शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

हा तर शैक्षणिक दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 05:26 IST

शिष्यवृत्ती घोटाळ्यात नामुष्की ओढवल्यानंतर विदर्भातील शैक्षणिक संस्था सरकारच्या रडारवर आल्या. हायकोर्टाने याप्रकरणी सरकारी यंत्रणा आणि शैक्षणिक संस्थांना धारेवर धरले

शिष्यवृत्ती घोटाळ्यात नामुष्की ओढवल्यानंतर विदर्भातील शैक्षणिक संस्था सरकारच्या रडारवर आल्या. हायकोर्टाने याप्रकरणी सरकारी यंत्रणा आणि शैक्षणिक संस्थांना धारेवर धरले. या प्रकरणाचा फटका मात्र प्रामाणिक शैक्षणिक संस्था आणि लाखो गोरगरीब विद्यार्थ्यांना बसला. या सर्व प्र्रकाराचा बोध घेऊन शिक्षण विभाग आणि शैक्षणिक संस्थांच्या कामकाजात सुधारणा होण्याची अपेक्षा होती. मात्र शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौैकशी सुरू असताना नागपुरातील काही शैक्षणिक संस्थांचे शालेय अनुदानावर दरोडा टाकण्याचे काम सुरू होते. १२ शाळांनी २ कोटी ९५ लाख ३६ हजार ८८२ रुपयांचा दरोडा टाकला आहे. तरीही या प्रकरणात खिसा गरम झाल्याने शिक्षण विभागातील बड्या अधिकाऱ्यांनी काही घडले नसल्याचा आव आणत चौैकशीची फाईल कपाटबंद केली. आता विजय गुप्ता या सामाजिक कार्यकर्त्याने या घोटाळ्याचा भंडाफोड केल्यानंतर विदर्भाच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. केवळ अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना शिक्षण विभागातील अधिकाºयांनी संस्थाचालकांशी साटेलोटे करीत बनावट दस्तऐवजाच्या बळावर ६० टक्के अनुदानाने वेतन लाटले. राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी यासंदर्भात तत्कालीन शिक्षण संचालक, शिक्षण अधिकारी, शिक्षण विभागातील कर्मचारी यांच्यासह संस्थाचालक, मालक अशा ३८ लोकांवर शिस्तभंगाची कारवाई करीत फौजदारी कारवाई करण्याची शिफारस केली असली तरी वर्षभरापासून या प्रकरणात काही एक प्रशासकीय हालचाली होत नसल्याने या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१३-१४ मध्ये शासनातर्फे नागपुरातील १२ शाळांना शैक्षणिक अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले. नियमानुसार या शाळांना अनुदान २०,४०,६०,८० टक्के याक्रमाणे वाटप न करता २०१४ पासूनच थेट ६० टक्के अनुदान देण्यात आले. हे अनुदान देताना शासन निर्णयात फेरफार करून खोटे व बनावटी अनुदान पत्र तयार करण्याचे कारस्थान रचण्यात आले. त्याचबरोबर या शाळांत ४३ पदे मंजूर असताना संस्थाचालकांनी ५० शिक्षकांची पदे भरली. यासंदर्भातील विजय गुप्ता यांच्या तक्रारीनंतर राज्याच्या प्रधान सचिवांनी शिक्षण आयुक्तांच्या मार्गदर्शनात सात सदस्यीय समितीने २१ ते २३ जुलै २०१७ या काळात प्रकरणाची चौकशी केली. याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याची बाब लक्षात आल्यावर चुकीने हे घडल्याचे दर्शविण्यासाठी शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाºयाने वरिष्ठांची परवानगी न घेता ७ लाख ३९ हजार रुपयांची वसुलीही केली. मुळात शिष्यवृत्ती घोटाळ्यात एसआयटीची स्थापना झाल्यानंतर जसे कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारल्याचे उघड झाले तसाच प्रकार शैक्षणिक अनुदान वाटपात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधी पक्ष याप्रकरणी पावसाळी अधिवेशनातसरकारची कोंडी करणार की मौन धारण करून गप्प बसणार याकडे आता साºयांचे लक्ष लागले आहे.