शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

समाजमन धास्तावणारी खून मालिका

By किरण अग्रवाल | Updated: November 6, 2022 12:15 IST

A series of murders that frighten the society : सद्यस्थितीत ढिसाळ बनलेली रात्रीची गस्त परत पूर्ववत होणे गरजेचे आहे.

- किरण अग्रवाल

गेल्या आठवड्यात अकोल्यामध्ये एकापाठोपाठ एक खुनाच्या घटना घडल्याने पोलिसांचा धाक ओसरत चालल्याचा अर्थ काढला जात आहे. कोरोनानंतर गतिशील झालेले अकोल्यातील अर्थकारण अबाधित राखण्यासाठी येथील निर्भयता कायम राखणे गरजेचे आहे. नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यासाठी सक्त होणे अपेक्षित आहे.

 

नवीन पोलीस अधिकारी बदलून येतात तेव्हा संबंधित यंत्रणा अधिक सतर्क होतात व साहेबाचा अंदाज घेतात, असा आजवरचा अनुभव आहे; पण अकोल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक बदलून येताच असे का झाले की अवघ्या आठवडाभरात चार खून व दोन प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांची त्यांना सलामी लाभली? शहरात सैल झालेली नाकाबंदी यानिमित्ताने नजरेत भरणे स्वाभाविक ठरले आहे.

 

अकोल्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारून संदीप घुगे यांना अजून महिनाही झालेला नाही, त्यात एकापाठोपाठ एक असे चार खून व दोन प्राणघातक हल्ल्यांच्या घटना घडून आल्या आहेत. तीन-चार महिन्यांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची कापशीत नेऊन हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असताना व त्याचे अद्याप धागेदोरे हाती लागलेले नसताना या नवीन घटना घडल्या आहेत. या घटनांची प्राथमिक पार्श्वभूमी बघता त्यामागे गॅंगवॉर किंवा ठरवून कट केल्यासारखी माहिती अजून तरी हाती नाही. वैयक्तिक वादातूनच त्या घडल्याचे सांगितले जात असल्याने थेट कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचे भलेही म्हणता येऊ नये, परंतु लागोपाठच्या या प्रकारांमुळे समाजमन धास्तावले आहे हे मात्र नक्की.

 

तसेही अकोला शहर व जिल्ह्यातील अवैध, अनधिकृत धंदे थांबलेले नाहीत. वरली मटका, जुगार सुरूच आहे. रोज संबंधितांवर कारवाया होतात, पण यात चेलेचपाटेच पकडले जातात, मोठे मासे सहीसलामत दिसतात. बंदी असली तरी तरुणाईला व्यसनाधीन करणारा गुटखाही मोठ्या प्रमाणात शहरात येतोच आहे. स्थानिक पोलिसांच्या नजरेस न पडलेला 50 लाखांचा गुटखा अलीकडेच पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने जप्त केला, यावरून येथल्या पोलिसांचे लक्ष आहे कुठे असा प्रश्न उपस्थित व्हावा. यावरून संबंधित गुन्हे शोध पथक निलंबित करण्याची नामुष्की ओढवली, परंतु हे इतकेच नाही; मागे शेगावात घडलेल्या सोने चोरी प्रकरणात चक्क पोलिसांकडूनच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले गेल्याचे आरोप झाले व न्यायालयाच्या आदेशाने चार पोलिसांवर गुन्हे दाखल करावे लागले. अर्थात याबाबतीत या चार जणांखेरीज अन्य कोण सहभागी होते हे अजून गुलदस्त्यात आहे हा भाग वेगळा, परंतु पोलिसांकडूनच कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याची उदाहरणे कमी नाहीत.

 

अकोला फार काही डेव्हलप झाले नाही, परंतु हे शहर प्रारंभापासून ''बिझनेस हब'' आहे. वैद्यकीय सुविधांमुळे पंचक्रोशीतील शेकडो रुग्ण व सोबत त्यांचे नातेवाईक प्रतिदिनी अकोल्यात येतात. येथील जनतेच्या धार्मिक आस्था प्रगाढ आहेत. दूरवरून शिक्षण, कोचिंगसाठी येथे असंख्य विद्यार्थी येतात, राहतात. यादृष्टीने या शहरातील निर्भयता महत्वाची आहे. असामाजिक कार्यात लिप्त राहून या निर्भयतेला नख लावणाऱ्यांना मोक्का लावून व तडीपार करून आटोक्यात ठेवण्याची भूमिका आतापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती, तीच यापुढेही कायम राखली जाणे अपेक्षित आहे. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडण्याच्या वाढत्या घटना पाहता जी. श्रीधर यांनी रात्रीची नाकाबंदी वाढविली होती, त्याने चौका चौकातील हुल्लडबाजी काहीशी आटोक्यात आली होती. सद्यस्थितीत ढिसाळ बनलेली रात्रीची गस्त परत पूर्ववत होणे गरजेचे आहे.

 

नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे राज्य राखीव पोलीस दलातून आले असले तरी तत्पूर्वी त्यांनी मालेगाव (नाशिक) सारख्या संवेदनशील शहरात कोरोना काळात रस्त्यावर उतरून काम केले आहे. त्यावेळी पुत्र जन्माचा आनंद बाजूस ठेवून त्यांनी तेथे सेवा दिल्याचे बघावयास मिळाले होते. तेथील त्यांची धडाडी पाहता अकोल्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पोलिसांचा धाक कमी होणार नाही व चौकात वाढदिवसाचे केक कापून दादागिरी प्रदर्शित करू पाहणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना कर्तव्यकठोर व्हावे लागेल, त्याखेरीज अकोल्यात निर्भयता साकारणार नाही.