शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

खरेच न्याय झाला?

By admin | Updated: December 10, 2015 23:47 IST

सलमान खान, त्याचे कुटुंब आणि त्याचे अगणित चाहते यांना गुरुवारच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे नक्कीच हायसे वाटले असणार यात शंका नाही.

सलमान खान, त्याचे कुटुंब आणि त्याचे अगणित चाहते यांना गुरुवारच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे नक्कीच हायसे वाटले असणार यात शंका नाही. तेरा वर्षे एका मानसिक तणावाखाली वावरल्यानंतर आणि आपल्या शिरावरील मनुष्यहत्त्येचा डाग धुऊन निघाल्यानंतर कोणालाही हायसे वाटणारच. पण हा डाग धुऊन निघताना खरोखरीच न्याय झाला का हा प्रश्न मात्र शिल्लकच राहणार आहे. सप्टेंबर २००२मध्ये सलमान ज्या मोटारीतून मुंबई शहरात प्रवास करीत होता त्या मोटारीला वान्द्रे परिसरात अपघात होऊन त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य चौघे जखमी झाले. सत्र न्यायालयाने समोर आलेले पुरावे आणि साक्षी लक्षात घेऊन कामगाराच्या मृत्युस सलमान जबाबदार असल्याचे मान्य केले व गेल्या मे महिन्यात त्यास पाच वर्षांची शिक्षाही सुनावली. या शिक्षेविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली असता न्या.ए.आर.जोशी यांनी त्याची सर्व आरोपांमधून मुक्तता केली. सत्र न्यायालयास जे पुरावे शिक्षा करण्यासाठी पर्याप्त वाटले ते पुरावे आणि घेतल्या गेलेल्या साक्षी निर्विवादपणे सलमानचा कथित गुन्हा सिद्ध करु शकत नाहीत असे न्या. जोशी यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. याचा ठपका अर्थातच सदर प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेवर जातो. ज्या वाहनास अपघात झाला ते वाहन स्वत: सलमान चालवीत होता का, तसे करताना त्याने मद्यप्राशन केले होते का, टायर फुटण्यामुळे त्याच्या वाहनाला अपघात झाला की अपघातानंतर ते फुटले आणि जो कामगार मरण पावला तो नेमका सलमानच्या मोटारीखालीच मयत झाला का क्रेनखाली दबून मेला, या चार मुद्यांच्या भोवतीच सारा तपास आणि सारा खटला फिरत राहिला. त्यात सलमानच्या संरक्षणासाठी तैनात पोलीस रवीन्द्र पाटील (कालांतराने त्याचे निधन झाले) अपघाताच्या वेळी सलमानसोबतच असल्याने त्याच्या साक्षीला सत्र न्यायालयाने महत्व दिले. पण उच्च न्यायालयाने त्याची साक्षच अविश्वासार्ह ठरविली. चार जखमींच्या साक्षीमध्येही वरिष्ठ न्यायालयास विसंगती आढळून आली. पोलिसांच्या एकूणच कामगिरीवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असून गुन्हेगाराचा गुन्हा निर्विवादपणे सिद्ध करण्याची जी जबाबदारी तपासी यंत्रणेवर असते ती नीट पार पाडली गेली नाही असे म्हटले आहे. याचा सारांशात मतलब इतकाच की सलमान खानला संशयाचा लाभ मिळाला असून असा संशय निर्माण करण्याचे कार्य पोलिसांनी केले आहे. तरीही जे पुरावे त्याला दोषी ठरविण्यास पुरेसे असतात तेच पुढे निरुपयोगी सिद्ध होतात तेव्हां या प्रकरणात खरोखरीच न्याय झाला की नाही हा प्रश्न शिल्लक राहतोच.