शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

हवाई प्रवास सुखकर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 18:19 IST

हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास करता आला पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे, त्यासाठी केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली.

हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास करता आला पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे, त्यासाठी केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राज्यातील १० शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात जळगावचाही समावेश आहे. गतवर्षी २३ डिसेंबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवेला प्रारंभ झाला. जळगावकरांचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण झाले; मात्र आतापर्यंतचा प्रवास अडथळ्यांचाच राहिला आहे. विमानसेवेच्या अगदी पहिल्या दिवसापासून विमानसेवेला विलंब झाला. मुंबईहून जळगावात कधीच वेळेवर विमान पोहचले नाही, ही परपंरा आजतागायत कायम आहे. मुंबई विमानतळावर दर अर्ध्या सेकंदाला एक विमान येत असते, दिवसभरात साधारणत: ९९८ विमानांची ये-जा असते. त्यामुळे प्रादेशिक विमानसेवेसाठी लवकर स्लॉट उपलब्ध होत नसल्याने विमानाला विलंब होत असल्याचे कारण सांगितले जाते. लहान शहरे मोठ्या शहरांशी जोडून त्यांचा विकास करण्यासाठी जर केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली आहे तर स्लॉटची अडचण यायलाच नको. कारण ही योजना सुरू करण्यापूर्वीच या अडचणीवर मार्ग काढणे आवश्यक होते. एअर डेक्कन या विमान कंपनीचे संचालक कॅप्टन गोपीचंद यांनीसुद्धा मुंबई विमानतळावर प्रचंड वर्दळ असल्याने २५ टक्के रिजनल कनेक्टिव्हिटी ‘उडान’साठी राखीव ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगीच व्यक्त केली होती. त्यांची ही अपेक्षा केंद्र शासनाने अद्यापही पूर्ण केली नसल्याचे दिसून येते. ती पूर्ण केली असती तर जळगावात दोन ते चार तास विलंबाने विमान पोहचले नसते. स्लॉटची अडचण चार महिन्यांपासून कायम आहे. जळगावातील उद्योजक, व्यापारी, अधिकारी सकाळी लवकर मुंबईला पोहचून दिवसभर काम आटोपून रात्री जळगावात पोहचावेत, वेळेची बचत व्हावी, ही विमानसेवेद्वारे अपेक्षा होती, मात्र जळगावकरांचे हे स्वप्न अद्याप अपूर्णच आहे. सुरुवातीला दुपारी १ पर्यंत विमान पोहचायचे. त्यानंतर स्लॉटच उपलब्ध नसल्याने व काही इतर अडचणींमुळे विमानसेवा १४ मार्चपासून तर १९ एप्रिलपर्यंत म्हणजेच तब्बल ३७ दिवस बंद होती. आता २० एप्रिलपासून सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मंगळवार ते गुरुवार असे तीन दिवस जळगावहून मुंबईला जाण्यासाठी वेळ सोयीची आहे. मात्र शुक्रवार ते रविवारची वेळ जळगावकरांसाठी गैरसोयीची असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. लोकप्रतिनिधींनी मुंबई विमानतळावरील २५ टक्के रिजनल कनेक्टिव्हिटी राखीव ठेवण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. जोपर्यंत ही मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत जळगावकरांचा हवाई प्रवास अडथळ्यांचाच राहणार असल्याचे दिसते. विमानास विलंब होत असला तरी ही सेवा अखंडपणे सुरू रहावी यासाठी प्रवासी जळगाव विमानतळावर तास्न तास विमानाची प्रतीक्षा करीत बसतात. जैन उद्योग समूहाने तर सहा महिन्यांची २५ टक्के तिकिटे आगावू घेतली असून विमानसेवेच्या पहिल्याच दिवशी सात लाखाचा धनादेश ‘एअर डक्कन’ला दिला आहे. जळगावकरांच्या या सहकार्याला केंद्र शासनाने प्रतिसाद देणे आवश्यक आहे, तरच उडान योजना यशस्वी होईल.

टॅग्स :JalgaonजळगावAirportविमानतळ