शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

खरेच न्याय झाला?

By admin | Updated: December 10, 2015 23:47 IST

सलमान खान, त्याचे कुटुंब आणि त्याचे अगणित चाहते यांना गुरुवारच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे नक्कीच हायसे वाटले असणार यात शंका नाही.

सलमान खान, त्याचे कुटुंब आणि त्याचे अगणित चाहते यांना गुरुवारच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे नक्कीच हायसे वाटले असणार यात शंका नाही. तेरा वर्षे एका मानसिक तणावाखाली वावरल्यानंतर आणि आपल्या शिरावरील मनुष्यहत्त्येचा डाग धुऊन निघाल्यानंतर कोणालाही हायसे वाटणारच. पण हा डाग धुऊन निघताना खरोखरीच न्याय झाला का हा प्रश्न मात्र शिल्लकच राहणार आहे. सप्टेंबर २००२मध्ये सलमान ज्या मोटारीतून मुंबई शहरात प्रवास करीत होता त्या मोटारीला वान्द्रे परिसरात अपघात होऊन त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य चौघे जखमी झाले. सत्र न्यायालयाने समोर आलेले पुरावे आणि साक्षी लक्षात घेऊन कामगाराच्या मृत्युस सलमान जबाबदार असल्याचे मान्य केले व गेल्या मे महिन्यात त्यास पाच वर्षांची शिक्षाही सुनावली. या शिक्षेविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली असता न्या.ए.आर.जोशी यांनी त्याची सर्व आरोपांमधून मुक्तता केली. सत्र न्यायालयास जे पुरावे शिक्षा करण्यासाठी पर्याप्त वाटले ते पुरावे आणि घेतल्या गेलेल्या साक्षी निर्विवादपणे सलमानचा कथित गुन्हा सिद्ध करु शकत नाहीत असे न्या. जोशी यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. याचा ठपका अर्थातच सदर प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेवर जातो. ज्या वाहनास अपघात झाला ते वाहन स्वत: सलमान चालवीत होता का, तसे करताना त्याने मद्यप्राशन केले होते का, टायर फुटण्यामुळे त्याच्या वाहनाला अपघात झाला की अपघातानंतर ते फुटले आणि जो कामगार मरण पावला तो नेमका सलमानच्या मोटारीखालीच मयत झाला का क्रेनखाली दबून मेला, या चार मुद्यांच्या भोवतीच सारा तपास आणि सारा खटला फिरत राहिला. त्यात सलमानच्या संरक्षणासाठी तैनात पोलीस रवीन्द्र पाटील (कालांतराने त्याचे निधन झाले) अपघाताच्या वेळी सलमानसोबतच असल्याने त्याच्या साक्षीला सत्र न्यायालयाने महत्व दिले. पण उच्च न्यायालयाने त्याची साक्षच अविश्वासार्ह ठरविली. चार जखमींच्या साक्षीमध्येही वरिष्ठ न्यायालयास विसंगती आढळून आली. पोलिसांच्या एकूणच कामगिरीवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असून गुन्हेगाराचा गुन्हा निर्विवादपणे सिद्ध करण्याची जी जबाबदारी तपासी यंत्रणेवर असते ती नीट पार पाडली गेली नाही असे म्हटले आहे. याचा सारांशात मतलब इतकाच की सलमान खानला संशयाचा लाभ मिळाला असून असा संशय निर्माण करण्याचे कार्य पोलिसांनी केले आहे. तरीही जे पुरावे त्याला दोषी ठरविण्यास पुरेसे असतात तेच पुढे निरुपयोगी सिद्ध होतात तेव्हां या प्रकरणात खरोखरीच न्याय झाला की नाही हा प्रश्न शिल्लक राहतोच.