शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

पुन्हा तेच ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 13:05 IST

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर नगरपंचायतीची पहिली निवडणूक १५ जुलै रोजी होत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघाच्या मुख्यालयात ही निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. खडसे हे सध्या मंत्रिमंडळात नसल्याने आणि क्लीन चिट मिळाल्यानंतरही मंत्रिमंडळात परत सन्मानाने स्थान मिळत नसल्याने भाजपावर काहीसे रुसलेले आहेत. ...

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर नगरपंचायतीची पहिली निवडणूक १५ जुलै रोजी होत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघाच्या मुख्यालयात ही निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. खडसे हे सध्या मंत्रिमंडळात नसल्याने आणि क्लीन चिट मिळाल्यानंतरही मंत्रिमंडळात परत सन्मानाने स्थान मिळत नसल्याने भाजपावर काहीसे रुसलेले आहेत. त्यांची नाराजी वेगवेगळ्या निमित्ताने समोर येत असते. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकीत खडसे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस या तीन पक्षांनी महाआघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांना जोरदार टक्कर दिलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी महाआघाडीसाठी पुढाकार घेतला. परंतु खडसे यांचे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता ही महाआघाडी कितपत टिकाव धरेल, याविषयी राजकीय वर्तुळात शंका व्यक्त होत होती. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांनी खडसे यांच्या कोथळी येथील निवासस्थानी भेट देऊन पाहुणचार स्वीकारला होता. तर रावेर येथे राजीव पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खडसे यांच्याकडे सहकार्याचा हात पुढे केला होता. ही पार्श्वभूमी पाहता शिवसेनेसोबतच्या महाआघाडीविषयी साशंकता होती आणि तसेच घडले. जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केल्याचे टोकन हाती असलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधुरी जाधव यांच्यासाठी काँग्रेसने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मुळात केवळ ७ जागा लढविणाºया काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी हट्ट धरणे चुकीचे असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेना व राष्टÑवादी हे दोन पक्ष महाआघाडीत उरले आहेत. शिवसेनेने १३ तर राष्टÑवादीने ३ जागा लढविल्या आहेत. जागावाटपावरुन आघाडी तुटल्याने भाजपा नेत्यांना हायसे वाटले आहे. भाजपाची ग्रामपंचायतीत सत्ता होती; खडसे यांचे वर्चस्व कायम असले तरी भाजपाने याठिकाणी गाफिल न राहता चातुर्याचे दर्शन घडविले. प्रत्येक प्रभागात दोन उमेदवारांना अर्ज भरायला सांगून सगळ्याच उमेदवारांचे माघारीचे अर्ज ताब्यात घेतले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करुन उर्वरित उमेदवारांना माघार घ्यायला लावली. त्यामुळे बंडखोरी झालेली नाही. शुध्द पाणी, चांगले रस्ते, स्वच्छता, गटारी या प्रश्नांभोवतीच ही निवडणूक फिरत आहे. ४० वर्षांचे राजकारण आणि दोनदा मंत्रिपद आणि एकदा विरोधी पक्षनेतेपद भूषविलेल्या खडसे यांच्या गावात जर मुलभूत समस्या कायम असतील, तर आश्चर्य म्हणावे लागेल. नेत्यांच्या गावातही तेच असेल तर मग समस्या सुटल्या कुठल्या हा प्रश्न आहेच.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव