शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

थोडी वजाबाकी झाली...पण पुष्कळसे गणित बेरजेचेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2022 10:35 IST

प्रदेश, धर्म, जात, लिंग, भाषा यावरून कटुता आणि संघर्ष उत्पन्न करणाऱ्या कारवायांपासून दूर राहणे हाच आपला संकल्प असला पाहिजे!

- प्रवीण दीक्षित

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निकट जात असताना देशातल्या प्रत्येक नागरिकाने अंतर्मुख होणे स्वाभाविकच आहे.  स्वातंत्र्य मिळाल्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून आपल्या शेजारी देशांकडून  वारंवार युद्धे लादली गेली. आपले इरादे सफल होत नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी सीमावर्ती प्रदेश, किनारपट्टीवरून प्रवेश करून दहशतवादी हल्ले करायला सुरुवात केली. हे एक प्रकारचे छुपे युद्धच होते.

भारताला अस्थिर करण्याचा हेतू त्यामागे होता. घृणास्पद अशा जातीय दंगली या प्रवृत्तींनी भडकविल्या. त्यात कित्येकांचे प्राण गेले. तेवढ्याने समाधान न झाल्याने त्यांनी देशात अमली पदार्थांच्या मार्फत दहशतवाद पसरवला. गेल्या एका वर्षातच ‘नार्कोटिक्स ब्युरो ऑफ इंडिया’ने ३० हजार किलो हेरॉईन पकडले. यातून तरुणांचे आयुष्य बरबाद तर होतेच, शिवाय अमली पदार्थांच्या व्यापारातून निर्माण होणारा पैसा  घातक शस्त्रांची चोरटी आयात करण्यासाठी वापरला जातो. व्यक्तिगत तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सायबर हल्ले चालूच आहेत. म्हणून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उंबरठ्यावर आपण आपल्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या जवानांना सलाम केला पाहिजे.

आंतरराष्ट्रीय कारस्थानांमुळे स्वातंत्र्याच्या पहिल्या २५ ते ३० वर्षातच देशावर  अनेक  हल्ले झाले. त्या काळात प्रगत देशांनी आपल्याला संरक्षण आणि सुरक्षेसंबंधीचे आधुनिक तंत्रज्ञान दिले नाही. त्या काळात देशाला अन्न, पाणी, आरोग्य, अन्य सुविधा, वीज, शिक्षण, रोजगार अशा काही बाबतीत खूपच अडचणी आल्या. नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. आजाराच्या साथी हाताळाव्या लागल्या. वाढीसाठी अनुकूल अशा पुरेशी साधन सामग्रीही त्यावेळी नव्हती, तरीही इतर उभरत्या अर्थव्यवस्था आणि दक्षिण आशियाई देशांच्या तुलनेत लोकशाही मूल्यांप्रती भारताची निष्ठा अभेद्य राहिली. केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील संस्था लोकशाही प्रक्रियेतून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी या सर्व समस्यांचा धाडसाने सामना केला.

अनेक भारतीय त्या काळात देशाबाहेर जाऊन यश कसे मिळवायचे ते  शिकले. त्यातले काही मायदेशी परतले. देशाला जागतिक स्पर्धेत उभे करण्यासाठी त्यांनी पुढच्या २० वर्षात आपले योगदान दिले. सन २००० नंतर मात्र प्रत्येकच क्षेत्रात भारत लक्षणीय प्रगती करत आहे. अवकाश तंत्रज्ञान, शेती, बंदरे, दूध उत्पादन, विविध वस्तूंचे उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण, जेनेरिक औषधे, वस्तू आणि सेवांची निर्यात, संशोधन आणि तांत्रिक शोध, चित्रपट, क्रीडा आणि आणखी काही बाबींचा विशेष करून उल्लेख करता येईल. भारतातील शैक्षणिक, वैज्ञानिक, तांत्रिक, कायदेविषयक, प्रशासकीय तसेच व्यवस्थापन विद्या शिकवणाऱ्या संस्था जागतिक दर्जाच्या मानल्या जातात. आज भारताचा साक्षरता दर ७५ टक्के पलीकडे गेला आहे.

गेल्या आठ वर्षात फिनटेक आणि इतर अभिनव तंत्रज्ञानाचा वापर करून देशातल्या गरिबांना पुढे आणण्यासाठी कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत तर प्रगत जगाला विस्मय वाटावा इतकी प्रगती आपल्या देशाने केली आहे. प्रदेश, धर्म, जात, लिंग, भाषा ही कारणे वापरून लोकांमध्ये कटुता आणि संघर्ष उत्पन्न करण्याच्या हितसंबंधितांच्या कारवायांपासून दूर राहण्याचा संकल्प आता आपण केला पाहिजे. देशाने उराशी बाळगलेल्या विरासतीवर विश्वास ठेवून देश बळकट करण्यासाठी आपण प्रतिबद्ध झाले पाहिजे. जनसामान्यांच्या कल्याणासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. त्यांना पुरेशा संधी मिळायला हव्यात, दिव्यांग, वयोवृद्ध नागरिक, आजारी लोक यांच्यासह समाजातील दुर्बल घटकांबद्दल आपण संवेदनशील असले पाहिजे... जय हिंद !

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारत