शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

कोकणातही एक वाडी, तिथे शाकाहाराची गोडी; अख्खं गाव शाकाहारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 06:58 IST

'शाकाहारा'वर एकमत बदलत्या काळात मांसाहार आणि व्यसनाधीनतेचा प्रभाव वाढत असताना कांगवईमध्ये अठरापगड जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.

हरिहर पांडे, नागपूर

जिथे समुद्रातील आणि खाडीतील मासळीची रेलचेल आहे, अशा कोकण किनारपट्टीवरच्या गावात एक अख्खीच्या अख्खी वाडी वर्षानुवर्षे शाकाहाराचे पालन करते, ही गोष्ट तशी न पटणारीच. पण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कांगवई गावातील गवळवाडीने हा अनोखा आदर्श लोकांसमोर ठेवला आहे. गेली साधारण ६४ वर्षे हे अनोखे व्रत या वाडीतील प्रत्येक पिढीने जपले आहे आणि अजूनही जपले जात आहे. कदाचित हे कोकणातील एकमेव उदाहरण असावे. प्रत्येक भूभागात सहज उपलब्ध असणारे पदार्थ हे तेथील आहाराचा मुख्य भाग असतात. कोकणाला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असल्याने मासे हे कोकणातील बहुतांश लोकांचे मुख्य अन्न आहे.

कोकणाच्या असंख्य वैशिष्ट्यांमध्ये मासे हे इथले वैशिष्ट्य आहे. पण मत्स्याहाराच्या या खवय्येगिरीतही कांगवई गावातील 'गवळवाडी' पूर्णतः शाकाहारी आहे. या वस्तीने आपले 'शुद्ध शाकाहारी पण वर्षानुवर्षे टिकवून ठेवले आहे. निसर्गरम्य वनराई आणि डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं रत्नागिरी जिल्ह्यातील कांगवई गाव. ह समुद्रकिनाऱ्याहून १६ किमी अंतरावर वसलेलं. या गावात मांसाहार, र किंवा मद्यपान केलेच जात नाही. त्यामुळे वाडीत त्याची मत्स्याहार विक्रीही होत नाही. अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. चांगल्या समाजासाठी मांस, मासे, दारू सोडणे आवश्यक असल्याचे येथील वयोवृद्ध सांगतात. इतर खेड्याप्रमाणेच येथील बहुतांश युवा मंडळी कामधंदा आणि नोकरीनिमित्त मोठ्या शहरात असूनही आपला हा 'शाकाहार वसा कटाक्षाने जपत आहेत.

'शाकाहारा'वर एकमत बदलत्या काळात मांसाहार आणि व्यसनाधीनतेचा प्रभाव वाढत असताना कांगवईमध्ये अठरापगड जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. ते आपापल्या प्रथा-परंपरा पाळतातच; पण त्याचबरोबर शाकाहाराची परंपराही पाळत आहेत. भिन्न विचार अन् भिन्न रुचीची माणसे एका गावात नांदतानाही शाकाहारावर मात्र त्यांचे एकमत आहे.

चक्रधर स्वामींच्या विचारांचा प्रभाव २ गावाचा इतिहास सांगताना शांताराम महाडिक व रघुनाथ महागावकर सांगतात की, गावातील गणपत भिकाजी महाडिक यांनी १९५९ साली महानुभाव पंथाचा उपदेश घेतल्यानंतर हा परिसर व्यसनापासून दूर राहावा, यावर भर दिला. त्यांनी मुंबईच्या प्रभादेवी येथील श्री गीता पाठशाळेचे संचालक बाळकृष्ण म्हस्के (म्हस्के भाऊ) यांच्या मार्गदर्शनात गावकऱ्यांना जगण्याची योग्य दिशा दाखवली. गावातील प्रत्येकावर श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचा प्रभाव अजूनही कायम आहे. गवळवाडी सहर्ष स्वागत करीत आहे २ गणपत महाडिक, बाळकृष्ण म्हस्के यांनी महानुभाव पंथाची दीक्षा दादांच्या प्रबोधनामुळे शंभर कुटुंबे असलेल्या घेतली.

बाळकृष्णदादांच्या गवळवाडीत नव्वद कुटुंबांनी महानुभाव पंथाचा उपदेश घेतला. ३ गावात २५ मे १९७६ रोजी महानुभाव श्रीकृष्ण ज्ञान मंदिराची स्थापना झाली. बाळकृष्णदादाच्या मार्गदर्शनात दरवर्षी १३ व १४ मे रोजी मंदिराचा वार्षिकोत्सव गेली ४७ वर्षे साजरा केला जातो. महानुभावांचे परमेश्वर अवतार असलेले श्रीकृष्ण, श्रीदत्तात्रेय प्रभू, श्रीचक्रपाणी महाराज, श्री गोविंदप्रभू आणि श्री चक्रधर स्वामी पाचही अवताराची जयंती गावात उत्साहात साजरी होते,