शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

वेध - अजातांची ‘जात’ कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:12 IST

जातीपासून मुक्त होण्यासाठी गणपती महाराजांनी अजात पंथ स्थापन केला. पण, या पंथाची ‘जात’ म्हणून सरकार दरबारी नोंद होत आहे. महाराजांच्या अनुयायांचा संघर्ष यासाठीच आहे.

 - गजानन जानभोरशंभर वर्षांपूर्वी गावखेड्यातला एक निरक्षर माणूस अस्पृश्यांना गावातील मंदिरात घेऊन जाण्यासाठी धडपडतो, जातीव्यवस्था, रूढीपरंपरेविरुद्ध पेटून उठतो, विधवेशी आंतरजातीय विवाह करतो, गुलामीचे प्रतीक असलेले मंगळसूत्र तोडून फेकतो आणि बांगड्या फोडायला लावतो. धर्ममार्तंडांना सहन होत नाही. ते चवताळतात, त्याला मारून टाकण्याचे प्रयत्न होतात, बहिष्कृतही केले जाते. शेवटी तो बंड करतो आणि सहका-यांना घेऊन जातीच्या बाहेर पडतो. त्याच्या मागोमाग हजारो माणसे येतात. त्यातूनच ‘अजात’ नावाचा एक संप्रदाय जन्मास येतो. महाराष्ट्राच्या समाज परिवर्तनाच्या इतिहासात मात्र त्या निरक्षर माणसाच्या क्रांतीची कुठेही नोंद होत नाही, त्याची दखलही घ्यावीशी कुणाला वाटत नाही. या क्रांतिकारकाला असे बेदखल का केले गेले, हा प्रश्न नेहमी अस्वस्थ करीत असतो.अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर या खेड्यातील एका कर्त्या सुधारकाच्या संघर्षाचा हा उपेक्षित इतिहास आहे. गणपती महाराज हे त्यांचे नाव. परवा गणपती महाराजांची पणती सुनयना अजात भेटली. पणजोबांच्या कार्याचा प्रसार व्हावा आणि त्यांनी स्थापन केलेला अजात संप्रदाय टिकून रहावा, यासाठी ती तळमळत असते. गणपती महाराज म्हणायचे, ‘निसर्गाने दोनच जाती निर्माण केल्या. एक स्त्री आणि दुसरी पुरुष, त्यामुळे माणसाने निर्माण केलेल्या जाती-पोटजाती या शोषणाची व्यवस्था निर्माण करतात’. म्हणून त्यांनी ही व्यवस्थाच झुगारून दिली. गणपती महाराज पंढरपूरची वारी नियमित करायचे. ‘वारी करून गावात परतल्यानंतर वारकरी पुन्हा जातीभेदात गुरफटतात. मग या वारीला अर्थ काय?’, महाराज सतत अस्वस्थ राहायचे. ‘मग या जातीलाच मूठमाती द्यायची’... गणपती महाराजांनी गावातील मित्रांना बोलावले, ‘आजपासून आपल्या आयुष्यातून जात कायमची हद्दपार’... कोण-कोण होते यात? तेली, कुणबी, माळी, गोंड, महार, लोहार, धनगर आणि ब्राह्मणही. सुरुवातीला विरोध आणि हेटाळणीही झाली. नंतर अनुयायी वाढत गेले. गणपती महाराजांनी या समुदायाला नाव दिले ‘अजात’. हाच तो संप्रदाय. या पंथीयांनी घरावर पांढरे झेंडे फडकावले. श्वेत वस्त्र परिधान करायला सुरुवात केली. आंतरजातीय विवाह सुरू केले. सर्वांनी मिळून जात अशी कायमची फेकून दिली. गावातील मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. महाराजांनी सत्याग्रह केला. घरावर दगड-धोंडे आले पण खचले नाहीत. शेवटी एके दिवशी अस्पृश्यांना घेऊन ते मंदिरात गेले आणि विठोबाची पूजा केली. ही गोष्ट १९२९ ची. वि.दा. सावरकरांनी रत्नागिरीतील पतीत पावन मंदिर दलितांसाठी खुले केले ते वर्ष १९३१. साने गुरुजींनी पंढरपुरातील मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा, यासाठी आमरण उपोषण केले ते साल १९४६. सावरकर, साने गुरुजींच्या पूर्वी महाराजांनी अस्पृश्यांसाठी हा सत्याग्रह केला. पण, इतिहासात नोंद सावरकर, साने गुुरुजींचीच झाली. गणपती महाराज इथेही उपेक्षित राहिले.गणपती महाराजांनी आयुष्यभर विवेकाची कास घट्ट धरून ठेवली. अमरावतीत अस्पृश्यता निवारण परिषद झाली. त्यात त्यांची भूमिका मोलाची होती. एक निरक्षर माणूस एवढी मोठी सामाजिक क्रांती घडवून आणतो, ही गोष्ट परिषदेत उपस्थित असलेल्या देशभरातील कार्यकर्त्यांसाठी अद्भूत होती. निरक्षरतेचा विज्ञानवादाशी तसा काहीच संबंध नसतो, हे सत्य भूत आणि वर्तमानालाही लागू पडते. विजय भटकरांसारखी प्रज्ञावान माणसे संशोधक असूनही अंधश्रद्ध असतात. निर्मला सीतारामन पुरोहिताकडून कर्मकांड केल्याशिवाय संरक्षण मंत्रिपद स्वीकारत नाहीत. दुसºया जातीची आहे म्हणून पुण्याच्या उच्च विद्याविभूषित महिलेचे सोवळे मोडते. पण गाडगेबाबा, गणपती महाराजांसारखी माणसे अक्षरशून्य असूनही आयुष्यभर डोळस राहतात. शेवटी अंत:स्फूर्तीच माणसाला घडवत असते. ती कुठल्याही जाती-धर्मातून येत नाही. ती उपजत असते आणि वेदनेतूनही येत असते. या वेदना ज्ञानेश्वर-तुकारामाला जशा भोगाव्या लागतात तशाच मरणप्राय कळा सावता माळी, चोखोबालाही सोसाव्या लागतात. जातीपासून मुक्त होण्यासाठी महाराजांनी अजात पंथ स्थापन केला. पण, या पंथाची ‘जात’ म्हणून सरकार दरबारी नोंद होत आहे. महाराजांच्या अनुयायांचा संघर्ष यासाठीच आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या क्रांतीचा अभिमान बाळगायचा की वैषम्य अशा कात्रीत ही माणसे सापडली आहेत. विदर्भातील एका छोट्याशा गावात शतकापूर्वी जाती व्यवस्थेविरुद्ध सुरू झालेल्या संघर्र्षाची ही अशी कहाणी आहे.

टॅग्स :Indiaभारत