शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तुरी नंतर हरभऱ्याल्याही हमीभाव हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 03:06 IST

तुरीच्या हमीभावाचे त्रांगडे सुरू असतानाच हरभºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे़ सलग तीन-चार वर्षांच्या दुष्काळजन्य परिस्थितीनंतर बाजारात शेतमाल आला़ तुरीची १ फेब्रुवारी २०१८ पासून नोंदणी सुरू झाली़ प्रत्यक्षात पहिल्या आठवड्यात खरेदीही सुरू झाली.

- धर्मराज हल्लाळेतुरीच्या हमीभावाचे त्रांगडे सुरू असतानाच हरभºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे़ सलग तीन-चार वर्षांच्या दुष्काळजन्य परिस्थितीनंतर बाजारात शेतमाल आला़ तुरीची १ फेब्रुवारी २०१८ पासून नोंदणी सुरू झाली़ प्रत्यक्षात पहिल्या आठवड्यात खरेदीही सुरू झाली़ परंतु, अजूनही नोंदणी केलेल्या सर्व शेतकºयांची तूर खरेदी झाली नाही़ ज्यांची खरेदी झाली त्यापैकी बहुतांश जणांना पैसे मिळाले, ही समाधानाची बाब़ मात्र अजूनही जिल्हानिहाय कोट्यवधींचे देणे आहे़ गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खरेदी सुरू झाली़ परंतु, यंदा तूर खरेदीलाही विलंब झाला़तुरीनंतर आता हरभरा खरेदीचा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे़ हमीभाव ४ हजार ४०० रुपये असला तरी खुल्या बाजारात तो ३२०० रुपयांपर्यंत घसरला होता़ हमीभाव खरेदी केंद्रांकडून मिळणारा भाव आणि खासगी आडत व्यापाºयांकडून मिळणारा भाव यामध्ये हजार ते दीड हजार रुपयांपर्यंतची तफावत होती़ त्याचा हरभरा उत्पादक शेतकºयांना फटका सहन करावा लागला़कृषी उत्पन्न बाजार समित्या व नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले़ त्यामुळे शेतकºयांना खासगी बाजारात हरभरा विकण्याची गरज राहणार नाही, असे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी सांगितले़ परंतु, प्रत्यक्षात हरभºयासाठी १ मार्चपासून नोंदणी झाली, ५ मार्चपासून खरेदी सुरू झाली़ एकट्या लातूर जिल्ह्यात २१ हजार शेतकºयांनी नोंदणी केली़ त्यातील केवळ ७०० शेतकºयांचा ५ हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला़ त्याचे सुमारे २ कोटी रुपये थकीत आहेत़ हमीभाव खरेदी केंद्राच्या समोरही अडचणींचा पाढा आहे़ गोदाम उपलब्ध नाहीत़ त्यातच मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्याने वजन-काटे वाढविता आले नाहीत़ या ना त्या कारणाने हमीभावाची खरेदी नोंदणी पुरतीच राहिली आहे़ अजूनही सर्व शेतकºयांचा हरभरा नोंदणी प्रमाणे खरेदी झाला नाही़ ज्यांचा खरेदी झाला त्यांना पैसे मिळालेले नाहीत़पाऊस वेळेवर येत नाही, तो अवकाळीच बरसतो़ शेतात पिकत नाही, पिकले तर हमीभावाने विकत नाही़ या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी कर्जबाजारी होत जातो़ त्यामुळेच शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तळेगाव (बो़) येथील शेतकरी भागवत एकुर्गे यांना आपल्या मुलीचा विवाह कसा करायचा हा प्रश्न भेडसावतो़ यंदा पिकले आहे, चांगले पैसे येतील, मुलीचे लग्न करू, असा विचार केलेला शेतकरी पिता अडचणीत आहे़ भागवत एकुर्गे हे एक उदाहरण आहे, ज्यांनी आपले गाºहाणे प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडले़ प्रत्यक्षात असे कैक भागवत आपल्या मुलीच्या विवाहासाठी चिंतित आहेत़भागवत एकुर्गे यांनी खुल्या बाजारात हरभरा विकला तर सुमारे दीड लाखांवर तोटा सहन करावा लागला असता़ त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहाची तारीखच पुढे ढकलली़ २४ एप्रिलचे लग्न आता १२ मे रोजी होणार आहे़ ही व्यथा गावोगावी आहे़ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी याची दखल घेऊन या शेतकºयाचा दीडशे क्विंटल हरभरा खरेदी करण्याचे आदेश दिले़ एकाची एक अडचण मांडली गेली़ ती सोडविण्याचा मंत्र्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला असे म्हटले तरी गावोगावी असणाºया अन्य शेतकºयांच्या अडचणींचे काय होणार, त्या सोडविणार कशा, हा प्रश्न कायम आहे़ बाजारातल्या तुरीचा हिशेब अर्धवट; हरभºयाचाही हमीभाव हवेत, अशा स्थितीत मराठवाड्यातील शेतकरी सध्या अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा सामना करीत आहेत़

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र