शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अडवाणींची शोकांतिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:45 IST

प्रथम संघ, मग जनसंघ आणि अखेर भारतीय जनता पक्ष या साऱ्यांसाठी आयुष्य वेचलेल्या लालकृष्ण अडवाणी यांची मोदी व शहा यांनी जी बेमुर्वतखोर उपेक्षा केली ती अडवाणींच्या संयमी मौनाएवढीच मोदी व शहा यांच्या उद्दाम प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी आहे.

सारे आयुष्य पक्ष उभारत राहिलेल्या, त्याला विजयापर्यंत पोहोचविलेल्या अडवाणी या ज्येष्ठ व आदरणीय नेत्याविषयी मोदींनी जे उद्दामपण केले आणि त्यांना ज्या तºहेने वाळीत टाकले तो प्रकार केवळ संघ परिवारातीलच नव्हे तर बाहेरच्या लोकांनाही दु:खी करून गेला.

प्रथम संघ, मग जनसंघ आणि अखेर भारतीय जनता पक्ष या साऱ्यांसाठी आयुष्य वेचलेल्या लालकृष्ण अडवाणी यांची मोदी व शहा यांनी जी बेमुर्वतखोर उपेक्षा केली ती अडवाणींच्या संयमी मौनाएवढीच मोदी व शहा यांच्या उद्दाम प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी आहे. अडवाणींचा जन्म सिंधमधला. तो प्रदेश पाकिस्तानात जाण्याआधीच तेथे त्यांनी संघाचे काम सुरू केले. पुढे भारतात आल्यापासून त्यांनी वाजपेयींच्या जोडीने प्रथम जनसंघ व नंतर भाजप वाढविण्यासाठी अविश्रांत परिश्रम केले. १९९० च्या दशकात रथयात्रा काढून त्यांनी भाजपच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला व तो करतानाच स्वत:चे नाव मागे घेऊन पंतप्रधानपदाची माळ वाजपेयींच्या गळ्यात पडेल अशी व्यवस्था केली. पक्षात वाजपेयी आणि अडवाणी यांचा शब्द अखेरचा होता. २००४ मधील पक्षाच्या पराभवानंतरही ते पक्षाचे सर्वश्रेष्ठ नेते राहिले.

मोदींच्या नेतृत्वात गुजरातमध्ये मुस्लीमविरोधी हत्याकांड झाले तेव्हा त्यांना काढून टाकण्याचा आग्रह वाजपेयींनी धरला तेव्हा अडवाणींनीच त्यांना वाचविले. मात्र पक्षाने अडवाणींच्या या सेवेची बूज राखली नाही. त्यांना २०१९ च्या निवडणुकीत तिकीट दिले नाही. मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज यांच्यासह पक्षातील सतरा ज्येष्ठ नेत्यांना त्याने तिकिटावाचून घरी बसविले. अडवाणींचे मोठेपण असे की त्यांनी आपली उपेक्षा मुकाट्याने सहन केली. पक्षाविषयी व नेतृत्वाविषयी नाराजीच बोलून दाखवितानाही पक्षाचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली. आपला पक्ष आणि त्याच्या विचारांवर त्यांची किती निष्ठा होती ते यावरून दिसते. गेल्या पाच वर्षांत अडवाणी राजकीय व शासकीय कार्यक्रमांत फक्त उपस्थित होते. तेही मोदींसमोर हात जोडतानाच देशाला अनेकदा दिसले. सारे आयुष्य पक्ष उभारत राहिलेल्या, त्याला विजयापर्यंत पोहोचविलेल्या आणि देशाचे उपपंतप्रधानपद अनुभवलेल्या या ज्येष्ठ व आदरणीय नेत्याविषयी मोदींनी जे उद्दामपण केले आणि त्यांना ज्या तºहेने वाळीत टाकले तो प्रकार केवळ संघ परिवारातीलच नव्हे तर बाहेरच्या लोकांनाही दु:खी करून गेला. ‘तुम्हाला तिकीट देणार नाही’ हे त्यांना अखेरपर्यंत न सांगता तसेच ताटकळत ठेवण्याचा हा प्रकार त्यांनी अडवाणींएवढाच जोशी व महाजनांबाबतही केला. ज्या पक्षात स्मृती इराणीचे तिकीट प्रथम पक्के केले जाते, त्या पक्षात अडवाणींना अखेरपर्यंत ताटकळत ठेवले जाते हा प्रकार पक्षाच्या बदललेल्या संस्कृतीवर व त्याच्या बिघडलेल्या वृत्तीवरही प्रकाश टाकणारा आहे. वयाची नव्वदी उलटलेल्या नेत्याला साधा निरोप नाही, त्याचा सन्मान केल्याचे कुठे चित्र नाही आणि आपली नाराजी एकट्याने गिळत राहण्याखेरीज त्यांच्या वाट्याला काही येणार नाही अशी अवस्था करणारा पक्ष व त्याचे नेतृत्व कृतघ्नच म्हटले पाहिजे.

लोकसभेतील पक्षाची सदस्यसंख्या दोनवरून वाढवून नेत बहुमतापर्यंत नेणाऱ्या नेत्याच्या वाट्याला असे एकाकीपण येणे हीच एक गंभीर शोकांतिका आहे. तक्रार करण्याचे वय नाही, आक्रोश करण्याची क्षमता नाही आणि अन्यायाचा प्रतिकार करायचा तरी तो पुन्हा आपणच हाती धरून वाढविलेल्या लोकांचा. ही स्थिती मुकाट्याने सारे प्रहार सहन करण्याची व आतल्या आत जळत राहण्याची आहे. पक्ष व देश यांची एवढी सेवा करणाºया नेत्याच्या वाट्याला असा शेवट येणे ही आपल्या राजकारणात शिरलेल्या क्रूर व निर्ढावलेल्या वृत्तीवर प्रकाश टाकणारी बाब आहे. पूर्वीच्या नेत्यांचा संयमी मोठेपणा, त्यांच्या वागणुकीतले सुसंस्कृतपण आणि उपेक्षा सहन करण्याची व तरीही शांत राहण्याची त्यांची प्रौढ प्रवृत्ती या साऱ्यांवर प्रकाशझोत टाकणारी ही बाब आहे. अडवाणी हा आता एका मोठ्या राष्ट्रीय शोकांतिकेचा विषय व्हावा, एखाद्या प्रतिभावंताने त्यांच्या उदयावर, उभारीवर आणि आताच्या शोकांत अवस्थेवर काव्य लिहावे. अशी माणसे कोणत्याही विचाराची असली तरी ती विस्मरणात जाऊ नयेत. कृतज्ञ राष्ट्राने त्यांचे नेहमी स्मरण करावे हीच आपल्या परंपरेची व राष्ट्रीयतेची खरी शिकवण आहे.

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीBJPभाजपा