शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

वायू प्रदूषणानं सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आरोग्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 03:40 IST

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाची सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा होत आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाची सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा होत आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे. आंतरराष्ट्रीय शहर आहे. देशातील सर्वोच्च पदे भूषविणारी मंडळी त्या शहरात निवास करते. त्यामुळे त्या शहरातील वायू प्रदूषण धोकादायक पातळीच्याही वर पोहोचत असेल, तर त्याची चर्चा होणे स्वाभाविकही आहे; मात्र याचा अर्थ देशातील इतर शहरांमधील हवा व पाण्याची स्थिती आलबेल आहे, असा अजिबात होत नाही. महानगरे तर सोडूनच द्या; पण छोट्या शहरांमध्येही श्वास घेणे हल्ली कठीण होत चालले आहे. देशातील एकाही नदीच्या पात्रातील पाणी थेट प्राशन करण्याजोगे राहिलेले नाही. पाणी किमान शुद्ध करून तरी पिता येते; पण हवेचे काय करायचे? ती तर तुमच्या फुफ्फुसांमध्ये शिरतेच! अद्याप तरी हवा शुद्धीकरणाची वैयक्तिक वापराची संयंत्रे बाजारात आलेली नाहीत. त्यामुळे भोवतालची हवा कितीही अशुद्ध असली तरी, त्या हवेतच श्वसन करणे, हे तुमचे प्रारब्ध ठरते. दुर्दैवाने, एखाद्या गोष्टीचा थेट परिणाम समोर येत असेल, तरच आम्ही हादरतो. त्यामुळे एखाद्या अपघातात बरीच प्राणहानी झाली, एखाद्या आजारामुळे मोठ्या संख्येने रुग्ण दगावले किंवा विषारी दारू प्राशन करून काही माणसे मरण पावली, तर आम्ही लगेच भडकतो आणि सरकारी यंत्रणांच्या विरोधात रोष प्रकट करतो; मात्र अशा कारणांच्या तुलनेत किती तरी जास्त प्रमाणात; परंतु अप्रत्यक्षरीत्या अथवा हळूहळू जीवितहानी होत असल्यास, आपल्याला काय त्याचे, अशा स्वरूपाची आमची प्रतिक्रिया असते. त्यामुळेच अगदी टोक गाठल्या जाईपर्यंत प्रदूषणादी समस्यांकडे आम्ही दुर्लक्षच करतो. भारतीयांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे संबंधित यंत्रणांचे आयतेच फावते! महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने अकोला महापालिकेला, हवेतील धुळीच्या धोकादायक प्रमाणाबद्दल नुकतीच नोटीस बजावली. दुर्दैवाने कोणत्याही किरकोळ कारणास्तव रस्त्यांवर उतरून तोडफोड करणाºया संघटनांपैकी एकाही संघटनेला, या गंभीर मुद्यावर महापालिकेला साधा जाबही विचारावासा वाटला नाही. वास्तविक वायू प्रदूषणाचा विळखा अत्यंत भयंकर आहे. वायू प्रदूषणामुळे हृदय, रक्तवाहिन्या आणि श्वसनाशी संबंधित आजार बळावतात. दुर्दैवाने उच्चशिक्षितांमध्येही यासंदर्भात पुरेशी जागृती आढळत नाही. त्यामुळेच प्रदूषणासंदर्भात कितीही गंभीर स्वरूपाचे अहवाल आले, तरीही आमच्या देशात त्यावर अत्यंत क्षीण प्रतिक्रिया उमटतात, हा एकप्रकारे स्वत:च्या आरोग्याशीच खेळ नव्हे का?

टॅग्स :pollutionप्रदूषणNew Delhiनवी दिल्ली