शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

बहेनजींचेही पाय मातीचे...बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा बहेनजी मायावती पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 07:55 IST

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा बहेनजी मायावती पुन्हा चर्चेत आहेत.

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा बहेनजी मायावती पुन्हा चर्चेत आहेत. पाच राज्यांच्या निवडणूक निकालात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या मोठ्या राज्यांमध्ये विरोधकांचा पराभव झाला आणि जणू राजकीय विजनवासातून बाहेर आल्यासारख्या त्या खूप दिवसांनंतर बोलल्या. कधीकाळी जय- पराजयाचे पारडे झुकविण्याची ताकद असलेल्या बसपाची तिन्ही राज्यांत काँग्रेसपेक्षाही मानहानीजनक पिछेहाट झाली. त्यावर त्यांनी त्यांच्या परीने विश्लेषण केले. उत्तर प्रदेशातील अमरोहाचे बसपा खासदार दानिश अली यांच्यावर भाजपचे दिल्लीतील खासदार रमेश बिधुडी यांनी लोकसभेत अश्लाघ्य भाषेत आक्षेपार्ह विधाने केली. तेव्हा, पक्ष अलींच्या पाठीशी उभा राहिला नाही. उलट, बडतर्फ तृणमूल खासदार महुआ मोड़त्रा यांच्या समर्थनार्थ सभात्याग ही दानिश अली यांची कृती पक्षविरोधी ठरवून त्यांना पक्षाने काल काढून टाकले. हा बडतर्फीचा आदेश पक्षविरोधी कारवायांसाठी आहे की भाजपला नाराज केले म्हणून, हा प्रश्न चर्चेत आहे.. आणि आता मायावतींनी आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा, राजकीय वारसदाराविषयीचा निर्णय जाहीर केला आहे. 

आकाश आनंद हे भाचे, म्हणजे बंधू आनंद कुमार यांचे चिरंजीव आपले राजकीय वारसदार असतील असे मायावतींनी जाहीर केले आहे. क्रांतीच्या गोष्टी करणाऱ्या बहुतेकांचे पाय अखेर मातीचेच निघतात, हे यातून अधोरेखित झाले आणि मायावतींबाबत अशा अनुभवाची ही पहिली वेळ नाही. या निर्णयाचा दुसरा अन्वयार्थ हा की, याबाबतीत कांशीराम यांना जमले ते मायावतींनी साधले नाही. कारण, कांशीराम यांच्याशी मायावतींचा कौटुंबिक संबंध नव्हता. मायावतींच्या हाती बसपाची धुरा सोपविताना कांशीराम यांनी केवळ वैचारिक वारशाचा विचार केला. त्यातही आयुष्यभर प्रस्थापितांचे राजकारण, घराणेशाहीवर टीका करणाऱ्या, त्याच आधारे बहुजनांमध्ये राजकीय जागृती घडविणाऱ्या, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामी विचारांना राजकीय चेहरा देणाऱ्या मायावतींना बामसेफ किंवा बसपाचे नेते-कार्यकर्ते यात वारस दिसला नाही. त्यासाठी त्या स्वतःच्याच घरात डोकावल्या. यात आश्चर्य नसले तरी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना खंत वाटणारच. कारण, दिवंगत कांशीराम व मायावतींचे बहुजन समाज पक्षाचा उदय हे भारतीय राजकारणातील सामाजिक अभिसरणाचे अभूतपूर्व पर्व आहे किंवा होते, असे म्हटले तर ती अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. 

'जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी' अशी घोषणा देत कांशीराम यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्वाचा पाया दलित, आदिवासी, ओबीसी मिळून सगळ्या बहुजनांच्या राजकारणाला दिला. सोशल इंजिनिअरिंग शब्द प्रचलित झाला. बहुजनांमध्ये राजकीय जागृती आली. प्रस्थापित राजकारणाला नवा पर्याय म्हणून बसपाचा राजकीय क्षितिजावर उदय झाला. किमान वीस-पंचवीस वर्षे देशाचे राजकारण ढवळून निघाले. त्यामुळे उच्चवर्णीयांचे राजकारण करणाऱ्या बड्या प्रस्थापित राष्ट्रीय पक्षांनाही जातीपातींचा आधार गरजेचा वाटू लागला. कांशीराम यांच्या हयातीतच उत्तर प्रदेश या सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रिपद मायावतींच्या पदरात पडले. त्या देशातील पहिल्या दलित महिला मुख्यमंत्री ठरल्या. कधी भाजपच्या पाठिंब्यावर, तर कधी स्वबळावर अशा चारवेळा त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या. त्यांच्या कारभाराचा चेहराही बहुजन होता. फुले, शाहू, आंबेडकर या महाराष्ट्रातील महापुरुषांना मायावतींमुळेच उत्तर प्रदेश व उर्वरित भारतात मोठी प्रतिष्ठा मिळाली. त्यांची विशालकाय स्मारके उभी राहिली. देशभरातील बहुजन समाज त्यामुळे भारावला. एक मोठा कालखंड अशा भारावलेपणाचा होता. महाराष्ट्रात तर मायावतींना जमते ते स्थानिक नेत्यांना का जमत नाही, हाच अनेक वर्षे दलित, बहुजन समाजाचा आक्षेप राहिला. अशा क्रांतिकारी मायावती नंतर आरोपांच्या गर्तेत सापडल्या. वाढदिवसाला भेट म्हणून पक्षनिधी घेणाऱ्या मायावतींचा चेहरा उघडा पडला. ताज कॉरिडॉर, आंबेडकर मेमोरिअल पार्क वगैरे प्रकल्पांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. चौकशांचा ससेमिरा मागे लागला. लढवय्या म्हणविल्या जाणाऱ्या मायावतींनी एकप्रकारे शरणागती पत्करली. विशेषत: गेल्या दहा वर्षांत त्या तपास यंत्रणा ज्यांच्या हातात त्या भारतीय जनता पक्षाच्या कलाने राजकारण करू लागल्या. सतत सत्ताधाऱ्यांच्या सोयीची भूमिका घेऊ लागल्या. दानिश अलींची बडतर्फी ही अशीच भूमिका तर अननुभवी आकाश आनंद यांच्या हाती बसपाची सूत्रे हा येत्या निवडणुकीत प्रासंगिक राहण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.