शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
3
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
4
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
5
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
6
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
7
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
8
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टरने अडीच वर्षीय मुलाच्या डोळ्याजवळील जखमेवर लावलं फेविक्विक
10
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
11
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
12
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
13
Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या
14
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
16
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
17
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
18
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
19
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
20
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

थोडी वजाबाकी झाली...पण पुष्कळसे गणित बेरजेचेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2022 10:35 IST

प्रदेश, धर्म, जात, लिंग, भाषा यावरून कटुता आणि संघर्ष उत्पन्न करणाऱ्या कारवायांपासून दूर राहणे हाच आपला संकल्प असला पाहिजे!

- प्रवीण दीक्षित

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निकट जात असताना देशातल्या प्रत्येक नागरिकाने अंतर्मुख होणे स्वाभाविकच आहे.  स्वातंत्र्य मिळाल्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून आपल्या शेजारी देशांकडून  वारंवार युद्धे लादली गेली. आपले इरादे सफल होत नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी सीमावर्ती प्रदेश, किनारपट्टीवरून प्रवेश करून दहशतवादी हल्ले करायला सुरुवात केली. हे एक प्रकारचे छुपे युद्धच होते.

भारताला अस्थिर करण्याचा हेतू त्यामागे होता. घृणास्पद अशा जातीय दंगली या प्रवृत्तींनी भडकविल्या. त्यात कित्येकांचे प्राण गेले. तेवढ्याने समाधान न झाल्याने त्यांनी देशात अमली पदार्थांच्या मार्फत दहशतवाद पसरवला. गेल्या एका वर्षातच ‘नार्कोटिक्स ब्युरो ऑफ इंडिया’ने ३० हजार किलो हेरॉईन पकडले. यातून तरुणांचे आयुष्य बरबाद तर होतेच, शिवाय अमली पदार्थांच्या व्यापारातून निर्माण होणारा पैसा  घातक शस्त्रांची चोरटी आयात करण्यासाठी वापरला जातो. व्यक्तिगत तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सायबर हल्ले चालूच आहेत. म्हणून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उंबरठ्यावर आपण आपल्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या जवानांना सलाम केला पाहिजे.

आंतरराष्ट्रीय कारस्थानांमुळे स्वातंत्र्याच्या पहिल्या २५ ते ३० वर्षातच देशावर  अनेक  हल्ले झाले. त्या काळात प्रगत देशांनी आपल्याला संरक्षण आणि सुरक्षेसंबंधीचे आधुनिक तंत्रज्ञान दिले नाही. त्या काळात देशाला अन्न, पाणी, आरोग्य, अन्य सुविधा, वीज, शिक्षण, रोजगार अशा काही बाबतीत खूपच अडचणी आल्या. नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. आजाराच्या साथी हाताळाव्या लागल्या. वाढीसाठी अनुकूल अशा पुरेशी साधन सामग्रीही त्यावेळी नव्हती, तरीही इतर उभरत्या अर्थव्यवस्था आणि दक्षिण आशियाई देशांच्या तुलनेत लोकशाही मूल्यांप्रती भारताची निष्ठा अभेद्य राहिली. केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील संस्था लोकशाही प्रक्रियेतून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी या सर्व समस्यांचा धाडसाने सामना केला.

अनेक भारतीय त्या काळात देशाबाहेर जाऊन यश कसे मिळवायचे ते  शिकले. त्यातले काही मायदेशी परतले. देशाला जागतिक स्पर्धेत उभे करण्यासाठी त्यांनी पुढच्या २० वर्षात आपले योगदान दिले. सन २००० नंतर मात्र प्रत्येकच क्षेत्रात भारत लक्षणीय प्रगती करत आहे. अवकाश तंत्रज्ञान, शेती, बंदरे, दूध उत्पादन, विविध वस्तूंचे उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण, जेनेरिक औषधे, वस्तू आणि सेवांची निर्यात, संशोधन आणि तांत्रिक शोध, चित्रपट, क्रीडा आणि आणखी काही बाबींचा विशेष करून उल्लेख करता येईल. भारतातील शैक्षणिक, वैज्ञानिक, तांत्रिक, कायदेविषयक, प्रशासकीय तसेच व्यवस्थापन विद्या शिकवणाऱ्या संस्था जागतिक दर्जाच्या मानल्या जातात. आज भारताचा साक्षरता दर ७५ टक्के पलीकडे गेला आहे.

गेल्या आठ वर्षात फिनटेक आणि इतर अभिनव तंत्रज्ञानाचा वापर करून देशातल्या गरिबांना पुढे आणण्यासाठी कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत तर प्रगत जगाला विस्मय वाटावा इतकी प्रगती आपल्या देशाने केली आहे. प्रदेश, धर्म, जात, लिंग, भाषा ही कारणे वापरून लोकांमध्ये कटुता आणि संघर्ष उत्पन्न करण्याच्या हितसंबंधितांच्या कारवायांपासून दूर राहण्याचा संकल्प आता आपण केला पाहिजे. देशाने उराशी बाळगलेल्या विरासतीवर विश्वास ठेवून देश बळकट करण्यासाठी आपण प्रतिबद्ध झाले पाहिजे. जनसामान्यांच्या कल्याणासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. त्यांना पुरेशा संधी मिळायला हव्यात, दिव्यांग, वयोवृद्ध नागरिक, आजारी लोक यांच्यासह समाजातील दुर्बल घटकांबद्दल आपण संवेदनशील असले पाहिजे... जय हिंद !

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारत