शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
3
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
4
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
5
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
6
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
7
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
8
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
9
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
10
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
11
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
12
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
13
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
14
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
15
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
16
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
17
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
18
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
19
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
20
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..

‘कथनी’प्रमाणेच कृतीही हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 02:17 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी, हिंदुस्तान हा फक्त हिंदू धर्मीयांचाच नव्हे तर इतर धर्माच्या लोकांचादेखील आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी, हिंदुस्तान हा फक्त हिंदू धर्मीयांचाच नव्हे तर इतर धर्माच्या लोकांचादेखील आहे, असे वक्तव्य केले अन् लगेच राजकीय, सामाजिक वर्तुळातील विविध विचारधारांमधील धुरिणांच्या भुवया उंचावल्या. गेल्या काही काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने सामाजिक समरसता मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य येणे यात फारसे आश्चर्य वाटण्याचे तसे तर कारण नाही. मात्र एकीकडे संघाचे स्वयंसेवक ‘एक गाव एक स्मशानभूमी’, ‘एक गाव-एक पाणवठा’ अशी मोहीम राबवत असताना संघ परिवारातीलच काही संघटनांकडून सामाजिक समरसतेच्या भूमिकेला छेद देण्याचे काम सुरू आहे. काही संघटनांचे नेते धर्म व पंथाच्या नावावर जहाल वक्तव्य करताना दिसून येतात. कधी गोरक्षेच्या नावावर इतर धर्मियांवर हल्ले होताना दिसतात, तर कुठे अमुक एका समाजाचा आहे, म्हणून त्याचे शोषण अद्यापदेखील सुरू असल्याचे डोळ्यात अंजन घालणारे चित्र समोर येते. विशेष म्हणजे या संघटना किंवा व्यक्तींना लगाम घालण्यासाठी ठोस पावले उचलल्याचे ऐकिवात नाही. खुद्द सरसंघचालकांनीदेखील आरक्षणासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे देशात मोठा वैचारिक वाद निर्माण झाला होता. त्यामुळे एकाच विचारधारेतून ‘कथनी’ आणि ‘करणी’ यांच्यातील तफावत स्पष्टपणे जाणवते.देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली असली तरी अद्यापही समाजात भेदभाव कायम आहे, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. महासत्ता व्हायचे असेल तर जनतेला आपल्या डोक्यातून आणि मनातून भेदभाव हा शब्द कायमचा खोडून टाकावा लागेल. यासाठी केवळ शासन, नेते किंवा पक्ष यांनी पुढाकार घेऊन काहीही होणार नाही. यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणून त्यांची प्रगती करण्यासाठी समाजाकडून एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. संघाची कार्यप्रणाली व त्यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार लक्षात घेता, समाजात या गोष्टी समर्पकपणे पोहोचविण्यासाठी ते मौलिक वाटा उचलू शकतात. परंतु एकीकडे सामाजिक समरसता मोहिमेचा डंका पिटायचा आणि दुसरीकडे आरक्षणावर फेरविचार करा, असे जाहीरपणे बोलायचे, अशी विरोधाभासी भूमिका मांडण्याचे प्रकार थांबवावे लागतील. खºया अर्थाने जर देशात सामाजिक समरसता नांदावी आणि हिंदुस्तान नव्हे तर ‘एकात्मिक भारत’ अशी ओळख जगासमोर जावी, असे संघाला वाटत असेल तर ‘कथनी’ प्रमाणे त्याच आशयाची कृतीदेखील अपेक्षित आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत