शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 07:15 IST

चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही वा इतर डिजिटल ओळख चोरून तयार होणारे डीपफेक्स हे फक्त व्यक्तीपुरते नुकसान करत नाहीत, तर समाजात अविश्वास आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करतात.

डॉ. अमेय पांगारकर, एआय तज्ज्ञ

जगभर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) नव्या संधींचा जयघोष होत असताना तिच्या गैरवापरामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर फारसे बोलले जात नाही. आरोग्य, शिक्षण, उद्योग, वित्त, शेती या प्रत्येक क्षेत्रात एआय क्रांती घडवत असली तरी तिच्या चुकीच्या वापरामुळे व्यक्तीचे खासगी आयुष्य आणि सामाजिक सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही वा इतर डिजिटल ओळख चोरून तयार होणारे डीपफेक्स हे फक्त व्यक्तीपुरते नुकसान करत नाहीत, तर समाजात अविश्वास आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करतात.

यासंदर्भात डेन्मार्कने केलेली ऐतिहासिक पावले जगासाठी मार्गदर्शक आहेत. डेन्मार्कने नागरिकांच्या 'डिजिटल सेल्फ'ला व्यक्तिगत मालमत्ता मानत संरक्षण देणारा कायदा केला आहे. चेहरा, आवाज, सही ही फक्त ओळख नाही तर बौद्धिक संपदा आहे, असा महत्त्वपूर्ण विचार त्यांनी कायद्यात समाविष्ट केला. यामुळे तेथील नागरिकांना आपली डिजिटल ओळख चोरली गेल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार मिळतो.

व्यक्ती म्हणून आपणही आपली माहिती सुरक्षित ठेवणे, संशयास्पद व्हिडीओ वा दुव्यांना लगेच विश्वास न देणे आणि आपल्या मुलांना डिजिटल शिस्त शिकवणे, ही पावले उचलली पाहिजेत. प्रत्येक नागरिकाने खोट्या माहितीला बळी न पडता सावधगिरी बाळगली, तर फसवणुकीचे प्रमाण घटू शकते.

सरकारने हे करावे

भारतामध्ये अजूनही अशी ठोस कायदेशीर चौकट नाही. माहिती तंत्रज्ञान अधिनियम व आयटी नियमांद्वारे काही प्रमाणात संरक्षण मिळते. पण, एआयच्या गैरवापरासाठी वेगळे, स्पष्ट आणि सक्षम कायदे करण्याची वेळ आली आहे.

डीपफेक्स किंवा आवाजाच्या

बनावटपणामुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढू शकतात, तसेच मानहानी आणि सामाजिक गोंधळ निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे सरकारने 3 तातडीने कायदा करून डिजिटल ओळखीचे बौद्धिक संपदा म्हणून संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.

आपण हे करावे

केवळ सरकारच्या कारवाईवर अवलंबून राहून चालणार नाही. समाज, उद्योगक्षेत्र आणि व्यक्ती यांनीही जबाबदारी स्वीकारावी लागेल.

सोशल मीडिया 3 कंपन्यांना बनावट सामग्री ओळखणारी तंत्रज्ञान साधने वापरणे बंधनकारक करावे लागेल.

३ उद्योगांनी एआयचा वापर करताना नैतिक मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. समाजात डिजिटल साक्षरता वाढवणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स