शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 07:15 IST

चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही वा इतर डिजिटल ओळख चोरून तयार होणारे डीपफेक्स हे फक्त व्यक्तीपुरते नुकसान करत नाहीत, तर समाजात अविश्वास आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करतात.

डॉ. अमेय पांगारकर, एआय तज्ज्ञ

जगभर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) नव्या संधींचा जयघोष होत असताना तिच्या गैरवापरामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर फारसे बोलले जात नाही. आरोग्य, शिक्षण, उद्योग, वित्त, शेती या प्रत्येक क्षेत्रात एआय क्रांती घडवत असली तरी तिच्या चुकीच्या वापरामुळे व्यक्तीचे खासगी आयुष्य आणि सामाजिक सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही वा इतर डिजिटल ओळख चोरून तयार होणारे डीपफेक्स हे फक्त व्यक्तीपुरते नुकसान करत नाहीत, तर समाजात अविश्वास आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करतात.

यासंदर्भात डेन्मार्कने केलेली ऐतिहासिक पावले जगासाठी मार्गदर्शक आहेत. डेन्मार्कने नागरिकांच्या 'डिजिटल सेल्फ'ला व्यक्तिगत मालमत्ता मानत संरक्षण देणारा कायदा केला आहे. चेहरा, आवाज, सही ही फक्त ओळख नाही तर बौद्धिक संपदा आहे, असा महत्त्वपूर्ण विचार त्यांनी कायद्यात समाविष्ट केला. यामुळे तेथील नागरिकांना आपली डिजिटल ओळख चोरली गेल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार मिळतो.

व्यक्ती म्हणून आपणही आपली माहिती सुरक्षित ठेवणे, संशयास्पद व्हिडीओ वा दुव्यांना लगेच विश्वास न देणे आणि आपल्या मुलांना डिजिटल शिस्त शिकवणे, ही पावले उचलली पाहिजेत. प्रत्येक नागरिकाने खोट्या माहितीला बळी न पडता सावधगिरी बाळगली, तर फसवणुकीचे प्रमाण घटू शकते.

सरकारने हे करावे

भारतामध्ये अजूनही अशी ठोस कायदेशीर चौकट नाही. माहिती तंत्रज्ञान अधिनियम व आयटी नियमांद्वारे काही प्रमाणात संरक्षण मिळते. पण, एआयच्या गैरवापरासाठी वेगळे, स्पष्ट आणि सक्षम कायदे करण्याची वेळ आली आहे.

डीपफेक्स किंवा आवाजाच्या

बनावटपणामुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढू शकतात, तसेच मानहानी आणि सामाजिक गोंधळ निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे सरकारने 3 तातडीने कायदा करून डिजिटल ओळखीचे बौद्धिक संपदा म्हणून संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.

आपण हे करावे

केवळ सरकारच्या कारवाईवर अवलंबून राहून चालणार नाही. समाज, उद्योगक्षेत्र आणि व्यक्ती यांनीही जबाबदारी स्वीकारावी लागेल.

सोशल मीडिया 3 कंपन्यांना बनावट सामग्री ओळखणारी तंत्रज्ञान साधने वापरणे बंधनकारक करावे लागेल.

३ उद्योगांनी एआयचा वापर करताना नैतिक मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. समाजात डिजिटल साक्षरता वाढवणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स