शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

हवाई प्रवास सुखकर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 18:19 IST

हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास करता आला पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे, त्यासाठी केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली.

हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास करता आला पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे, त्यासाठी केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राज्यातील १० शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात जळगावचाही समावेश आहे. गतवर्षी २३ डिसेंबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवेला प्रारंभ झाला. जळगावकरांचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण झाले; मात्र आतापर्यंतचा प्रवास अडथळ्यांचाच राहिला आहे. विमानसेवेच्या अगदी पहिल्या दिवसापासून विमानसेवेला विलंब झाला. मुंबईहून जळगावात कधीच वेळेवर विमान पोहचले नाही, ही परपंरा आजतागायत कायम आहे. मुंबई विमानतळावर दर अर्ध्या सेकंदाला एक विमान येत असते, दिवसभरात साधारणत: ९९८ विमानांची ये-जा असते. त्यामुळे प्रादेशिक विमानसेवेसाठी लवकर स्लॉट उपलब्ध होत नसल्याने विमानाला विलंब होत असल्याचे कारण सांगितले जाते. लहान शहरे मोठ्या शहरांशी जोडून त्यांचा विकास करण्यासाठी जर केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली आहे तर स्लॉटची अडचण यायलाच नको. कारण ही योजना सुरू करण्यापूर्वीच या अडचणीवर मार्ग काढणे आवश्यक होते. एअर डेक्कन या विमान कंपनीचे संचालक कॅप्टन गोपीचंद यांनीसुद्धा मुंबई विमानतळावर प्रचंड वर्दळ असल्याने २५ टक्के रिजनल कनेक्टिव्हिटी ‘उडान’साठी राखीव ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगीच व्यक्त केली होती. त्यांची ही अपेक्षा केंद्र शासनाने अद्यापही पूर्ण केली नसल्याचे दिसून येते. ती पूर्ण केली असती तर जळगावात दोन ते चार तास विलंबाने विमान पोहचले नसते. स्लॉटची अडचण चार महिन्यांपासून कायम आहे. जळगावातील उद्योजक, व्यापारी, अधिकारी सकाळी लवकर मुंबईला पोहचून दिवसभर काम आटोपून रात्री जळगावात पोहचावेत, वेळेची बचत व्हावी, ही विमानसेवेद्वारे अपेक्षा होती, मात्र जळगावकरांचे हे स्वप्न अद्याप अपूर्णच आहे. सुरुवातीला दुपारी १ पर्यंत विमान पोहचायचे. त्यानंतर स्लॉटच उपलब्ध नसल्याने व काही इतर अडचणींमुळे विमानसेवा १४ मार्चपासून तर १९ एप्रिलपर्यंत म्हणजेच तब्बल ३७ दिवस बंद होती. आता २० एप्रिलपासून सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मंगळवार ते गुरुवार असे तीन दिवस जळगावहून मुंबईला जाण्यासाठी वेळ सोयीची आहे. मात्र शुक्रवार ते रविवारची वेळ जळगावकरांसाठी गैरसोयीची असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. लोकप्रतिनिधींनी मुंबई विमानतळावरील २५ टक्के रिजनल कनेक्टिव्हिटी राखीव ठेवण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. जोपर्यंत ही मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत जळगावकरांचा हवाई प्रवास अडथळ्यांचाच राहणार असल्याचे दिसते. विमानास विलंब होत असला तरी ही सेवा अखंडपणे सुरू रहावी यासाठी प्रवासी जळगाव विमानतळावर तास्न तास विमानाची प्रतीक्षा करीत बसतात. जैन उद्योग समूहाने तर सहा महिन्यांची २५ टक्के तिकिटे आगावू घेतली असून विमानसेवेच्या पहिल्याच दिवशी सात लाखाचा धनादेश ‘एअर डक्कन’ला दिला आहे. जळगावकरांच्या या सहकार्याला केंद्र शासनाने प्रतिसाद देणे आवश्यक आहे, तरच उडान योजना यशस्वी होईल.

टॅग्स :JalgaonजळगावAirportविमानतळ