शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

आयकरात मूलभूत सुधारणा आवश्यक; दहा रुपये अधिक उत्पन्न असले तरी १३,००३ रुपये भरावे लागतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 08:25 IST

पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकरात सूट आहे; मात्र उत्पन्न त्यापेक्षा दहा रुपये अधिक असले तरी १३,००३ रुपये प्राप्तिकर भरावा लागतो. हे कसे? 

- ॲड. कांतीलाल तातेड, अर्थशास्त्राचे अभ्यासककेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी २०२४-२५ वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेला सादर करणार असून, त्यांनी प्राप्तिकर कायद्यात मूलभूत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. प्राप्तिकर, कंपनीकर तसेच गुंतवणुकीसंदर्भात सरकारचे धोरण दीर्घमुदतीचे, किमान चार-पाच वर्षांसाठीचे तरी असणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे करदात्यांना, गुंतवणूकदारांना; तसेच कंपन्यांना त्या धोरणाला अनुसरून त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे योग्यप्रकारे नियोजन करणे शक्य होऊ शकते; परंतु सरकार सातत्याने यासंबंधीचे धोरण मोठ्या प्रमाणात बदलत असल्यामुळे करदात्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत असते.वास्तविक कोणतीही करप्रणाली ही सर्वसामान्य करदात्यांना समजण्यास अत्यंत सुलभ, सोपी, सुटसुटीत व न्याय्य असणे आवश्यक असते; मात्र करापासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून सरकार प्राप्तिकर आकारणीच्या कोणत्याही मूलभूत तत्त्वांचा फारसा विचार न करता दरवर्षी प्राप्तिकर कायद्यात मोठ्या प्रमाणात दुरुस्त्या करत असते. प्राप्तिकर कायदा, १९६१ मध्ये आतापर्यंत शेकडो दुरुस्त्या करण्यात आलेल्या असल्यामुळे या कायद्यात मोठी विसंगती निर्माण झाली असून, त्यातील अनेक तरतुदी सदोष, क्लिष्ट व अन्यायकारक झालेल्या आहेत.

सरकार करदात्यांना खुश करण्यासाठी त्यांना प्राप्तिकरात सूट देते; परंतु कराचे उत्पन्न कमी होऊ नये म्हणून एका हाताने सवलत देतानाच दुसऱ्या हाताने त्या सवलतीचा फायदा काढून घेणाऱ्या अनेक तरतुदी करते. 

उदाहरणार्थ प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८७ (अ) नुसार मिळणाऱ्या कमाल १२,५०० रुपयांच्या ‘सूट’मुळे पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांना प्राप्तिकर भरावा लागत नाही; परंतु पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांनाच ही ‘सूट’ मिळत असल्यामुळे पाच लाख रुपयांपेक्षा थोडेही उत्पन्न वाढल्यास अशा प्राप्तिकरदात्यांना अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या सर्व उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागतो. उदाहरणार्थ एखाद्या प्राप्तिकरदात्याचे उत्पन्न पाच लाख १० रुपये असल्यास त्याला १३,००३ रुपये प्राप्तिकर भरावा लागतो. म्हणजेच केवळ १० रुपयांच्या उत्पन्नावर १३,००३ रुपये प्राप्तिकर भरावा लागतो. अशा प्रकारच्या अनेक विसंगत व अन्यायकारक तरतुदी प्राप्तिकर कायद्यात असून, त्या तरतुदी रद्द करणे व प्राप्तिकरविषयक दीर्घ मुदतीच्या धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

प्राप्तिकर आकारणीच्या दोन पद्धती अस्तित्वात असणे, पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकर नाही; परंतु त्यापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांना मात्र अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या सर्व उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागणे किंवा १०३ व्या घटना दुरुस्तीनुसार आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल’ ठरविण्यात आलेले असतानाही अशा ‘दुर्बल व्यक्तीं’कडून प्राप्तिकर वसूल करणे यासारख्या अनेक तरतुदी समानतेच्या तत्त्वाला तिलांजली देणाऱ्या तसेच मूलभूत अधिकारांचे व घटनेच्या मूलभूत चौकटीचे उल्लंघन करणाऱ्या आहेत. त्यामुळे सरकारने अशा सर्व विसंगत व अन्यायकारक तरतुदी रद्द करण्याची आवश्यकता आहे.

सरकार श्रीमंतांना मोठ्या प्रमाणात सवलती देत असून, त्याचा बोजा सर्वसामान्य करदात्यांवर टाकत असते. महागाईमुळे वास्तव उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी झालेले असतानाही सरकारने जुन्या करप्रणालीच्या बाबतीत सर्वसामान्य प्राप्तिकरदात्यांच्या प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा गेल्या दहा वर्षांपासून अडीच लाख रुपयांवरच गोठवलेली आहे. हे अन्यायकारक आहे. घटनात्मक मूल्यांच्या आधारावर प्राप्तिकर व कंपनीकरासंबंधी दीर्घकालीन धोरणाची अंमलबजावणी आवश्यक आहे.    kantilaltated@gmail.com

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स