शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

हा तर शैक्षणिक दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 05:26 IST

शिष्यवृत्ती घोटाळ्यात नामुष्की ओढवल्यानंतर विदर्भातील शैक्षणिक संस्था सरकारच्या रडारवर आल्या. हायकोर्टाने याप्रकरणी सरकारी यंत्रणा आणि शैक्षणिक संस्थांना धारेवर धरले

शिष्यवृत्ती घोटाळ्यात नामुष्की ओढवल्यानंतर विदर्भातील शैक्षणिक संस्था सरकारच्या रडारवर आल्या. हायकोर्टाने याप्रकरणी सरकारी यंत्रणा आणि शैक्षणिक संस्थांना धारेवर धरले. या प्रकरणाचा फटका मात्र प्रामाणिक शैक्षणिक संस्था आणि लाखो गोरगरीब विद्यार्थ्यांना बसला. या सर्व प्र्रकाराचा बोध घेऊन शिक्षण विभाग आणि शैक्षणिक संस्थांच्या कामकाजात सुधारणा होण्याची अपेक्षा होती. मात्र शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौैकशी सुरू असताना नागपुरातील काही शैक्षणिक संस्थांचे शालेय अनुदानावर दरोडा टाकण्याचे काम सुरू होते. १२ शाळांनी २ कोटी ९५ लाख ३६ हजार ८८२ रुपयांचा दरोडा टाकला आहे. तरीही या प्रकरणात खिसा गरम झाल्याने शिक्षण विभागातील बड्या अधिकाऱ्यांनी काही घडले नसल्याचा आव आणत चौैकशीची फाईल कपाटबंद केली. आता विजय गुप्ता या सामाजिक कार्यकर्त्याने या घोटाळ्याचा भंडाफोड केल्यानंतर विदर्भाच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. केवळ अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना शिक्षण विभागातील अधिकाºयांनी संस्थाचालकांशी साटेलोटे करीत बनावट दस्तऐवजाच्या बळावर ६० टक्के अनुदानाने वेतन लाटले. राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी यासंदर्भात तत्कालीन शिक्षण संचालक, शिक्षण अधिकारी, शिक्षण विभागातील कर्मचारी यांच्यासह संस्थाचालक, मालक अशा ३८ लोकांवर शिस्तभंगाची कारवाई करीत फौजदारी कारवाई करण्याची शिफारस केली असली तरी वर्षभरापासून या प्रकरणात काही एक प्रशासकीय हालचाली होत नसल्याने या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१३-१४ मध्ये शासनातर्फे नागपुरातील १२ शाळांना शैक्षणिक अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले. नियमानुसार या शाळांना अनुदान २०,४०,६०,८० टक्के याक्रमाणे वाटप न करता २०१४ पासूनच थेट ६० टक्के अनुदान देण्यात आले. हे अनुदान देताना शासन निर्णयात फेरफार करून खोटे व बनावटी अनुदान पत्र तयार करण्याचे कारस्थान रचण्यात आले. त्याचबरोबर या शाळांत ४३ पदे मंजूर असताना संस्थाचालकांनी ५० शिक्षकांची पदे भरली. यासंदर्भातील विजय गुप्ता यांच्या तक्रारीनंतर राज्याच्या प्रधान सचिवांनी शिक्षण आयुक्तांच्या मार्गदर्शनात सात सदस्यीय समितीने २१ ते २३ जुलै २०१७ या काळात प्रकरणाची चौकशी केली. याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याची बाब लक्षात आल्यावर चुकीने हे घडल्याचे दर्शविण्यासाठी शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाºयाने वरिष्ठांची परवानगी न घेता ७ लाख ३९ हजार रुपयांची वसुलीही केली. मुळात शिष्यवृत्ती घोटाळ्यात एसआयटीची स्थापना झाल्यानंतर जसे कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारल्याचे उघड झाले तसाच प्रकार शैक्षणिक अनुदान वाटपात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधी पक्ष याप्रकरणी पावसाळी अधिवेशनातसरकारची कोंडी करणार की मौन धारण करून गप्प बसणार याकडे आता साºयांचे लक्ष लागले आहे.