शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

वायू प्रदूषणानं सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आरोग्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 03:40 IST

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाची सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा होत आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाची सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा होत आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे. आंतरराष्ट्रीय शहर आहे. देशातील सर्वोच्च पदे भूषविणारी मंडळी त्या शहरात निवास करते. त्यामुळे त्या शहरातील वायू प्रदूषण धोकादायक पातळीच्याही वर पोहोचत असेल, तर त्याची चर्चा होणे स्वाभाविकही आहे; मात्र याचा अर्थ देशातील इतर शहरांमधील हवा व पाण्याची स्थिती आलबेल आहे, असा अजिबात होत नाही. महानगरे तर सोडूनच द्या; पण छोट्या शहरांमध्येही श्वास घेणे हल्ली कठीण होत चालले आहे. देशातील एकाही नदीच्या पात्रातील पाणी थेट प्राशन करण्याजोगे राहिलेले नाही. पाणी किमान शुद्ध करून तरी पिता येते; पण हवेचे काय करायचे? ती तर तुमच्या फुफ्फुसांमध्ये शिरतेच! अद्याप तरी हवा शुद्धीकरणाची वैयक्तिक वापराची संयंत्रे बाजारात आलेली नाहीत. त्यामुळे भोवतालची हवा कितीही अशुद्ध असली तरी, त्या हवेतच श्वसन करणे, हे तुमचे प्रारब्ध ठरते. दुर्दैवाने, एखाद्या गोष्टीचा थेट परिणाम समोर येत असेल, तरच आम्ही हादरतो. त्यामुळे एखाद्या अपघातात बरीच प्राणहानी झाली, एखाद्या आजारामुळे मोठ्या संख्येने रुग्ण दगावले किंवा विषारी दारू प्राशन करून काही माणसे मरण पावली, तर आम्ही लगेच भडकतो आणि सरकारी यंत्रणांच्या विरोधात रोष प्रकट करतो; मात्र अशा कारणांच्या तुलनेत किती तरी जास्त प्रमाणात; परंतु अप्रत्यक्षरीत्या अथवा हळूहळू जीवितहानी होत असल्यास, आपल्याला काय त्याचे, अशा स्वरूपाची आमची प्रतिक्रिया असते. त्यामुळेच अगदी टोक गाठल्या जाईपर्यंत प्रदूषणादी समस्यांकडे आम्ही दुर्लक्षच करतो. भारतीयांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे संबंधित यंत्रणांचे आयतेच फावते! महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने अकोला महापालिकेला, हवेतील धुळीच्या धोकादायक प्रमाणाबद्दल नुकतीच नोटीस बजावली. दुर्दैवाने कोणत्याही किरकोळ कारणास्तव रस्त्यांवर उतरून तोडफोड करणाºया संघटनांपैकी एकाही संघटनेला, या गंभीर मुद्यावर महापालिकेला साधा जाबही विचारावासा वाटला नाही. वास्तविक वायू प्रदूषणाचा विळखा अत्यंत भयंकर आहे. वायू प्रदूषणामुळे हृदय, रक्तवाहिन्या आणि श्वसनाशी संबंधित आजार बळावतात. दुर्दैवाने उच्चशिक्षितांमध्येही यासंदर्भात पुरेशी जागृती आढळत नाही. त्यामुळेच प्रदूषणासंदर्भात कितीही गंभीर स्वरूपाचे अहवाल आले, तरीही आमच्या देशात त्यावर अत्यंत क्षीण प्रतिक्रिया उमटतात, हा एकप्रकारे स्वत:च्या आरोग्याशीच खेळ नव्हे का?

टॅग्स :pollutionप्रदूषणNew Delhiनवी दिल्ली