शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

पुन्हा तेच ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 13:05 IST

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर नगरपंचायतीची पहिली निवडणूक १५ जुलै रोजी होत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघाच्या मुख्यालयात ही निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. खडसे हे सध्या मंत्रिमंडळात नसल्याने आणि क्लीन चिट मिळाल्यानंतरही मंत्रिमंडळात परत सन्मानाने स्थान मिळत नसल्याने भाजपावर काहीसे रुसलेले आहेत. ...

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर नगरपंचायतीची पहिली निवडणूक १५ जुलै रोजी होत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघाच्या मुख्यालयात ही निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. खडसे हे सध्या मंत्रिमंडळात नसल्याने आणि क्लीन चिट मिळाल्यानंतरही मंत्रिमंडळात परत सन्मानाने स्थान मिळत नसल्याने भाजपावर काहीसे रुसलेले आहेत. त्यांची नाराजी वेगवेगळ्या निमित्ताने समोर येत असते. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकीत खडसे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस या तीन पक्षांनी महाआघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांना जोरदार टक्कर दिलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी महाआघाडीसाठी पुढाकार घेतला. परंतु खडसे यांचे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता ही महाआघाडी कितपत टिकाव धरेल, याविषयी राजकीय वर्तुळात शंका व्यक्त होत होती. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांनी खडसे यांच्या कोथळी येथील निवासस्थानी भेट देऊन पाहुणचार स्वीकारला होता. तर रावेर येथे राजीव पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खडसे यांच्याकडे सहकार्याचा हात पुढे केला होता. ही पार्श्वभूमी पाहता शिवसेनेसोबतच्या महाआघाडीविषयी साशंकता होती आणि तसेच घडले. जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केल्याचे टोकन हाती असलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधुरी जाधव यांच्यासाठी काँग्रेसने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मुळात केवळ ७ जागा लढविणाºया काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी हट्ट धरणे चुकीचे असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेना व राष्टÑवादी हे दोन पक्ष महाआघाडीत उरले आहेत. शिवसेनेने १३ तर राष्टÑवादीने ३ जागा लढविल्या आहेत. जागावाटपावरुन आघाडी तुटल्याने भाजपा नेत्यांना हायसे वाटले आहे. भाजपाची ग्रामपंचायतीत सत्ता होती; खडसे यांचे वर्चस्व कायम असले तरी भाजपाने याठिकाणी गाफिल न राहता चातुर्याचे दर्शन घडविले. प्रत्येक प्रभागात दोन उमेदवारांना अर्ज भरायला सांगून सगळ्याच उमेदवारांचे माघारीचे अर्ज ताब्यात घेतले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करुन उर्वरित उमेदवारांना माघार घ्यायला लावली. त्यामुळे बंडखोरी झालेली नाही. शुध्द पाणी, चांगले रस्ते, स्वच्छता, गटारी या प्रश्नांभोवतीच ही निवडणूक फिरत आहे. ४० वर्षांचे राजकारण आणि दोनदा मंत्रिपद आणि एकदा विरोधी पक्षनेतेपद भूषविलेल्या खडसे यांच्या गावात जर मुलभूत समस्या कायम असतील, तर आश्चर्य म्हणावे लागेल. नेत्यांच्या गावातही तेच असेल तर मग समस्या सुटल्या कुठल्या हा प्रश्न आहेच.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव