शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

खरेच न्याय झाला?

By admin | Updated: December 10, 2015 23:47 IST

सलमान खान, त्याचे कुटुंब आणि त्याचे अगणित चाहते यांना गुरुवारच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे नक्कीच हायसे वाटले असणार यात शंका नाही.

सलमान खान, त्याचे कुटुंब आणि त्याचे अगणित चाहते यांना गुरुवारच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे नक्कीच हायसे वाटले असणार यात शंका नाही. तेरा वर्षे एका मानसिक तणावाखाली वावरल्यानंतर आणि आपल्या शिरावरील मनुष्यहत्त्येचा डाग धुऊन निघाल्यानंतर कोणालाही हायसे वाटणारच. पण हा डाग धुऊन निघताना खरोखरीच न्याय झाला का हा प्रश्न मात्र शिल्लकच राहणार आहे. सप्टेंबर २००२मध्ये सलमान ज्या मोटारीतून मुंबई शहरात प्रवास करीत होता त्या मोटारीला वान्द्रे परिसरात अपघात होऊन त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य चौघे जखमी झाले. सत्र न्यायालयाने समोर आलेले पुरावे आणि साक्षी लक्षात घेऊन कामगाराच्या मृत्युस सलमान जबाबदार असल्याचे मान्य केले व गेल्या मे महिन्यात त्यास पाच वर्षांची शिक्षाही सुनावली. या शिक्षेविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली असता न्या.ए.आर.जोशी यांनी त्याची सर्व आरोपांमधून मुक्तता केली. सत्र न्यायालयास जे पुरावे शिक्षा करण्यासाठी पर्याप्त वाटले ते पुरावे आणि घेतल्या गेलेल्या साक्षी निर्विवादपणे सलमानचा कथित गुन्हा सिद्ध करु शकत नाहीत असे न्या. जोशी यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. याचा ठपका अर्थातच सदर प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेवर जातो. ज्या वाहनास अपघात झाला ते वाहन स्वत: सलमान चालवीत होता का, तसे करताना त्याने मद्यप्राशन केले होते का, टायर फुटण्यामुळे त्याच्या वाहनाला अपघात झाला की अपघातानंतर ते फुटले आणि जो कामगार मरण पावला तो नेमका सलमानच्या मोटारीखालीच मयत झाला का क्रेनखाली दबून मेला, या चार मुद्यांच्या भोवतीच सारा तपास आणि सारा खटला फिरत राहिला. त्यात सलमानच्या संरक्षणासाठी तैनात पोलीस रवीन्द्र पाटील (कालांतराने त्याचे निधन झाले) अपघाताच्या वेळी सलमानसोबतच असल्याने त्याच्या साक्षीला सत्र न्यायालयाने महत्व दिले. पण उच्च न्यायालयाने त्याची साक्षच अविश्वासार्ह ठरविली. चार जखमींच्या साक्षीमध्येही वरिष्ठ न्यायालयास विसंगती आढळून आली. पोलिसांच्या एकूणच कामगिरीवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असून गुन्हेगाराचा गुन्हा निर्विवादपणे सिद्ध करण्याची जी जबाबदारी तपासी यंत्रणेवर असते ती नीट पार पाडली गेली नाही असे म्हटले आहे. याचा सारांशात मतलब इतकाच की सलमान खानला संशयाचा लाभ मिळाला असून असा संशय निर्माण करण्याचे कार्य पोलिसांनी केले आहे. तरीही जे पुरावे त्याला दोषी ठरविण्यास पुरेसे असतात तेच पुढे निरुपयोगी सिद्ध होतात तेव्हां या प्रकरणात खरोखरीच न्याय झाला की नाही हा प्रश्न शिल्लक राहतोच.