शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

सरन्यायाधीश नेमणुकीचा ७० वर्षे नामी घोळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:34 IST

सरन्यायाधीश नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असेल, असे राज्यघटनेच्या अनुच्छेद १२४ (२) मध्ये कुठेही म्हटलेले नाही.

सरन्यायाधीश नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असेल, असे राज्यघटनेच्या अनुच्छेद १२४ (२) मध्ये कुठेही म्हटलेले नाही.भारतीय राज्यघटना ही जगातील एक आदर्श लिखित राज्यघटना असल्याचे म्हटले जाते. गेली ७० वर्षे या राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु आहे. या काळात राज्यघटनेत शंभरहून अधिक दुरुस्त्या केल्या गेल्या. परंतु राज्यघटनेतील काही मूलगामी आणि धक्कादायक त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न कधी झाला नाही. या त्रुटी दूर करण्याऐवजी सोईस्कर प्रथा पाडून त्यानुसार काम दामटून नेण्याकडे कल दिसतो. सरन्यायाधीशाची नेमणूक ही अशीच एक ढळढळीत त्रुटी आहे. सरन्यायाधीशाची नेमणूक कोणी व कशी करावी याची कोणतीही तरतूद राज्यघटनेत नसूनही आजवर तब्बल ४५ सरन्यायाधीशांची नेमणूककेली गेली आहे. मजेची गोष्ट म्हणजे प्रत्येक सरन्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती राज्यघटनेच्या अनुच्छेद १२४ (२) अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर करून मी ही नेमणूक करीत आहे, असे राजसोसपणे ठोकून देत असतात. पण या अनुच्छेदात सरन्यायाधीशांच्या नेमणुकीचा एका शब्दानेही उल्लेख नाही. सरन्यायाधीश नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असेल, असेही यात कुठे म्हटलेले नाही. त्यात सर्वोच्च न्यायालयात एक सरन्यायाधीश व संसदेने वेळोवेळी कायदा करून निश्चित केलेल्या संख्येएवढे अन्य न्यायाधीश असतील, असा उल्लेख आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कशी व कोणी करावी आणि त्यांना पदावरून कसे दूर केले जाऊ शकेल, याचीही तरतूद यात आहे.. या संदिग्धतेमुळे अनेक मुलभूत प्रश्न निर्माण होतात. सर्वोच्च न्यायालयाची राज्यघटनेने ठरविलेली रचना सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश अशी असल्याने सरन्यायाधीश हेही सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश असणार हे उघड आहे. परंतु ते विद्यमान न्यायाधीशांमधूनच निवडले जावेत, असा निरपवाद अर्थ यातून अजिबात निघत नाही. विद्यमान न्यायाधीशांपैकी सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशास सरन्यायाधीश नेमावे, असाही दंडक राज्यघटनेत नाही. किंबहुना सरन्यायाधीश म्हणून बाहेरून कोणाला नेमले तरी तेही खपून जाईल, अशी स्थिती आहे.सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश निवडीची ‘कॉलेजियम’ पद्धत माथी मारली. पण ती सरन्यायाधीशांच्या निवडीला लागू नाही कारण ‘कॉलेजियम’ंध्ये सरन्यायाधीश व अन्य चार ज्येष्ठतम न्यायाधीश असतात. म्हणजेच ज्येष्ठताक्रमानुसार होणारा भावी सरन्यायाधीशही ‘कॉलेजियम’मध्ये असतोच. ‘कॉलेजियम’ने आपल्यापैकीच एकाची भावी सरन्यायाधीश म्हणून निवड करून तशी शिफारस करणे हा पराकोटीचा निर्लज्जपणा ठरला असता. त्यामुळे ‘कॉलेजियम’ निकालात राज्यघटना पार गुंडाळून ठेवणारे न्यायाधीश हा निर्लज्जपणा करायला धजावले नाहीत. मग मावळत्या सरन्यायाधीशानेच आपल्या उत्तराधिकाºयाचे नाव सुचवायचे, अशी मुलखावेगळी प्रथा रुढ केली गेली.याआधीचे सरन्यायाधीश न्या. खेहार यांच्या नेमणुकीस आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने ते सरन्यायाधीश म्हणून रुजू होण्याच्या चार दिवस आधी म्हणजे ३० डिसेंबर २०१६ रोजी फेटाळली. याचे निकालपत्र तब्बल एक वर्षाने म्हणजे यंदाच्या २२ जानेवारी रोजी उपलब्ध केले गेले. त्या याचिकेत हा मुद्दा नव्हता. तरी न्यायाधीशांनी सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांना सरन्यायाधीश नेमण्याची प्रथा रुढ आहे, असा उल्लेख केला व ही प्रथा घटनात्मक असल्याचेही बिनदिक्कत लिहून टाकले!- अजित गोगटे

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय