शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रापंचिक दृष्टिभ्रम

By admin | Updated: January 12, 2015 01:22 IST

अध्यात्मतेजाची पूजा करणारी भारतीय संस्कृती! तिनं आत्मतेजाची आभाही जपली आहे. ज्ञानदिवटी हाती घेत ज्ञानपोत पाजळले आहेत.

कुमुद गोसावी - अध्यात्मतेजाची पूजा करणारी भारतीय संस्कृती! तिनं आत्मतेजाची आभाही जपली आहे. ज्ञानदिवटी हाती घेत ज्ञानपोत पाजळले आहेत. मात्र कधी कधी या उजेडातून जाणारी वाट जिथं संपते तिथं होतो दृष्टिभ्रम! मग ‘आपुलाचि आपण करीसी संवाद’ अशी मनोवस्था होते. मनाच्या विभ्रमात अडकल्यानं सत्याची कास सुटते. मन मृगजळामागे धावतं.शेतकरी आपल्या पिकाचं रक्षण व्हावं म्हणून शेतात बुजगावणं उभारतो, ते पक्ष्यांचा दृष्टिभ्रम व्हावा म्हणून! स्वत:च्या बुद्धिचातुर्याचाच हा उपयोग! विद्वत्तेच्या अहंकारानं माखलेल्या कविकुलगुरू कालिदासाला प्रवासात एकदा तहानेनं व्याकुळलेल्या अवस्थेत एका झोपडीत पाणी मागण्यासाठी जावं लागलं. तिथं स्वत:चा परिचय एका मुलीला तिनं विचारलं म्हणून, ‘मी एक प्रसिद्ध, बलवान मानव आहे’, असं उत्तर देताच ती मुलगी म्हणाली, ‘जगात दोनच बलवान आहेत - एक अन्न व दुसरं पाणी.’ मुलीचं उत्तर अचूक असल्याचा अनुभव कालिदास तहानेनं तडफडताना घेतच होता.कालिदास वरमला. आपण ‘वाटसरू’ आहोत असं सांगताच मुलीनं सांगितलं, ‘वाटसरू तर दोनच आहेत - एक सूर्य नि दुसरा चंद्र! जे अथकपणे मार्ग आक्रमित असतात! तुम्ही तर थकलेले दिसताय!’ एवढं बोलून ती तेथून निघून गेली. घशाला लागलेली कोरड कालिदासाला जणू जाणीव करून देत होती की, ‘अन्नपाण्याशिवाय आपण बलहीन ठरतो. विद्वत्ता नि व्यवहार यात फरक असतो तर!’ एक वृद्धा पाण्याची घागर घेऊन येताना दिसताच कालिदास मोठ्या आशेनं तिच्याकडं झेपावत, तिनं काही विचारायच्या आत म्हणाला, ‘आई, मी अतिशय तहानलेला पाहुणा आहे!’ त्यावर ती वृद्धा म्हणाली, ‘बेटा संसारात पाहुणे तर दोनच! एक धन व दुसरं तारुण्य. तेव्हा तू खरं सांग, तू कोण आहेस?’ पाण्याविना अंत होऊ नये म्हणून कालिदासानं सांगितलं, ‘मी सहनशील आहे.’ त्यावर ताडकन वृद्धेनं सुनावलं, ‘स्वत:ला विद्वान समजतोस नि असत्य बोलतोस. अरे! सहनशील तर दोनच! एक झाड, जे कुऱ्हाडीचे घाव सोसून माणसाला फळंच देत राहतात, सावलीत घेतात नि दुसरी पृथ्वी! तिचं पोट फाडून बी पेरलं तरी ते रुजवून अंकुरते, धान्य देते!’ हताश होऊन कालिदास शेवटी डोळ्यांत प्राण साठवून अगतिकतेनं म्हणतो, ‘आई, मी मूर्ख आहे.’ त्यावर वृद्धा म्हणते, ‘या दुनियेत दोनच मूर्ख आहेत! एक राजा व दुसरा पंडित. राजाला स्वस्तुती आवडते नि पंडिताला ती नाहक करावीशी वाटते. या दोघांएवढे कोण मूर्ख आहे, हे आता तूच सांग पाहू?’ कालिदासाचा अवघा अहंकार गळून पडला, दृष्टिभ्रमाचा पडदा दूर झाला! नाही का? याचि देही याचि डोळा । भोगीन मुक्तीचा सोहळा ।। असा अहंतारहित आनंदानुभव कोणाला नकोय?