शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

‘कथनी’प्रमाणेच कृतीही हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 02:17 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी, हिंदुस्तान हा फक्त हिंदू धर्मीयांचाच नव्हे तर इतर धर्माच्या लोकांचादेखील आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी, हिंदुस्तान हा फक्त हिंदू धर्मीयांचाच नव्हे तर इतर धर्माच्या लोकांचादेखील आहे, असे वक्तव्य केले अन् लगेच राजकीय, सामाजिक वर्तुळातील विविध विचारधारांमधील धुरिणांच्या भुवया उंचावल्या. गेल्या काही काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने सामाजिक समरसता मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य येणे यात फारसे आश्चर्य वाटण्याचे तसे तर कारण नाही. मात्र एकीकडे संघाचे स्वयंसेवक ‘एक गाव एक स्मशानभूमी’, ‘एक गाव-एक पाणवठा’ अशी मोहीम राबवत असताना संघ परिवारातीलच काही संघटनांकडून सामाजिक समरसतेच्या भूमिकेला छेद देण्याचे काम सुरू आहे. काही संघटनांचे नेते धर्म व पंथाच्या नावावर जहाल वक्तव्य करताना दिसून येतात. कधी गोरक्षेच्या नावावर इतर धर्मियांवर हल्ले होताना दिसतात, तर कुठे अमुक एका समाजाचा आहे, म्हणून त्याचे शोषण अद्यापदेखील सुरू असल्याचे डोळ्यात अंजन घालणारे चित्र समोर येते. विशेष म्हणजे या संघटना किंवा व्यक्तींना लगाम घालण्यासाठी ठोस पावले उचलल्याचे ऐकिवात नाही. खुद्द सरसंघचालकांनीदेखील आरक्षणासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे देशात मोठा वैचारिक वाद निर्माण झाला होता. त्यामुळे एकाच विचारधारेतून ‘कथनी’ आणि ‘करणी’ यांच्यातील तफावत स्पष्टपणे जाणवते.देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली असली तरी अद्यापही समाजात भेदभाव कायम आहे, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. महासत्ता व्हायचे असेल तर जनतेला आपल्या डोक्यातून आणि मनातून भेदभाव हा शब्द कायमचा खोडून टाकावा लागेल. यासाठी केवळ शासन, नेते किंवा पक्ष यांनी पुढाकार घेऊन काहीही होणार नाही. यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणून त्यांची प्रगती करण्यासाठी समाजाकडून एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. संघाची कार्यप्रणाली व त्यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार लक्षात घेता, समाजात या गोष्टी समर्पकपणे पोहोचविण्यासाठी ते मौलिक वाटा उचलू शकतात. परंतु एकीकडे सामाजिक समरसता मोहिमेचा डंका पिटायचा आणि दुसरीकडे आरक्षणावर फेरविचार करा, असे जाहीरपणे बोलायचे, अशी विरोधाभासी भूमिका मांडण्याचे प्रकार थांबवावे लागतील. खºया अर्थाने जर देशात सामाजिक समरसता नांदावी आणि हिंदुस्तान नव्हे तर ‘एकात्मिक भारत’ अशी ओळख जगासमोर जावी, असे संघाला वाटत असेल तर ‘कथनी’ प्रमाणे त्याच आशयाची कृतीदेखील अपेक्षित आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत