शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

हिच का ५६ इंच छाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 03:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन कोणी पाहिले का? अद्याप तरी कुठे दिसले नाहीत. परंतु सूडाचे राजकारण नक्कीच पाहायला मिळत आहे. अटलबिहारी वाजपेयी हे विरोधी पक्षात असताना कॉँग्रेसकडून त्यांना मिळणारा सन्मान आठवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन कोणी पाहिले का? अद्याप तरी कुठे दिसले नाहीत. परंतु सूडाचे राजकारण नक्कीच पाहायला मिळत आहे. अटलबिहारी वाजपेयी हे विरोधी पक्षात असताना कॉँग्रेसकडून त्यांना मिळणारा सन्मान आठवा. आंतरराष्टÑीय व्यासपीठावर देशाचे नेतृत्व करण्यासाठी विरोधी पक्षनेत्याला सन्मानपूर्वक पाठविण्याची कुवत ही काँग्रेसमध्ये होती. श्यामा प्रसाद मुखर्जी असो वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील क्षमता, विद्वत्तेची अभिमानास्पद नोंद कॉँग्रेसने वेळोवेळी घेतल्याचे जगाने पाहिले आहे. केवळ निवडणुकीपुरते राजकारण असण्यावर कॉँग्रेसचा भर होता. परंतु २०१४ पासूनचे चित्र पालटले. मित्रों किंवा भाईयों और बहनो...‘ऐसा होना चाहिये की नहीं होना चाहिये, वैसा होना चाहिये की नहीं होना चाहिये’ हेच शब्द कानावर यायला लागले आहेत. लोकांनाही आता या शब्दांचा वीट येतो. माणसांची मने जोडण्याचे सोडून प्रत्येकाला आधारला जोडत बसलेल्या या सरकारने ‘धर्म आणि जातीं’मध्ये सलोखा निर्माण करण्याकडे लक्ष दिले असते तर या सरकारच्या पारड्यात थोडे पुण्य जमा झाले असते. परंतु यांच्यातील ‘होम- हवन आणि यज्ञ’ या अंधश्रद्ध मानसिकतेने जोर धरला आहे. दिल्लीचा एक खासदार महेश गिरी देशापुढील संकटे दूर व्हावीत म्हणून घराघरातून तूप गोळा करून यज्ञ करण्याच्या तयारीत आहे. तर सत्यपाल सिंग या माजी आयएएस अधिकारी आणि विद्यमान केंद्रीय मंत्र्याचा कान पकडण्याची वेळ मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांवर येते. काल २६ जानेवारीला राजपथावर दिसलेला आधुनिक भारत अनुभवल्यानंतर गिरी आणि सत्यपालांची कीव करावीशी वाटते. देशाची लोकसंख्या १२५ कोटी असताना याच देशात ६०० कोटी मतदार भाजपला निवडून देतात. ज्याच्या तोंडात जे आले ते बोलून मोकळे व्हायचे आणि त्यावर जराही टीका करायची नाही. असे खूप काळ चालणारे नाही.शुक्रवारी राजपथावर झालेल्या कार्यक्रमात कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी हे सहाव्या रांगेत बसलेले दिसले. राहुल गांधी देशातील एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि ते लोकसभेचे खासदार आहेत. परंतु त्यांना केवळ सूडाच्या राजकारणामुळे सहाव्या रांगेत आसन देण्यात आले. तर दुसरीकडे भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार अमित शहा यांना पहिल्या रांगेत बसविण्यात आले. दुसºयाला सन्मान देण्यासाठीही छाती (५६ इंची नव्हे) लागते. हा प्रकार देशाने पाहिला. भाजप याचा आसुरी आनंद घेतो आहे. कॉँग्रेसने याचे राजकारण न करता सहाव्या रांगेतील आसन सभ्यतेने स्वीकारले. राहुल गांधी संपूर्ण वेळ चित्ररथ आणि विविध दृश्यांना दिलखुलास दाद देत होते, आपण कुठे बसलो आहोत याची जराही चिंता त्यांच्या चेहºयावर दिसून येत नव्हती.-विकास झाडेब्युरो चीफ

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा