शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हवाई प्रवास सुखकर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 18:19 IST

हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास करता आला पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे, त्यासाठी केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली.

हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास करता आला पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे, त्यासाठी केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राज्यातील १० शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात जळगावचाही समावेश आहे. गतवर्षी २३ डिसेंबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवेला प्रारंभ झाला. जळगावकरांचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण झाले; मात्र आतापर्यंतचा प्रवास अडथळ्यांचाच राहिला आहे. विमानसेवेच्या अगदी पहिल्या दिवसापासून विमानसेवेला विलंब झाला. मुंबईहून जळगावात कधीच वेळेवर विमान पोहचले नाही, ही परपंरा आजतागायत कायम आहे. मुंबई विमानतळावर दर अर्ध्या सेकंदाला एक विमान येत असते, दिवसभरात साधारणत: ९९८ विमानांची ये-जा असते. त्यामुळे प्रादेशिक विमानसेवेसाठी लवकर स्लॉट उपलब्ध होत नसल्याने विमानाला विलंब होत असल्याचे कारण सांगितले जाते. लहान शहरे मोठ्या शहरांशी जोडून त्यांचा विकास करण्यासाठी जर केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली आहे तर स्लॉटची अडचण यायलाच नको. कारण ही योजना सुरू करण्यापूर्वीच या अडचणीवर मार्ग काढणे आवश्यक होते. एअर डेक्कन या विमान कंपनीचे संचालक कॅप्टन गोपीचंद यांनीसुद्धा मुंबई विमानतळावर प्रचंड वर्दळ असल्याने २५ टक्के रिजनल कनेक्टिव्हिटी ‘उडान’साठी राखीव ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगीच व्यक्त केली होती. त्यांची ही अपेक्षा केंद्र शासनाने अद्यापही पूर्ण केली नसल्याचे दिसून येते. ती पूर्ण केली असती तर जळगावात दोन ते चार तास विलंबाने विमान पोहचले नसते. स्लॉटची अडचण चार महिन्यांपासून कायम आहे. जळगावातील उद्योजक, व्यापारी, अधिकारी सकाळी लवकर मुंबईला पोहचून दिवसभर काम आटोपून रात्री जळगावात पोहचावेत, वेळेची बचत व्हावी, ही विमानसेवेद्वारे अपेक्षा होती, मात्र जळगावकरांचे हे स्वप्न अद्याप अपूर्णच आहे. सुरुवातीला दुपारी १ पर्यंत विमान पोहचायचे. त्यानंतर स्लॉटच उपलब्ध नसल्याने व काही इतर अडचणींमुळे विमानसेवा १४ मार्चपासून तर १९ एप्रिलपर्यंत म्हणजेच तब्बल ३७ दिवस बंद होती. आता २० एप्रिलपासून सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मंगळवार ते गुरुवार असे तीन दिवस जळगावहून मुंबईला जाण्यासाठी वेळ सोयीची आहे. मात्र शुक्रवार ते रविवारची वेळ जळगावकरांसाठी गैरसोयीची असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. लोकप्रतिनिधींनी मुंबई विमानतळावरील २५ टक्के रिजनल कनेक्टिव्हिटी राखीव ठेवण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. जोपर्यंत ही मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत जळगावकरांचा हवाई प्रवास अडथळ्यांचाच राहणार असल्याचे दिसते. विमानास विलंब होत असला तरी ही सेवा अखंडपणे सुरू रहावी यासाठी प्रवासी जळगाव विमानतळावर तास्न तास विमानाची प्रतीक्षा करीत बसतात. जैन उद्योग समूहाने तर सहा महिन्यांची २५ टक्के तिकिटे आगावू घेतली असून विमानसेवेच्या पहिल्याच दिवशी सात लाखाचा धनादेश ‘एअर डक्कन’ला दिला आहे. जळगावकरांच्या या सहकार्याला केंद्र शासनाने प्रतिसाद देणे आवश्यक आहे, तरच उडान योजना यशस्वी होईल.

टॅग्स :JalgaonजळगावAirportविमानतळ