शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

विशेष लेख: हिंदू ऐक्य व विश्वसामंजस्याची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 09:47 IST

Hinduism: २२ जानेवारी २०२४च्या सकाळी, ‘सिया-राम’चे नामस्मरण करत, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाचे विधी सुरू होते. हा प्रसंग पाहात असताना केवळ विविधता नव्हे, तर ऐक्यही दिसून आले. शैव, शाक्त, वैष्णव, स्वामिनारायण, जैन, शीख, ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधव.. सर्वांनी एकच ओळख अनुभवली, ती म्हणजे ‘भारतीय’ म्हणून. हाच भारताचा मार्ग आहे. विविध धर्म, पंथ, देवतारूपे, भाषा, अन्नसंस्कृती आणि समुदाय यांचा संगम.

- स्वामी ब्रह्मविहारीदासकाहीजण धर्माला विघटनकारी मानतात; पण माझ्या अनुभवात हिंदू परंपरा ही एकात्मतेची प्रेरक ठरली आहे. २२ जानेवारी २०२४च्या सकाळी, ‘सिया-राम’चे नामस्मरण करत, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाचे विधी सुरू होते. हा प्रसंग पाहात असताना केवळ विविधता नव्हे, तर ऐक्यही दिसून आले. शैव, शाक्त, वैष्णव, स्वामिनारायण, जैन, शीख, ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधव.. सर्वांनी एकच ओळख अनुभवली, ती म्हणजे ‘भारतीय’ म्हणून. हाच भारताचा मार्ग आहे. विविध धर्म, पंथ, देवतारूपे, भाषा, अन्नसंस्कृती आणि समुदाय यांचा संगम.

हिंदू धर्मात चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी आणि स्वामिनारायण जयंती एकत्र साजरी केली जाते. अयोध्येतील त्या दिवशीच्या सकाळचा प्रसंग मी आज अबूधाबीमध्ये असतानाही अंतःकरणात अनुभवतो आहे. हिंदू सनातन परंपरेत विविध संप्रदायांची हजारो वर्षांची परंपरा आहे. या भिन्नतेतून एकतेचे अधिष्ठान जन्माला आले आहे. वेगवेगळ्या भागातील जनतेला, वेगवेगळ्या भाषांतून, त्या त्या काळात धर्माचे सार्वत्रिक तत्त्वज्ञान प्राप्त झाले. श्रीराम हे मर्यादेचे, शिस्तीचे व सर्वांप्रति आदराचे प्रतीक ठरले. मी त्यांची कथा प्रथम बालपणात, अमर चित्रकथा मालिकेत वाचली. नंतर भारत, युरोप आणि मध्य-पूर्वेत प्रवचनांमधून ती पुन्हा पुन्हा सांगितली.

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील छपय्या या गावात श्री स्वामिनारायण यांचा जन्म झाला. दरवर्षी लाखो भाविक त्यांच्या शिकवणीस मान देण्यासाठी येथे येतात. केवळ अकराव्या वर्षी घर सोडून त्यांनी संपूर्ण भारताची यात्रा केली. शेवटी ते गुजरातमध्ये स्थायिक झाले. तेथे त्यांच्या सभेत भक्त, तत्त्वज्ञ, राजकीय व सामाजिक प्रतिनिधी, विविध सांस्कृतिक प्रवाहांचे कलावंत, सर्वांसाठी खुले व्यासपीठ होते. हे संवाद २७३ शिकवणींच्या ‘वचनामृत’ ग्रंथात संकलित झाले आहेत.

श्रीस्वामिनारायणांनी श्रीराम व श्रीकृष्ण या दोन परमावतारांना वंदन करून त्यांच्या शिकवणीचा प्रचार केला. हीच ‘अवतार’ संकल्पना. विविधतेतून एकता साधणे हे हिंदू तत्त्वज्ञानाचे खरे सार आहे. त्यांचे कार्य केवळ धर्मशिक्षणापुरते मर्यादित नव्हते, स्त्रियांचे स्थान उंचावण्यासाठी त्यांनी समाजसुधारणाही केल्या. कन्हैयालाल मुंशीसारख्या इतिहासकारांनी त्यांची स्तुती केली आहे. समाजातील अस्पृश्यता, अंधश्रद्धा व रूढी यांचे त्यांनी प्रभावी निर्मूलन केले. त्यांच्या शिकवणींनी भारतच नव्हे तर जगभरातील हिंदू अस्मितेला बळ दिले. आज न्यू जर्सीतील स्वामिनारायण अक्षरधाम, अबूधाबीतील भव्य बाप्स हिंदू मंदिर व दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील नवीन बाप्स मंदिर ही ठिकाणे हिंदू तत्त्वज्ञानाची शिकवण कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवतात.

या मंदिरात, जिथे मी सध्या अबूधाबीतील मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याखाली बसलो आहे, श्रीराम, श्री स्वामिनारायण आणि अनेक देवतांचे एकत्रित वंदन होते. येथे केवळ स्वामिनारायण अनुयायांनाच नव्हे, तर सर्व भाविकांना मग तो कोणत्याही धर्माचा असो, स्वागत व आशीर्वाद मिळतो. येथे फक्त प्रेम, शांती व सामंजस्य शिकवले जाते, जे आज जगाला अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे हिंदू धर्माचे मूलभूत मूल्य येथे प्रत्यक्ष अनुभवता येते.(लेखक अबूधाबी येथील हिंदू बाप्स मंदिराच्या निर्मिती व व्यवस्थापनाचे प्रमुख आहेत.)

टॅग्स :HinduहिंदूHinduismहिंदुइझम