शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

संचित : ‘ठिणगी’ जिवंत राहावी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 3:54 AM

अनेकांच्या हृदयात ठिणगी पेटते ती याच काळात. तीच मग तुमचं भविष्य ठरवते. आयुष्यात कुणीच कायमचं सुखी किंवा कायमचं दु:खी राहू शकत नाही; पण जास्तीत जास्त काळ तुम्हाला सुखी राहायचं असेल तर ते ठरतं तुमच्यातल्या याच ठिणगीतून, स्पार्कमधून..

- चेतन भगत

आयुष्यातले काही दिवस असे असतात, जेव्हा तुम्ही खरोखरच खूप खुश असता, आनंदी असता. एका अनोख्या अशा मस्तीत आपण जगत असतो. त्याचवेळी भविष्यातली स्वप्नंही आपल्या मनात रेंगाळत असतात. हे दिवस असतात, कॉलेजचे दिवस. आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचा असा हा काळ. तुम्ही कोण आहात, भविष्यात तुम्ही कोणत्या ठिकाणी असाल, कोणती उंची तुम्ही गाठाल, हे सर्व ठरतं ते याच दिवसांत.अनेकांच्या हृदयात ठिणगी पेटते ती याच काळात. तीच मग तुमचं भविष्य ठरवते. आयुष्यात कुणीच कायमचं सुखी किंवा कायमचं दु:खी राहू शकत नाही; पण जास्तीत जास्त काळ तुम्हाला सुखी राहायचं असेल तर ते ठरतं तुमच्यातल्या याच ठिणगीतून, स्पार्कमधून..कुठून होते या ठिणगीची सुरुवात? खरं तर आपल्या जन्मापासूनच ती आपल्यासोबत असते आणि पुढेही आयुष्यभर राहते. या ठिणगीचा तुम्ही कसा वापर करता, यावर भविष्यात तुम्ही कुठे उभं असाल हे ठरतं. जेव्हा मी तरुणांकडे पाहतो, तेव्हा त्यांच्यात मला ऊर्जा ठसठसून भरलेली दिसते. याच्या अगदी उलट म्हणजे वय झालेली लोकं. त्यांच्यात ना कुठली ऊर्जा दिसते, ना इच्छाशक्ती. याचाच अर्थ जसजसं आपलं वय वाढत जातं, तसतसं आपल्यातलं चैतन्य हरवायला लागतं. त्यासाठीच हे चैतन्य टिकवून ठेवणं महत्त्वाचं. आपल्यातली ही ऊर्जा वाचवायची आणि वाढवायची कशी? - ही ऊर्जा म्हणजे जणू दिव्याची ज्योत. ती कायम पेटती राहायला हवी असेल तर तिचं संगोपन करावं लागतं, काळजी घ्यावी लागते, वारा, वावटळापासून तिला वाचवावं लागतं. सतत इंधन पुरवत राहावं लागतं. ही ऊर्जा आणि इंधन आपल्याला मिळतं ते ध्येयामुळे. ते उत्तुंग असलं, तर म्हातारं होण्याचं तुम्हाला भय नाही. अनेकजण कालांतरानं आपली ऊर्जा फक्त पैशासाठी वापरायला लागतात; पण पैसा हेच आयुष्यात सर्वस्व नाही. तसं असतं, तर जगातल्या मोठमोठ्या, श्रीमंत लोकांना क्रियाशील राहण्याची गरजच पडली नसती.