शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

अडवाणींची शोकांतिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:45 IST

प्रथम संघ, मग जनसंघ आणि अखेर भारतीय जनता पक्ष या साऱ्यांसाठी आयुष्य वेचलेल्या लालकृष्ण अडवाणी यांची मोदी व शहा यांनी जी बेमुर्वतखोर उपेक्षा केली ती अडवाणींच्या संयमी मौनाएवढीच मोदी व शहा यांच्या उद्दाम प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी आहे.

सारे आयुष्य पक्ष उभारत राहिलेल्या, त्याला विजयापर्यंत पोहोचविलेल्या अडवाणी या ज्येष्ठ व आदरणीय नेत्याविषयी मोदींनी जे उद्दामपण केले आणि त्यांना ज्या तºहेने वाळीत टाकले तो प्रकार केवळ संघ परिवारातीलच नव्हे तर बाहेरच्या लोकांनाही दु:खी करून गेला.

प्रथम संघ, मग जनसंघ आणि अखेर भारतीय जनता पक्ष या साऱ्यांसाठी आयुष्य वेचलेल्या लालकृष्ण अडवाणी यांची मोदी व शहा यांनी जी बेमुर्वतखोर उपेक्षा केली ती अडवाणींच्या संयमी मौनाएवढीच मोदी व शहा यांच्या उद्दाम प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी आहे. अडवाणींचा जन्म सिंधमधला. तो प्रदेश पाकिस्तानात जाण्याआधीच तेथे त्यांनी संघाचे काम सुरू केले. पुढे भारतात आल्यापासून त्यांनी वाजपेयींच्या जोडीने प्रथम जनसंघ व नंतर भाजप वाढविण्यासाठी अविश्रांत परिश्रम केले. १९९० च्या दशकात रथयात्रा काढून त्यांनी भाजपच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला व तो करतानाच स्वत:चे नाव मागे घेऊन पंतप्रधानपदाची माळ वाजपेयींच्या गळ्यात पडेल अशी व्यवस्था केली. पक्षात वाजपेयी आणि अडवाणी यांचा शब्द अखेरचा होता. २००४ मधील पक्षाच्या पराभवानंतरही ते पक्षाचे सर्वश्रेष्ठ नेते राहिले.

मोदींच्या नेतृत्वात गुजरातमध्ये मुस्लीमविरोधी हत्याकांड झाले तेव्हा त्यांना काढून टाकण्याचा आग्रह वाजपेयींनी धरला तेव्हा अडवाणींनीच त्यांना वाचविले. मात्र पक्षाने अडवाणींच्या या सेवेची बूज राखली नाही. त्यांना २०१९ च्या निवडणुकीत तिकीट दिले नाही. मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज यांच्यासह पक्षातील सतरा ज्येष्ठ नेत्यांना त्याने तिकिटावाचून घरी बसविले. अडवाणींचे मोठेपण असे की त्यांनी आपली उपेक्षा मुकाट्याने सहन केली. पक्षाविषयी व नेतृत्वाविषयी नाराजीच बोलून दाखवितानाही पक्षाचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली. आपला पक्ष आणि त्याच्या विचारांवर त्यांची किती निष्ठा होती ते यावरून दिसते. गेल्या पाच वर्षांत अडवाणी राजकीय व शासकीय कार्यक्रमांत फक्त उपस्थित होते. तेही मोदींसमोर हात जोडतानाच देशाला अनेकदा दिसले. सारे आयुष्य पक्ष उभारत राहिलेल्या, त्याला विजयापर्यंत पोहोचविलेल्या आणि देशाचे उपपंतप्रधानपद अनुभवलेल्या या ज्येष्ठ व आदरणीय नेत्याविषयी मोदींनी जे उद्दामपण केले आणि त्यांना ज्या तºहेने वाळीत टाकले तो प्रकार केवळ संघ परिवारातीलच नव्हे तर बाहेरच्या लोकांनाही दु:खी करून गेला. ‘तुम्हाला तिकीट देणार नाही’ हे त्यांना अखेरपर्यंत न सांगता तसेच ताटकळत ठेवण्याचा हा प्रकार त्यांनी अडवाणींएवढाच जोशी व महाजनांबाबतही केला. ज्या पक्षात स्मृती इराणीचे तिकीट प्रथम पक्के केले जाते, त्या पक्षात अडवाणींना अखेरपर्यंत ताटकळत ठेवले जाते हा प्रकार पक्षाच्या बदललेल्या संस्कृतीवर व त्याच्या बिघडलेल्या वृत्तीवरही प्रकाश टाकणारा आहे. वयाची नव्वदी उलटलेल्या नेत्याला साधा निरोप नाही, त्याचा सन्मान केल्याचे कुठे चित्र नाही आणि आपली नाराजी एकट्याने गिळत राहण्याखेरीज त्यांच्या वाट्याला काही येणार नाही अशी अवस्था करणारा पक्ष व त्याचे नेतृत्व कृतघ्नच म्हटले पाहिजे.

लोकसभेतील पक्षाची सदस्यसंख्या दोनवरून वाढवून नेत बहुमतापर्यंत नेणाऱ्या नेत्याच्या वाट्याला असे एकाकीपण येणे हीच एक गंभीर शोकांतिका आहे. तक्रार करण्याचे वय नाही, आक्रोश करण्याची क्षमता नाही आणि अन्यायाचा प्रतिकार करायचा तरी तो पुन्हा आपणच हाती धरून वाढविलेल्या लोकांचा. ही स्थिती मुकाट्याने सारे प्रहार सहन करण्याची व आतल्या आत जळत राहण्याची आहे. पक्ष व देश यांची एवढी सेवा करणाºया नेत्याच्या वाट्याला असा शेवट येणे ही आपल्या राजकारणात शिरलेल्या क्रूर व निर्ढावलेल्या वृत्तीवर प्रकाश टाकणारी बाब आहे. पूर्वीच्या नेत्यांचा संयमी मोठेपणा, त्यांच्या वागणुकीतले सुसंस्कृतपण आणि उपेक्षा सहन करण्याची व तरीही शांत राहण्याची त्यांची प्रौढ प्रवृत्ती या साऱ्यांवर प्रकाशझोत टाकणारी ही बाब आहे. अडवाणी हा आता एका मोठ्या राष्ट्रीय शोकांतिकेचा विषय व्हावा, एखाद्या प्रतिभावंताने त्यांच्या उदयावर, उभारीवर आणि आताच्या शोकांत अवस्थेवर काव्य लिहावे. अशी माणसे कोणत्याही विचाराची असली तरी ती विस्मरणात जाऊ नयेत. कृतज्ञ राष्ट्राने त्यांचे नेहमी स्मरण करावे हीच आपल्या परंपरेची व राष्ट्रीयतेची खरी शिकवण आहे.

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीBJPभाजपा