शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण...
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
4
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
5
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
6
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
7
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
8
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
9
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
10
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
11
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
12
"मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे, पण इंडस्ट्रीत एकटा लढलो", शाहिद कपूर स्पष्टच बोलला
13
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
14
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
15
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
16
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
17
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
18
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
19
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
20
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

हवाई प्रवास सुखकर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 18:19 IST

हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास करता आला पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे, त्यासाठी केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली.

हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास करता आला पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे, त्यासाठी केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राज्यातील १० शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात जळगावचाही समावेश आहे. गतवर्षी २३ डिसेंबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवेला प्रारंभ झाला. जळगावकरांचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण झाले; मात्र आतापर्यंतचा प्रवास अडथळ्यांचाच राहिला आहे. विमानसेवेच्या अगदी पहिल्या दिवसापासून विमानसेवेला विलंब झाला. मुंबईहून जळगावात कधीच वेळेवर विमान पोहचले नाही, ही परपंरा आजतागायत कायम आहे. मुंबई विमानतळावर दर अर्ध्या सेकंदाला एक विमान येत असते, दिवसभरात साधारणत: ९९८ विमानांची ये-जा असते. त्यामुळे प्रादेशिक विमानसेवेसाठी लवकर स्लॉट उपलब्ध होत नसल्याने विमानाला विलंब होत असल्याचे कारण सांगितले जाते. लहान शहरे मोठ्या शहरांशी जोडून त्यांचा विकास करण्यासाठी जर केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली आहे तर स्लॉटची अडचण यायलाच नको. कारण ही योजना सुरू करण्यापूर्वीच या अडचणीवर मार्ग काढणे आवश्यक होते. एअर डेक्कन या विमान कंपनीचे संचालक कॅप्टन गोपीचंद यांनीसुद्धा मुंबई विमानतळावर प्रचंड वर्दळ असल्याने २५ टक्के रिजनल कनेक्टिव्हिटी ‘उडान’साठी राखीव ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगीच व्यक्त केली होती. त्यांची ही अपेक्षा केंद्र शासनाने अद्यापही पूर्ण केली नसल्याचे दिसून येते. ती पूर्ण केली असती तर जळगावात दोन ते चार तास विलंबाने विमान पोहचले नसते. स्लॉटची अडचण चार महिन्यांपासून कायम आहे. जळगावातील उद्योजक, व्यापारी, अधिकारी सकाळी लवकर मुंबईला पोहचून दिवसभर काम आटोपून रात्री जळगावात पोहचावेत, वेळेची बचत व्हावी, ही विमानसेवेद्वारे अपेक्षा होती, मात्र जळगावकरांचे हे स्वप्न अद्याप अपूर्णच आहे. सुरुवातीला दुपारी १ पर्यंत विमान पोहचायचे. त्यानंतर स्लॉटच उपलब्ध नसल्याने व काही इतर अडचणींमुळे विमानसेवा १४ मार्चपासून तर १९ एप्रिलपर्यंत म्हणजेच तब्बल ३७ दिवस बंद होती. आता २० एप्रिलपासून सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मंगळवार ते गुरुवार असे तीन दिवस जळगावहून मुंबईला जाण्यासाठी वेळ सोयीची आहे. मात्र शुक्रवार ते रविवारची वेळ जळगावकरांसाठी गैरसोयीची असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. लोकप्रतिनिधींनी मुंबई विमानतळावरील २५ टक्के रिजनल कनेक्टिव्हिटी राखीव ठेवण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. जोपर्यंत ही मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत जळगावकरांचा हवाई प्रवास अडथळ्यांचाच राहणार असल्याचे दिसते. विमानास विलंब होत असला तरी ही सेवा अखंडपणे सुरू रहावी यासाठी प्रवासी जळगाव विमानतळावर तास्न तास विमानाची प्रतीक्षा करीत बसतात. जैन उद्योग समूहाने तर सहा महिन्यांची २५ टक्के तिकिटे आगावू घेतली असून विमानसेवेच्या पहिल्याच दिवशी सात लाखाचा धनादेश ‘एअर डक्कन’ला दिला आहे. जळगावकरांच्या या सहकार्याला केंद्र शासनाने प्रतिसाद देणे आवश्यक आहे, तरच उडान योजना यशस्वी होईल.

टॅग्स :JalgaonजळगावAirportविमानतळ