शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा तेच ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 13:05 IST

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर नगरपंचायतीची पहिली निवडणूक १५ जुलै रोजी होत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघाच्या मुख्यालयात ही निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. खडसे हे सध्या मंत्रिमंडळात नसल्याने आणि क्लीन चिट मिळाल्यानंतरही मंत्रिमंडळात परत सन्मानाने स्थान मिळत नसल्याने भाजपावर काहीसे रुसलेले आहेत. ...

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर नगरपंचायतीची पहिली निवडणूक १५ जुलै रोजी होत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघाच्या मुख्यालयात ही निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. खडसे हे सध्या मंत्रिमंडळात नसल्याने आणि क्लीन चिट मिळाल्यानंतरही मंत्रिमंडळात परत सन्मानाने स्थान मिळत नसल्याने भाजपावर काहीसे रुसलेले आहेत. त्यांची नाराजी वेगवेगळ्या निमित्ताने समोर येत असते. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकीत खडसे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस या तीन पक्षांनी महाआघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांना जोरदार टक्कर दिलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी महाआघाडीसाठी पुढाकार घेतला. परंतु खडसे यांचे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता ही महाआघाडी कितपत टिकाव धरेल, याविषयी राजकीय वर्तुळात शंका व्यक्त होत होती. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांनी खडसे यांच्या कोथळी येथील निवासस्थानी भेट देऊन पाहुणचार स्वीकारला होता. तर रावेर येथे राजीव पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खडसे यांच्याकडे सहकार्याचा हात पुढे केला होता. ही पार्श्वभूमी पाहता शिवसेनेसोबतच्या महाआघाडीविषयी साशंकता होती आणि तसेच घडले. जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केल्याचे टोकन हाती असलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधुरी जाधव यांच्यासाठी काँग्रेसने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मुळात केवळ ७ जागा लढविणाºया काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी हट्ट धरणे चुकीचे असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेना व राष्टÑवादी हे दोन पक्ष महाआघाडीत उरले आहेत. शिवसेनेने १३ तर राष्टÑवादीने ३ जागा लढविल्या आहेत. जागावाटपावरुन आघाडी तुटल्याने भाजपा नेत्यांना हायसे वाटले आहे. भाजपाची ग्रामपंचायतीत सत्ता होती; खडसे यांचे वर्चस्व कायम असले तरी भाजपाने याठिकाणी गाफिल न राहता चातुर्याचे दर्शन घडविले. प्रत्येक प्रभागात दोन उमेदवारांना अर्ज भरायला सांगून सगळ्याच उमेदवारांचे माघारीचे अर्ज ताब्यात घेतले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करुन उर्वरित उमेदवारांना माघार घ्यायला लावली. त्यामुळे बंडखोरी झालेली नाही. शुध्द पाणी, चांगले रस्ते, स्वच्छता, गटारी या प्रश्नांभोवतीच ही निवडणूक फिरत आहे. ४० वर्षांचे राजकारण आणि दोनदा मंत्रिपद आणि एकदा विरोधी पक्षनेतेपद भूषविलेल्या खडसे यांच्या गावात जर मुलभूत समस्या कायम असतील, तर आश्चर्य म्हणावे लागेल. नेत्यांच्या गावातही तेच असेल तर मग समस्या सुटल्या कुठल्या हा प्रश्न आहेच.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव