शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

समाजमन धास्तावणारी खून मालिका

By किरण अग्रवाल | Updated: November 6, 2022 12:15 IST

A series of murders that frighten the society : सद्यस्थितीत ढिसाळ बनलेली रात्रीची गस्त परत पूर्ववत होणे गरजेचे आहे.

- किरण अग्रवाल

गेल्या आठवड्यात अकोल्यामध्ये एकापाठोपाठ एक खुनाच्या घटना घडल्याने पोलिसांचा धाक ओसरत चालल्याचा अर्थ काढला जात आहे. कोरोनानंतर गतिशील झालेले अकोल्यातील अर्थकारण अबाधित राखण्यासाठी येथील निर्भयता कायम राखणे गरजेचे आहे. नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यासाठी सक्त होणे अपेक्षित आहे.

 

नवीन पोलीस अधिकारी बदलून येतात तेव्हा संबंधित यंत्रणा अधिक सतर्क होतात व साहेबाचा अंदाज घेतात, असा आजवरचा अनुभव आहे; पण अकोल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक बदलून येताच असे का झाले की अवघ्या आठवडाभरात चार खून व दोन प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांची त्यांना सलामी लाभली? शहरात सैल झालेली नाकाबंदी यानिमित्ताने नजरेत भरणे स्वाभाविक ठरले आहे.

 

अकोल्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारून संदीप घुगे यांना अजून महिनाही झालेला नाही, त्यात एकापाठोपाठ एक असे चार खून व दोन प्राणघातक हल्ल्यांच्या घटना घडून आल्या आहेत. तीन-चार महिन्यांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची कापशीत नेऊन हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असताना व त्याचे अद्याप धागेदोरे हाती लागलेले नसताना या नवीन घटना घडल्या आहेत. या घटनांची प्राथमिक पार्श्वभूमी बघता त्यामागे गॅंगवॉर किंवा ठरवून कट केल्यासारखी माहिती अजून तरी हाती नाही. वैयक्तिक वादातूनच त्या घडल्याचे सांगितले जात असल्याने थेट कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचे भलेही म्हणता येऊ नये, परंतु लागोपाठच्या या प्रकारांमुळे समाजमन धास्तावले आहे हे मात्र नक्की.

 

तसेही अकोला शहर व जिल्ह्यातील अवैध, अनधिकृत धंदे थांबलेले नाहीत. वरली मटका, जुगार सुरूच आहे. रोज संबंधितांवर कारवाया होतात, पण यात चेलेचपाटेच पकडले जातात, मोठे मासे सहीसलामत दिसतात. बंदी असली तरी तरुणाईला व्यसनाधीन करणारा गुटखाही मोठ्या प्रमाणात शहरात येतोच आहे. स्थानिक पोलिसांच्या नजरेस न पडलेला 50 लाखांचा गुटखा अलीकडेच पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने जप्त केला, यावरून येथल्या पोलिसांचे लक्ष आहे कुठे असा प्रश्न उपस्थित व्हावा. यावरून संबंधित गुन्हे शोध पथक निलंबित करण्याची नामुष्की ओढवली, परंतु हे इतकेच नाही; मागे शेगावात घडलेल्या सोने चोरी प्रकरणात चक्क पोलिसांकडूनच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले गेल्याचे आरोप झाले व न्यायालयाच्या आदेशाने चार पोलिसांवर गुन्हे दाखल करावे लागले. अर्थात याबाबतीत या चार जणांखेरीज अन्य कोण सहभागी होते हे अजून गुलदस्त्यात आहे हा भाग वेगळा, परंतु पोलिसांकडूनच कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याची उदाहरणे कमी नाहीत.

 

अकोला फार काही डेव्हलप झाले नाही, परंतु हे शहर प्रारंभापासून ''बिझनेस हब'' आहे. वैद्यकीय सुविधांमुळे पंचक्रोशीतील शेकडो रुग्ण व सोबत त्यांचे नातेवाईक प्रतिदिनी अकोल्यात येतात. येथील जनतेच्या धार्मिक आस्था प्रगाढ आहेत. दूरवरून शिक्षण, कोचिंगसाठी येथे असंख्य विद्यार्थी येतात, राहतात. यादृष्टीने या शहरातील निर्भयता महत्वाची आहे. असामाजिक कार्यात लिप्त राहून या निर्भयतेला नख लावणाऱ्यांना मोक्का लावून व तडीपार करून आटोक्यात ठेवण्याची भूमिका आतापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती, तीच यापुढेही कायम राखली जाणे अपेक्षित आहे. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडण्याच्या वाढत्या घटना पाहता जी. श्रीधर यांनी रात्रीची नाकाबंदी वाढविली होती, त्याने चौका चौकातील हुल्लडबाजी काहीशी आटोक्यात आली होती. सद्यस्थितीत ढिसाळ बनलेली रात्रीची गस्त परत पूर्ववत होणे गरजेचे आहे.

 

नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे राज्य राखीव पोलीस दलातून आले असले तरी तत्पूर्वी त्यांनी मालेगाव (नाशिक) सारख्या संवेदनशील शहरात कोरोना काळात रस्त्यावर उतरून काम केले आहे. त्यावेळी पुत्र जन्माचा आनंद बाजूस ठेवून त्यांनी तेथे सेवा दिल्याचे बघावयास मिळाले होते. तेथील त्यांची धडाडी पाहता अकोल्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पोलिसांचा धाक कमी होणार नाही व चौकात वाढदिवसाचे केक कापून दादागिरी प्रदर्शित करू पाहणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना कर्तव्यकठोर व्हावे लागेल, त्याखेरीज अकोल्यात निर्भयता साकारणार नाही.