शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

आयोग नव्हे, मतदारच राजा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 06:12 IST

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी व्होटचोरीसंदर्भातील बहुचर्चित हायड्रोजन बाॅम्बच्या आधीचा मतदार याद्यांमधील घोळाचा छोटा स्फोट केला. यापेक्षा मोठा धमाका करणार आहोतच, असा पुनरुच्चारही केला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी व्होटचोरीसंदर्भातील बहुचर्चित हायड्रोजन बाॅम्बच्या आधीचा मतदार याद्यांमधील घोळाचा छोटा स्फोट केला. यापेक्षा मोठा धमाका करणार आहोतच, असा पुनरुच्चारही केला. कर्नाटकातील आळंद व महाराष्ट्रातील राजुरा या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुक्रमे वगळलेल्या व वाढविलेल्या सहा हजारांहून अधिक मतदारांचा पर्दाफाश करताना त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना थेट लक्ष्य केले. आधीच्या आरोपावेळी ज्ञानेश कुमारांनी विरोधी पक्षनेत्यांना आक्रमक भाषेत दटावले होते. तो रागदेखील राहुल यांच्या मनात असावा. म्हणून व्होटचोरीला मुख्य निवडणूक आयुक्तांचेच संरक्षण असल्याचा थेट हल्ला त्यांनी यावेळी चढविला. साॅफ्टवेअरच्या माध्यमातून काँग्रेसचा प्रभाव असलेल्या बूथवरील मतदारांची नावे उडविली गेली आणि नवे मतदार वाढवितानाही हीच पद्धत वापरली, हा या नव्या आरोपांचा मुख्य धागा आहे. निवडणूक आयोगाने हे आरोपदेखील निराधार ठरवून फेटाळले.

 यावेळी प्रतिज्ञापत्रावर तक्रारीचा विषय मात्र निघाला नाही. कारण, आपल्या मुख्य आयुक्तांविरोधात आयोग प्रतिज्ञापत्र कसे मागणार? त्याऐवजी आळंदमध्ये दाखल गुन्ह्याकडे बोट दाखवून आयोगाने स्वत:चा बचाव केला. आधीच्या माधवपुरा मतदारसंघातील घोळाविषयी गुन्हा दाखल नव्हता आणि आळंद, राजुरा मतदारसंघात मात्र गुन्हे दाखल आहेत, हा दोन आरोपांमधील मूलभूत फरक आहे. गुन्हाच दाखल असल्याने काही आक्षेपार्ह घडलेले नाही, असे आयोगाला म्हणणे शक्य नाही. गुन्ह्याच्या तपासात आयोगाकडून सहकार्य मिळत नसल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपांची मात्र पुष्टी होते. नव्या आरोपांनंतर अपेक्षेनुसार भारतीय जनता पक्ष पुन्हा शक्य तितक्या कठोर शब्दांमध्ये राहुल गांधी यांच्यावर तुटून पडला. ‘हा कसला हायड्रोजन बाॅम्ब, हा तर फुस्स फटाका’ अशा शब्दांत खिल्ली उडवली गेली. ‘राहुल गांधी सिरीअल लायर आहेत’, अशी हेटाळणी झाली.

 भाजपचे नेते, प्रवक्ते वरवर तर्कशुद्ध वाटणारा प्रश्न राहुल गांधी यांना वारंवार विचारत आहेत की, इतके पुरावे असतील तर न्यायालयात का जात नाही? तथापि, राहुल गांधी किंवा विरोधकांचा न्यायालयांवर विश्वास नाही. त्याऐवजी जनतेच्या न्यायालयात जाणे त्यांना राजकीयदृष्ट्या अधिक सोयीचे आहे. महत्त्वाचे हे की, हा विषय भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्या राजकीय वादावादीचा आणि राहुल गांधी व ज्ञानेश कुमार या दोघांमधील शत्रुत्वाचाही नाही. राहुल गांधींच्या रूपाने राजकीय व्यक्ती यात असली तरी ही लढाई राजकीय नाही. गंभीर आरोपांमुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली आहे. घटनात्मक स्वायत्त संस्था म्हणून निकोप, निर्दोष मतदार याद्या तयार करणे, पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेणे, सर्व राजकीय पक्षांशी समान अंतर ठेवणे, सर्वांना समान वागणूक देणे, हे आयोगाचे अधिकार व कर्तव्ये आहेत. बिहारमध्ये सघन पुनरीक्षण प्रक्रियेवरील सुनावणीत आयोगाने अधिकारांची आठवण सर्वोच्च न्यायालयाला करून दिली, परंतु, कर्तव्याचा विसर पडला. प्रत्येक मतदाराला त्याच्या मताधिकाराबद्दल सजग राहण्याचा जाब विचारण्याचा अधिकार आहेच. तेव्हा, आयोगाप्रमाणेच घटनात्मक दर्जा असलेले विरोधी पक्षनेते काही गंभीर आरोप करीत असतील आणि आयोग त्यांची पुरेशी दखल घेत नसेल, असे प्रकार टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत नसतील, तर सामान्य मतदारांमधील संशय वाढतो. राहुल यांचे सगळेच आरोप खरे आहेत, असे कोणी म्हणणार नाही.

तथापि, त्यांनी काही पुराव्यांसह केलेल्या आरोपांची चाैकशी करण्याऐवजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजकीय नेत्यांची भाषा वापरणे योग्य नाही. त्यातही अशी एखादी सिस्टम हॅक केली जाणे अगदीच अशक्य नाही. तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. अनेक सार्वजनिक संस्थाही आपली व्यवस्था अधिक निर्दोष राहावी म्हणून इथिकल हॅकर्सची मदत घेतात. तेव्हा, या सर्व शक्यतांचा विचार करून आरोपांची चाैकशी करणे, त्यासाठी प्रसंगी राहुल गांधी यांची मदत घेणे, हाच लोकशाही व्यवस्थेत सभ्यपणा व शहाणपणादेखील आहे. कारण, लोकशाहीत निवडणूक आयोग नव्हे तर मतदार हाच राजा आहे. राजकीय पक्षांना डिजिटल मतदार यादी पुरविल्याने किंवा गुन्ह्यांच्या चाैकशीसाठी आवश्यक डिजिटल सामग्री देऊन सहकार्य केल्याने आयोगाची प्रतिष्ठा कमी होण्याऐवजी वाढणारच आहे. तेव्हा, हा विषय अधिक प्रतिष्ठेचा न बनविता निवडणूक आयोगाने आणखी माैन बाळगू नये. अशा चाैकशीतून अंतिमत: निवडणूक प्रक्रिया अधिक विश्वासार्ह होईल आणि लोकशाही बळकट होईल.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024