शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

प्रापंचिक दृष्टिभ्रम

By admin | Updated: January 12, 2015 01:22 IST

अध्यात्मतेजाची पूजा करणारी भारतीय संस्कृती! तिनं आत्मतेजाची आभाही जपली आहे. ज्ञानदिवटी हाती घेत ज्ञानपोत पाजळले आहेत.

कुमुद गोसावी - अध्यात्मतेजाची पूजा करणारी भारतीय संस्कृती! तिनं आत्मतेजाची आभाही जपली आहे. ज्ञानदिवटी हाती घेत ज्ञानपोत पाजळले आहेत. मात्र कधी कधी या उजेडातून जाणारी वाट जिथं संपते तिथं होतो दृष्टिभ्रम! मग ‘आपुलाचि आपण करीसी संवाद’ अशी मनोवस्था होते. मनाच्या विभ्रमात अडकल्यानं सत्याची कास सुटते. मन मृगजळामागे धावतं.शेतकरी आपल्या पिकाचं रक्षण व्हावं म्हणून शेतात बुजगावणं उभारतो, ते पक्ष्यांचा दृष्टिभ्रम व्हावा म्हणून! स्वत:च्या बुद्धिचातुर्याचाच हा उपयोग! विद्वत्तेच्या अहंकारानं माखलेल्या कविकुलगुरू कालिदासाला प्रवासात एकदा तहानेनं व्याकुळलेल्या अवस्थेत एका झोपडीत पाणी मागण्यासाठी जावं लागलं. तिथं स्वत:चा परिचय एका मुलीला तिनं विचारलं म्हणून, ‘मी एक प्रसिद्ध, बलवान मानव आहे’, असं उत्तर देताच ती मुलगी म्हणाली, ‘जगात दोनच बलवान आहेत - एक अन्न व दुसरं पाणी.’ मुलीचं उत्तर अचूक असल्याचा अनुभव कालिदास तहानेनं तडफडताना घेतच होता.कालिदास वरमला. आपण ‘वाटसरू’ आहोत असं सांगताच मुलीनं सांगितलं, ‘वाटसरू तर दोनच आहेत - एक सूर्य नि दुसरा चंद्र! जे अथकपणे मार्ग आक्रमित असतात! तुम्ही तर थकलेले दिसताय!’ एवढं बोलून ती तेथून निघून गेली. घशाला लागलेली कोरड कालिदासाला जणू जाणीव करून देत होती की, ‘अन्नपाण्याशिवाय आपण बलहीन ठरतो. विद्वत्ता नि व्यवहार यात फरक असतो तर!’ एक वृद्धा पाण्याची घागर घेऊन येताना दिसताच कालिदास मोठ्या आशेनं तिच्याकडं झेपावत, तिनं काही विचारायच्या आत म्हणाला, ‘आई, मी अतिशय तहानलेला पाहुणा आहे!’ त्यावर ती वृद्धा म्हणाली, ‘बेटा संसारात पाहुणे तर दोनच! एक धन व दुसरं तारुण्य. तेव्हा तू खरं सांग, तू कोण आहेस?’ पाण्याविना अंत होऊ नये म्हणून कालिदासानं सांगितलं, ‘मी सहनशील आहे.’ त्यावर ताडकन वृद्धेनं सुनावलं, ‘स्वत:ला विद्वान समजतोस नि असत्य बोलतोस. अरे! सहनशील तर दोनच! एक झाड, जे कुऱ्हाडीचे घाव सोसून माणसाला फळंच देत राहतात, सावलीत घेतात नि दुसरी पृथ्वी! तिचं पोट फाडून बी पेरलं तरी ते रुजवून अंकुरते, धान्य देते!’ हताश होऊन कालिदास शेवटी डोळ्यांत प्राण साठवून अगतिकतेनं म्हणतो, ‘आई, मी मूर्ख आहे.’ त्यावर वृद्धा म्हणते, ‘या दुनियेत दोनच मूर्ख आहेत! एक राजा व दुसरा पंडित. राजाला स्वस्तुती आवडते नि पंडिताला ती नाहक करावीशी वाटते. या दोघांएवढे कोण मूर्ख आहे, हे आता तूच सांग पाहू?’ कालिदासाचा अवघा अहंकार गळून पडला, दृष्टिभ्रमाचा पडदा दूर झाला! नाही का? याचि देही याचि डोळा । भोगीन मुक्तीचा सोहळा ।। असा अहंतारहित आनंदानुभव कोणाला नकोय?