शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

देशाचे उपपंतप्रधानपद व गृहमंत्रिपद भूषविणारे दयनीय अडवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:43 IST

सत्तेतली पदे गेली की मोठी माणसेही किती अगतिक आणि लाचार होतात याचे लालकृष्ण अडवाणींएवढे मोठे वा लहान उदाहरण दुसरे नाही. परवा अहमदाबादला झालेल्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्यात दिसलेले त्यांचे चित्र कमालीचे दयनीय व दीनवाणे होते.

सत्तेतली पदे गेली की मोठी माणसेही किती अगतिक आणि लाचार होतात याचे लालकृष्ण अडवाणींएवढे मोठे वा लहान उदाहरण दुसरे नाही. परवा अहमदाबादला झालेल्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्यात दिसलेले त्यांचे चित्र कमालीचे दयनीय व दीनवाणे होते. एकेकाळी भाजपाचे अध्यक्षपद भूषविलेला आणि आपल्या सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेने सारा देश ढवळून काढणारा हा नेता आज कोणाच्याही खिजगणतीत नाही. कोणी त्याला विचारत नाहीत, पक्षातील पुढारी त्याच्याकडे पाहत नाहीत आणि संघाच्या नजरेतही ते निकामी झाले आहेत. रथयात्रेच्या काळात अडवाणींचे नाव पंतप्रधानपदासाठी सर्वात पुढे होते. त्यांच्या पत्नी कमलादेवी यांनी त्या काळात ‘भावी पंतप्रधानांची पत्नी म्हणून मला कसे वाटते’ या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरही दिले होते. पुढच्या काळात अडवाणींनी वाजपेयींचे नाव पुढे करून मनाचा मोठेपणा दाखविला. वाजपेयी पंतप्रधान आणि अडवाणी उपपंतप्रधान झाले. मात्र २००४ च्या निवडणुका त्यांच्या पक्षाला जिंकता आल्या नाहीत आणि त्यांना विरोधात बसावे लागले. विरोधी नेते म्हणूनही त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका बजावली. मात्र २००९ च्या निवडणुकीत त्यांना पुन: पराभव पहावा लागला. येथून त्यांचे ग्रह फिरले. प्रथम संघाने त्यांना पक्षाध्यक्षपद सोडायला लावून त्यांच्याजागी नितीन गडकरी यांची नियुक्ती केली. लोकसभेतील त्यांचे विरोधी पक्ष नेतेपदही पक्षाने काढले व ते सुषमा स्वराज यांना दिले. पुढे गडकरी पायउतार झाल्यानंतरही संघाने अडवाणींचा विचार केला नाही. त्याने ते पद राजनाथसिंगांना दिले. २०१४ ची निवडणूक ही त्यांची अखेरची संधी होती. पण ती त्यांच्याकडून मोदींनी हिरावली. या निवडणुकीत अडवाणींना भोपाळमधून लोकसभेवर निवडून जायचे होते परंतु मोदींनी त्यांना अहमदाबादेत बांधून ठेवले. नंतरच्या काळात त्यांची नुसती उपेक्षाच झाली. त्यांना राष्टÑपतिपद नाकारले गेले. पक्षात ज्याचा सल्ला घेतला जात नाही अशा एका सल्लागार किंवा मार्गदर्शक मंडळावर त्यांची नियुक्ती झाली आणि आता तर त्यांचा सल्ला कोणी घेतही नाही. त्यांना कोणी भेटत नाही आणि त्यांनाही कुणाला बहुधा भेटावेसे वाटत नाही. आपले नाव व जुने नेतृत्व याची ओळख टिकवायला ते कोणत्या ना कोणत्या समारंभात दिसतात. मात्र त्यातही त्यांची कोणी वास्तपुस्त करताना दिसत नाही. मध्यंतरी राहुल गांधींनी त्यांच्याशी विमानतळावर चर्चा केली तेव्हा त्याच्या विपर्यस्त बातम्याच तेवढ्या भाजपाच्या माध्यमांनी प्रकाशित केल्या. तेव्हापासूून विपक्ष नाही आणि स्वपक्षही नाही. अडवाणी एकटे आहेत. देशाचे राजकारण दीर्घकाळपर्यंत करणारा, त्यात मध्यवर्ती म्हणावी अशी भूमिका बजावणारा, देशाचे उपपंतप्रधानपद व गृहमंत्रिपद भूषविणारा आणि आता सर्वच पक्षांना समान आदरणीय वाटणारा हा नेता सध्या कुठे दिसला तरी दयनीय वाटावा अशी त्याची स्थिती आहे. सत्ता ही एक अविश्वसनीय आणि कृतघ्न अशी बाब आहे. ती नव्यांचा आदर जेवढ्या जोरात करते तेवढ्याच जोरात ती जुन्यांना विसरते. अडवाणींच्या वाट्याला सत्तेचे हे कृतघ्नपण आले आहे. त्यांनी आत्मचरित्र लिहिले. पण ते गाजले नाही. त्यातल्या चुकीच्या बाबींचीच चर्चा फार झाली. त्यातून मोदींच्या सरकारने त्यांना अयोध्या प्रकरणात आरोपींच्या रांगेत उभे केले आहे. तो खटला दीर्घकाळ चालेल आणि त्याचा निकाल आरोपींच्या बाजूनेच दिला जाईल हे उघड आहे. पण देशाचा राष्टÑीय राहिलेला नेता त्याच्या अखेरच्या काळात ‘आरोपी’ म्हणून उभा असलेला दिसावा, साºयांनी त्याची उपेक्षा करावी आणि हे सारे त्याला मुकाटपणे सहन करताना पहावे लागावे ही स्थितीच कमालीची वेदनादायक आहे. त्यांच्या चाहत्यांना ती जेवढी दु:खदायी तेवढीच त्यांच्या विरोधकांनाही खिन्न करणारी आहे.

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणी