिक दर्जाच्या या शहराचा हवा तसा विकास झाल्याचे दिसून येत नाही. पुढील २० वर्षांचा हा आराखडा मुंबईला विकसित करण्याचे लक्ष्य ठेवून आहे. मात्र राजकीय वादामुळे हा आराखडा अंमलबजावणीपूर्वीच अडचणींचा आखाडा बनला. मेट्रो रेल्वे हा भाजपाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, यामुळे मेट्रोची गाडी रुळावर आणण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र यासाठी गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत असलेला मुंबईतील सर्वांत मोठ्या हरित पट्ट्यावर कुºहाड पडणार आहे. मेट्रो रेल्वे मुंबईचा प्रवास वेगवान करेल. पण मुंबईतील वृक्षसंपदा यासाठी नष्ट करून पर्यावरण धोक्यात आणणार का? यावर वाद सुरू आहे. राजकीय प्रतिस्पर्धी भाजपाला मात देण्यासाठी शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरला आहे. विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी एक लाख कोटी रुपये खर्च येईल. यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात किमान चार ते पाच हजार कोटी तरतूद होणे आवश्यक आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करून विकासाच्या मार्गावर पहिले पाऊल टाकले आहे. मात्र तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या राजकीय वादाने आराखड्याचेच नियोजन बिघडवले. आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडचे आरक्षण वगळून शिवसेनेने हा आराखडा महासभेत मंजूर केला. मात्र राज्यात भाजपाची सत्ता असल्याने शिवसेनेची खेळी उधळून लावण्यासाठी पुन्हा या आराखड्याची मोडतोड होण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे तीन वर्षे रखडूनही विकासाचे स्वप्न साकार होण्याचे चिन्ह तूर्त तरी दिसत नाही. त्यामुळे मुंबईकर या आराखड्यावरून रंगलेल्या आखाड्याकडे रंजक नजरेने पाहात आहेत. त्यांच्याही करमणुकीत भर पडते आहे, हे मात्र तूर्त खरे.