शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

तुरी नंतर हरभऱ्याल्याही हमीभाव हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 03:06 IST

तुरीच्या हमीभावाचे त्रांगडे सुरू असतानाच हरभºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे़ सलग तीन-चार वर्षांच्या दुष्काळजन्य परिस्थितीनंतर बाजारात शेतमाल आला़ तुरीची १ फेब्रुवारी २०१८ पासून नोंदणी सुरू झाली़ प्रत्यक्षात पहिल्या आठवड्यात खरेदीही सुरू झाली.

- धर्मराज हल्लाळेतुरीच्या हमीभावाचे त्रांगडे सुरू असतानाच हरभºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे़ सलग तीन-चार वर्षांच्या दुष्काळजन्य परिस्थितीनंतर बाजारात शेतमाल आला़ तुरीची १ फेब्रुवारी २०१८ पासून नोंदणी सुरू झाली़ प्रत्यक्षात पहिल्या आठवड्यात खरेदीही सुरू झाली़ परंतु, अजूनही नोंदणी केलेल्या सर्व शेतकºयांची तूर खरेदी झाली नाही़ ज्यांची खरेदी झाली त्यापैकी बहुतांश जणांना पैसे मिळाले, ही समाधानाची बाब़ मात्र अजूनही जिल्हानिहाय कोट्यवधींचे देणे आहे़ गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खरेदी सुरू झाली़ परंतु, यंदा तूर खरेदीलाही विलंब झाला़तुरीनंतर आता हरभरा खरेदीचा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे़ हमीभाव ४ हजार ४०० रुपये असला तरी खुल्या बाजारात तो ३२०० रुपयांपर्यंत घसरला होता़ हमीभाव खरेदी केंद्रांकडून मिळणारा भाव आणि खासगी आडत व्यापाºयांकडून मिळणारा भाव यामध्ये हजार ते दीड हजार रुपयांपर्यंतची तफावत होती़ त्याचा हरभरा उत्पादक शेतकºयांना फटका सहन करावा लागला़कृषी उत्पन्न बाजार समित्या व नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले़ त्यामुळे शेतकºयांना खासगी बाजारात हरभरा विकण्याची गरज राहणार नाही, असे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी सांगितले़ परंतु, प्रत्यक्षात हरभºयासाठी १ मार्चपासून नोंदणी झाली, ५ मार्चपासून खरेदी सुरू झाली़ एकट्या लातूर जिल्ह्यात २१ हजार शेतकºयांनी नोंदणी केली़ त्यातील केवळ ७०० शेतकºयांचा ५ हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला़ त्याचे सुमारे २ कोटी रुपये थकीत आहेत़ हमीभाव खरेदी केंद्राच्या समोरही अडचणींचा पाढा आहे़ गोदाम उपलब्ध नाहीत़ त्यातच मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्याने वजन-काटे वाढविता आले नाहीत़ या ना त्या कारणाने हमीभावाची खरेदी नोंदणी पुरतीच राहिली आहे़ अजूनही सर्व शेतकºयांचा हरभरा नोंदणी प्रमाणे खरेदी झाला नाही़ ज्यांचा खरेदी झाला त्यांना पैसे मिळालेले नाहीत़पाऊस वेळेवर येत नाही, तो अवकाळीच बरसतो़ शेतात पिकत नाही, पिकले तर हमीभावाने विकत नाही़ या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी कर्जबाजारी होत जातो़ त्यामुळेच शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तळेगाव (बो़) येथील शेतकरी भागवत एकुर्गे यांना आपल्या मुलीचा विवाह कसा करायचा हा प्रश्न भेडसावतो़ यंदा पिकले आहे, चांगले पैसे येतील, मुलीचे लग्न करू, असा विचार केलेला शेतकरी पिता अडचणीत आहे़ भागवत एकुर्गे हे एक उदाहरण आहे, ज्यांनी आपले गाºहाणे प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडले़ प्रत्यक्षात असे कैक भागवत आपल्या मुलीच्या विवाहासाठी चिंतित आहेत़भागवत एकुर्गे यांनी खुल्या बाजारात हरभरा विकला तर सुमारे दीड लाखांवर तोटा सहन करावा लागला असता़ त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहाची तारीखच पुढे ढकलली़ २४ एप्रिलचे लग्न आता १२ मे रोजी होणार आहे़ ही व्यथा गावोगावी आहे़ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी याची दखल घेऊन या शेतकºयाचा दीडशे क्विंटल हरभरा खरेदी करण्याचे आदेश दिले़ एकाची एक अडचण मांडली गेली़ ती सोडविण्याचा मंत्र्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला असे म्हटले तरी गावोगावी असणाºया अन्य शेतकºयांच्या अडचणींचे काय होणार, त्या सोडविणार कशा, हा प्रश्न कायम आहे़ बाजारातल्या तुरीचा हिशेब अर्धवट; हरभºयाचाही हमीभाव हवेत, अशा स्थितीत मराठवाड्यातील शेतकरी सध्या अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा सामना करीत आहेत़

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र