शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

मोदींचे व्हिजन दर्शविणारे ५० दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 07:28 IST

संपलेल्या ५० दिवसांत सरकारचे मुख्य उद्दिष्ट हे गरिबांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे सबलीकरण असल्याचे दाखवून दिले

प्रकाश जावडेकर

मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या सत्रात जी कामे केली आणि ज्या बाबतीत पुढाकार घेतला त्यावरून सरकारची पुढे जाण्याची दिशा, तसेच देशाला नव्या युगात नेण्याची दृष्टी स्पष्ट होते. निर्णय घेण्याची गती आणि काम करण्याचा तडाखा गेल्या ५० दिवसांत अतुलनीय होता, असेच म्हणावे लागेल. केंद्रीय मंत्रिमंडळाने आणि केंद्र सरकारने शेकडो महत्त्वाचे निर्णय घेतले. किमान शासन, कमाल प्रशासन या तत्त्वाने प्रेरित झालेले हे निव्वळ वाचाळवीर सरकार नाही, हेही स्पष्ट झाले आहे. २०२२ आणि २०२४ सालासाठी निर्धारित केलेली उद्दिष्टे साध्य करण्याचा सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट दिसून येतो. २०२२ साली या देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होतात, तर २०२४ हे वर्ष या सरकारला मिळालेल्या जनादेशाच्या पूर्ततेचे अखेरचे वर्ष आहे. सरकारने घेतलेले निर्णय आणि घेतलेला पुढाकार यातून भाजपच्या संकल्पपत्राशी सरकारची बांधिलकी दिसून येते. तसेच समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा निर्धारही दिसून येतो.

 

संपलेल्या ५० दिवसांत सरकारचे मुख्य उद्दिष्ट हे गरिबांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे सबलीकरण असल्याचे दाखवून दिले असून, त्यांना सामाजिक सुरक्षितता प्रदान करीत असतानाच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा हेतूही स्पष्ट झाला आहे. सध्याचे सरकार लोकांना कायदा व सुव्यवस्था प्रदान करीत असताना, मध्यमवर्गाचे आणि व्यापाºयांचे जीवन सुखकर करील तसेच अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देईल. भारताचे अर्थकारण पाच लाख कोटी डॉलर्सचे करण्याचे उद्दिष्ट साध्य करीत असताना जगाच्या राजकारणात स्वत:चा ठसा उमटवील. देशातील सर्व १४ कोटी शेतकºयांचा समावेश पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत झाला असून, प्रत्येक शेतकºयाला त्यांच्या साधनांसाठी दरवर्षी रु. ६००० ची मदत मिळणार आहे. सर्व शेतकरी पेन्शन मिळण्यास पात्र ठरतील. शेतकºयांची मुख्य मागणी त्यांच्या उत्पादनाला उत्पादन मूल्य मिळावे ही आहे. एम.एस. स्वामीनाथन आयोगाने उत्पादन मूल्य अधिक ५० टक्के रक्कम हे आधार मूल्य राहील, अशी त्याची व्याख्या केली आहे. मोदी सरकारने गेल्या दोन वर्षांपासून हे भाव मिळण्याची व्यवस्था केली आहे आणि २४ प्रकारच्या पिकांना आधारमूल्य मिळू लागले आहे. आता शेतकºयांना त्यांच्या बाजरीच्या उत्पादन मूल्याच्या वर ८५ टक्के, उडदासाठी ६४ टक्के, तूरडाळीसाठी ६० टक्के मिळतील. शेतकºयांची शेती परवडणारी व्हावी यासाठी पुढील पाच वर्षांत १०,००० कृषी उत्पादक संघटनांची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय मासेमारीसाठीही प्रोत्साहन योजना लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे २०२२ पर्यंत कर्ज परताव्यात सूट जाहीर केली आहे.

भारताची अर्थव्यवस्था पाच लक्ष कोटी डॉलरची करण्यासाठी गुंतवणुकीची आवश्यकता असेल. त्यादृष्टीने विदेशी व स्थानिक गुंतवणूक वाढविण्यासाठी पहिल्या ५० दिवसांत अनेक निर्णय घेतले आहेत. इन्सॉल्व्हन्सी अ‍ॅण्ड बँकरप्सी कोडमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना रु.७०,००० कोटींची भांडवली मदत देण्यात आली आहे. सार्वजनिक उद्योगात निर्गुंतवणुकीला गती देण्यात आली आहे. काही आजारी उद्योग बंद करण्यात आले आहेत. आगामी पाच वर्षांत मोदी सरकार रस्ते, बंदरे, रेल्वे, विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर, फ्रेट कॉरिडॉर, जलमार्ग विकास, उडान, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना फेज तीन यात रु. १०० लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. मोदी सरकारच्या काळात भारताचा लौकिक जगभरात वाढला आहे. जी-२० परिषदेत मोदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. मालदीव व श्रीलंका या राष्ट्रांना दिलेल्या भेटीने त्या राष्ट्रांशी असलेले संबंध मजबूत झाले आहेत. चांद्रयान-२ चे यश आणि २०२० मधील गगनयानचा कार्यक्रम यामुळे अंतराळ संशोधन करणारे चौथे राष्ट्र हा दर्जा भारताला मिळाला आहे.

आता दहशतवाद आणि भ्रष्टाचार यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करण्यात येते. जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांना मिळणाºया आर्थिक मदतीला लगाम घालण्यात आला आहे. विभाजनवाद्यांना अटकेत टाकण्यात आले आहे. दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील जनतेची मने जिंकण्याचा अजेंडा निश्चित करण्यात आला आहे. तेथे पंचायत निवडणुकीतून प्रथमच ४० हजार स्थानिक प्रतिनिधी निवडण्यात आले आहेत. भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत २७ वरिष्ठ अधिकाºयांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. बेनामी मालमत्तेविरुद्धही कठोर कारवाई करण्यात येत आहे. अन्य देशांत पळून गेलेल्यांना परत आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मध्यमवर्गीयांसाठी एलपीजीच्या दरात रु. १०० ची कपात करण्यात आली आहे. ग्राहक अधिकार विधेयक मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी उत्तम तºहेने कार्यरत आहे. प्रचलित नसलेले ५८ कायदे रद्द करण्यात आले असून, रद्द करण्यात आलेल्या कायद्यांची संख्या हजार झाली आहे.नॅशनल डिफेन्स फंडअंतर्गत दिल्या जाणाºया पंतप्रधान शिष्यवृत्तीची व्याप्ती वाढवून, ती राज्य पोलीस दलालाही लागू करण्यात आली आहे. अनेक लष्करी अधिकाºयांना मिळणाºया मदतीत वाढ करण्यात आली आहे. एकूणच आगामी पाच वर्षांत हे सरकार देशाला नव्या उंचीवर नेईल, अशी आशा या सरकारच्या ५० दिवसांतील कामगिरीने निर्माण झाली आहे.(लेखक केंद्रीय पर्यावरण, वने, हवामान बदल आणि माहिती व प्रसारण मंत्री आहेत)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPrakash Javadekarप्रकाश जावडेकरGovernmentसरकार