शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विशेष लेख: हिंदू ऐक्य व विश्वसामंजस्याची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 09:47 IST

Hinduism: २२ जानेवारी २०२४च्या सकाळी, ‘सिया-राम’चे नामस्मरण करत, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाचे विधी सुरू होते. हा प्रसंग पाहात असताना केवळ विविधता नव्हे, तर ऐक्यही दिसून आले. शैव, शाक्त, वैष्णव, स्वामिनारायण, जैन, शीख, ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधव.. सर्वांनी एकच ओळख अनुभवली, ती म्हणजे ‘भारतीय’ म्हणून. हाच भारताचा मार्ग आहे. विविध धर्म, पंथ, देवतारूपे, भाषा, अन्नसंस्कृती आणि समुदाय यांचा संगम.

- स्वामी ब्रह्मविहारीदासकाहीजण धर्माला विघटनकारी मानतात; पण माझ्या अनुभवात हिंदू परंपरा ही एकात्मतेची प्रेरक ठरली आहे. २२ जानेवारी २०२४च्या सकाळी, ‘सिया-राम’चे नामस्मरण करत, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाचे विधी सुरू होते. हा प्रसंग पाहात असताना केवळ विविधता नव्हे, तर ऐक्यही दिसून आले. शैव, शाक्त, वैष्णव, स्वामिनारायण, जैन, शीख, ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधव.. सर्वांनी एकच ओळख अनुभवली, ती म्हणजे ‘भारतीय’ म्हणून. हाच भारताचा मार्ग आहे. विविध धर्म, पंथ, देवतारूपे, भाषा, अन्नसंस्कृती आणि समुदाय यांचा संगम.

हिंदू धर्मात चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी आणि स्वामिनारायण जयंती एकत्र साजरी केली जाते. अयोध्येतील त्या दिवशीच्या सकाळचा प्रसंग मी आज अबूधाबीमध्ये असतानाही अंतःकरणात अनुभवतो आहे. हिंदू सनातन परंपरेत विविध संप्रदायांची हजारो वर्षांची परंपरा आहे. या भिन्नतेतून एकतेचे अधिष्ठान जन्माला आले आहे. वेगवेगळ्या भागातील जनतेला, वेगवेगळ्या भाषांतून, त्या त्या काळात धर्माचे सार्वत्रिक तत्त्वज्ञान प्राप्त झाले. श्रीराम हे मर्यादेचे, शिस्तीचे व सर्वांप्रति आदराचे प्रतीक ठरले. मी त्यांची कथा प्रथम बालपणात, अमर चित्रकथा मालिकेत वाचली. नंतर भारत, युरोप आणि मध्य-पूर्वेत प्रवचनांमधून ती पुन्हा पुन्हा सांगितली.

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील छपय्या या गावात श्री स्वामिनारायण यांचा जन्म झाला. दरवर्षी लाखो भाविक त्यांच्या शिकवणीस मान देण्यासाठी येथे येतात. केवळ अकराव्या वर्षी घर सोडून त्यांनी संपूर्ण भारताची यात्रा केली. शेवटी ते गुजरातमध्ये स्थायिक झाले. तेथे त्यांच्या सभेत भक्त, तत्त्वज्ञ, राजकीय व सामाजिक प्रतिनिधी, विविध सांस्कृतिक प्रवाहांचे कलावंत, सर्वांसाठी खुले व्यासपीठ होते. हे संवाद २७३ शिकवणींच्या ‘वचनामृत’ ग्रंथात संकलित झाले आहेत.

श्रीस्वामिनारायणांनी श्रीराम व श्रीकृष्ण या दोन परमावतारांना वंदन करून त्यांच्या शिकवणीचा प्रचार केला. हीच ‘अवतार’ संकल्पना. विविधतेतून एकता साधणे हे हिंदू तत्त्वज्ञानाचे खरे सार आहे. त्यांचे कार्य केवळ धर्मशिक्षणापुरते मर्यादित नव्हते, स्त्रियांचे स्थान उंचावण्यासाठी त्यांनी समाजसुधारणाही केल्या. कन्हैयालाल मुंशीसारख्या इतिहासकारांनी त्यांची स्तुती केली आहे. समाजातील अस्पृश्यता, अंधश्रद्धा व रूढी यांचे त्यांनी प्रभावी निर्मूलन केले. त्यांच्या शिकवणींनी भारतच नव्हे तर जगभरातील हिंदू अस्मितेला बळ दिले. आज न्यू जर्सीतील स्वामिनारायण अक्षरधाम, अबूधाबीतील भव्य बाप्स हिंदू मंदिर व दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील नवीन बाप्स मंदिर ही ठिकाणे हिंदू तत्त्वज्ञानाची शिकवण कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवतात.

या मंदिरात, जिथे मी सध्या अबूधाबीतील मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याखाली बसलो आहे, श्रीराम, श्री स्वामिनारायण आणि अनेक देवतांचे एकत्रित वंदन होते. येथे केवळ स्वामिनारायण अनुयायांनाच नव्हे, तर सर्व भाविकांना मग तो कोणत्याही धर्माचा असो, स्वागत व आशीर्वाद मिळतो. येथे फक्त प्रेम, शांती व सामंजस्य शिकवले जाते, जे आज जगाला अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे हिंदू धर्माचे मूलभूत मूल्य येथे प्रत्यक्ष अनुभवता येते.(लेखक अबूधाबी येथील हिंदू बाप्स मंदिराच्या निर्मिती व व्यवस्थापनाचे प्रमुख आहेत.)

टॅग्स :HinduहिंदूHinduismहिंदुइझम