शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

वायू प्रदूषणानं सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आरोग्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 03:40 IST

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाची सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा होत आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाची सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा होत आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे. आंतरराष्ट्रीय शहर आहे. देशातील सर्वोच्च पदे भूषविणारी मंडळी त्या शहरात निवास करते. त्यामुळे त्या शहरातील वायू प्रदूषण धोकादायक पातळीच्याही वर पोहोचत असेल, तर त्याची चर्चा होणे स्वाभाविकही आहे; मात्र याचा अर्थ देशातील इतर शहरांमधील हवा व पाण्याची स्थिती आलबेल आहे, असा अजिबात होत नाही. महानगरे तर सोडूनच द्या; पण छोट्या शहरांमध्येही श्वास घेणे हल्ली कठीण होत चालले आहे. देशातील एकाही नदीच्या पात्रातील पाणी थेट प्राशन करण्याजोगे राहिलेले नाही. पाणी किमान शुद्ध करून तरी पिता येते; पण हवेचे काय करायचे? ती तर तुमच्या फुफ्फुसांमध्ये शिरतेच! अद्याप तरी हवा शुद्धीकरणाची वैयक्तिक वापराची संयंत्रे बाजारात आलेली नाहीत. त्यामुळे भोवतालची हवा कितीही अशुद्ध असली तरी, त्या हवेतच श्वसन करणे, हे तुमचे प्रारब्ध ठरते. दुर्दैवाने, एखाद्या गोष्टीचा थेट परिणाम समोर येत असेल, तरच आम्ही हादरतो. त्यामुळे एखाद्या अपघातात बरीच प्राणहानी झाली, एखाद्या आजारामुळे मोठ्या संख्येने रुग्ण दगावले किंवा विषारी दारू प्राशन करून काही माणसे मरण पावली, तर आम्ही लगेच भडकतो आणि सरकारी यंत्रणांच्या विरोधात रोष प्रकट करतो; मात्र अशा कारणांच्या तुलनेत किती तरी जास्त प्रमाणात; परंतु अप्रत्यक्षरीत्या अथवा हळूहळू जीवितहानी होत असल्यास, आपल्याला काय त्याचे, अशा स्वरूपाची आमची प्रतिक्रिया असते. त्यामुळेच अगदी टोक गाठल्या जाईपर्यंत प्रदूषणादी समस्यांकडे आम्ही दुर्लक्षच करतो. भारतीयांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे संबंधित यंत्रणांचे आयतेच फावते! महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने अकोला महापालिकेला, हवेतील धुळीच्या धोकादायक प्रमाणाबद्दल नुकतीच नोटीस बजावली. दुर्दैवाने कोणत्याही किरकोळ कारणास्तव रस्त्यांवर उतरून तोडफोड करणाºया संघटनांपैकी एकाही संघटनेला, या गंभीर मुद्यावर महापालिकेला साधा जाबही विचारावासा वाटला नाही. वास्तविक वायू प्रदूषणाचा विळखा अत्यंत भयंकर आहे. वायू प्रदूषणामुळे हृदय, रक्तवाहिन्या आणि श्वसनाशी संबंधित आजार बळावतात. दुर्दैवाने उच्चशिक्षितांमध्येही यासंदर्भात पुरेशी जागृती आढळत नाही. त्यामुळेच प्रदूषणासंदर्भात कितीही गंभीर स्वरूपाचे अहवाल आले, तरीही आमच्या देशात त्यावर अत्यंत क्षीण प्रतिक्रिया उमटतात, हा एकप्रकारे स्वत:च्या आरोग्याशीच खेळ नव्हे का?

टॅग्स :pollutionप्रदूषणNew Delhiनवी दिल्ली