शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

आदित्यचा भाजपाला सल्ला..!

By अतुल कुलकर्णी | Updated: January 17, 2018 02:55 IST

दादरला भाजपा पक्ष पदाधिकाºयांच्या बैठकीत एका कार्यकर्त्याने त्याच्या भावना व्यक्त करणारे पत्र लिहून आणले. ते पत्र प्रदेशाध्यक्षांनी वाचून दाखवले, ते असे...

(दादरला भाजपा पक्ष पदाधिकाºयांच्या बैठकीत एका कार्यकर्त्याने त्याच्या भावना व्यक्त करणारे पत्र लिहून आणले. ते पत्र प्रदेशाध्यक्षांनी वाचून दाखवले, ते असे...)नेते मंडळीहो,नमस्कार. झालेल्या मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला मंत्रिपदाच्या खुर्च्या मिळाल्या आहेतच. आता तीळगूळपण आमचाच घ्या आणि जमलं तर आमच्याशी थोड कडूपण बोला... तुमच्या एवढ्या गोड बोलण्याची आम्हाला सवय लागली तर पुढं कसं होणार आमचं. मी पक्षाच्या बैठकीला निघालो तर वाटेत आदित्य ठाकरे भेटले. मला काय काय सांगू लागले... ते ऐकून काय प्रतिक्रिया द्यावी हे मला काही कळलं नाही. आपण सगळे ज्येष्ठ नेते जमणारच आहात तर तेव्हा आदित्यनी जे काय सांगितलं ते तुमच्या कानावर घालावं म्हणून हा पत्रप्रपंच. त्यावर आपणच योग्य ते मार्गदर्शन केलं तर बरे. आदित्य, गिरीश बापटांचे खूप कौतुक करत होते. म्हणाले तुमच्याकडे एकमेव दिव्यदृष्टी प्राप्त असणारा नेता तेवढाचयं... बापटांनी सांगून टाकलयं, की वर्षभरात सरकार बदलणार आहेच, जे काय मागायंच ते आत्ताच मागून टाका... पण तुम्ही काही कार्यकर्ते, पदाधिकाºयांचे फार मनावर घेऊ नका. काही कुणाला द्यायची गरज नाही असा सल्ला दिलाय आदित्यनी. ते म्हणाले, महामंडळं, विशेष कार्यकारी अधिकारी अशा अनेक गोष्टी असतानाही तीन वर्षे तुम्हाला कोणी काही मागीतलं का? आता उरलेल्या दीड वर्षातही तुम्हाला कुणीही काहीही मागणार नाही, तुम्हीदेखील काही देण्याच्या भानगडीत पडू नये. दीड वर्षात तुम्ही काय देणार आणि आम्ही कार्यकर्ते काय घेणार? तेव्हा देण्याघेण्याच्या गोष्टी बाजूलाच राहू द्याव्यात असा त्यांचा सल्ला आहे. मलाही पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तो पटलाय. उगाच नको ते व्यवहार कशाला?पक्ष कसा वाढवायचा यासाठी आपण बैठक घेत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन करायला सांगितलं आदित्यनी मला. पण ते असंही म्हणाले, की पक्ष वाढवण्यासाठी तुमच्या कुणाचीही गरज उरलेली नाही. कार्य सिद्धीस नेण्यास ‘मामु’ (माननीय मुख्यमंत्री) समर्थ आहेत. ते एकटेच दिवसातील सगळे तास सतत काम करत असतात. त्यांनी एक सर्वे केलाय म्हणे. त्यात असं लक्षात आलंय की, तुम्ही केलेले घोळ दुरुस्त करण्यातच त्यांचा जास्त वेळ जातोय. तेव्हा तुम्ही जेवढे कमी घोटाळे कराल तेवढा जास्त वेळ ‘मामु’ना विधायक कामांसाठी मिळेल असा त्यांचा सल्ला होता. परवा तर म्हणे, ‘मामु’नी एका मंत्र्याला बोलावून सांगितले म्हणे, की तुमच्या मुलाला, पीएसला व ओएसडीला एकदम शांत बसायला सांगा नाहीतर तुमचा खडसे करून टाकीन... हे खरं की खोटं, की ‘मामु’बद्दल उगाच वावड्या आहेत ते पण तपासून घ्या. जाता जाता आदित्य असंही म्हणाले की, आपल्या पक्षात म्हणे पाच दहा हजारांची सभा घेणारा एकही नेता नाही. त्यावर मी त्याला सुधीरभाऊ, पंकजाताई अशी काही नावं सांगितली तर तो म्हणतो, ते अपवाद सोडून सभा गाजवणारा, भाषणं गाजवणारा एकपण नेता आपल्याकडे उरला नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर पण रावसाहेबांना विचारा काय करायचं ते. बाकी काळजी नको. आपले सगळे आमदार बसल्या जागी आरामात निवडून येणार आहेतच...

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपा