शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
5
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
6
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
7
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
9
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
10
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
11
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
12
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
13
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
14
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
15
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
16
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
17
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
18
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
19
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
20
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न

२०२० हे नवे ‘स्वातंत्र्य वर्ष’ : या वर्षाचे कृतज्ञ राहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 01:52 IST

घेतलेले ड्रेसेस, चप्पला, बूट वापरलेलेच नाहीत. सपात्या घातल्या की झाले ! काय करायचे ते करा. स्वातंत्र्यच स्वातंत्र्य. मास्क मात्र हवाच, साबण-सॅनिटायझर वापरा, सतत हात धुवा, सहा फुटांचे अंतर राखा..

डॉ. विजय पांढरीपांडे।

ब्रिटिशांच्या गुलामीतून आपल्याला पहिले स्वातंत्र्य मिळाले ते १९४७ साली. सात दशके हे स्वातंत्र्य आपण भलेबुरेपणाने उपभोगले. या काळात काय कमावले, काय गमावले हा वेगळा विषय; पण आता २०२० साली आपल्याला पुन: नवे स्वातंत्र्य मिळाले. आधीचे स्वातंत्र्य लौकिकार्थाचे आणि आताचे स्वातंत्र्य आपल्याला सर्वार्थाने मुक्त करणारे, स्वत:च स्वत:चा शोध घ्यायला लावणारे. प्रश्नामागे धावण्याऐवजी उत्तरांचा शोध घ्यायला लावणारे; एका दृष्टीने आध्यात्मिक स्वातंत्र्य! पूर्वी रस्त्यावर गर्दी असायची, माणसाची, वाहनांची. श्वास घेणे कठीण. या कोरोनाने दिलेल्या स्वातंत्र्यात (काही काळ) रस्त्यावरची गर्दी गेली. वाहने कमी झाली. प्रदूषण पूर्वीच्या तुलनेत खूप कमी झाले. माणसे श्वास घ्यायला मोकळी झाली. मुलांना शाळेचं बंधन नाही. आॅफिसची बंधनेही सैलावलेली. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना कामाच्या वेळेपासून काम करताना घालायच्या पोषाखापर्यंत सगळ्याचेच स्वातंत्र्य!घरची कपाटे आधी घेतलेल्या, गरज असलेल्या, नसलेल्या पोशाखांनी भरली आहेत. महिनोन्महिने अनेकांनी नीट पोशाख केलेलाच नाही. आवडीने

घेतलेले ड्रेसेस, चप्पला, बूट वापरलेलेच नाहीत. सपात्या घातल्या की झाले ! काय करायचे ते करा. स्वातंत्र्यच स्वातंत्र्य. मास्क मात्र हवाच, साबण-सॅनिटायझर वापरा, सतत हात धुवा, सहा फुटांचे अंतर राखा... तेव्हढेच काय ते बंधन! बाकी फुल फ्रीडम. कोरोनाने सगळ्या जगाला एकत्रच भीतीच्या खाईत लोटले. तुम्ही श्रीमंत असा, गरीब असा, पहेलवान असा, डॉक्टर-इंजिनिअर असा, आमदार-खासदार असा, काही फरक पडत नाही. शेवटी मृत्यूची भीती सगळ्यांना सारखीच आहे. संपत्ती जमवण्याचा केवढा सोस माणसाला; पण आज तो सोसच निरर्थक होऊन बसला आहे. भरोसाच नाही कशाचा, आपल्या जिवाचादेखील ! गुलामासारखे मरमर मरून, कष्ट करून कमावले हे सारे. पण कमावले त्याचा उपयोग करण्याचे साधन, औचित्यच उरलेले नाही आपल्याकडे. आपल्यानंतर आपण कमावलेल्या मालमत्तेचे, पैशा-अडक्याचे प्रयोजन काय; याची चरचरती जाणीव या वर्षाने दिली, तशी याआधी कधी झाली नव्हती हे नक्की ! अखंड मौजमजेची हाव, त्यासाठी शोधलेले किती चोचले आणि किती एक मार्ग! आपली मुलेही आपल्यासारखीच चैनचंगळीला सोकावलेली! अखंड खाणे-पिणे, फिरणे, खरेदी, हाव, लालसा, स्पर्धा.. गेले काही महिने यातले काहीच केले नाही आपण. काहीच उपभोगले नाही.दार उघडे, रस्ते मोकळे, तरी आपण बाहेर जात नाही. एक विषाणू, जो कुठून, कसा आला, कधी-कसा जाणार, केव्हा जाणार; कुणालाच काहीही माहिती नाही, अशा विषाणूने आपल्याला नवा धडा शिकवला. स्वातंत्र्याचा खरा अर्थ शिकवला. स्वातंत्र्य म्हणजे हवे तसे वागणे, हवे ते खाणे पिणे, हवे ते बोलणे, मर्जीनुसार हवे ते करणे एवढेच अभिप्रेत होते आपल्याला. कोरोनाने, लॉकडाऊनने सारे बदलले. आपण ज्यामागे धावत होतो ते मृगजळ होते हे समजले. नात्याची-दोस्तीची किंमत कळली. मुख्य म्हणजे मदतनीसांचे महत्त्व समजले. कुणी लहान नाही, मोठा नाही, वरिष्ठ- कनिष्ठ नाही. आपण एकाच बोटीतले प्रवासी, साधी माणसे आहोत, ही जाण या नव्या स्वातंत्र्यवर्षाने आपल्याला दिली.

२०२० हे नवे स्वातंत्र्य-वर्ष आपल्या आयुष्यात आले. डॉ अब्दुल कलाम यांच्यासारख्या शास्रज्ञांनी, बुद्धिवंतांनी २०२० हे वर्ष अनेक उद्दिष्टपूर्तीचे लक्ष्य वर्ष ठरवले होते. त्या उद्दिष्टांपैकी काय, किती साध्य झाले हा अर्थातच संशोधनाचा विषय. पण एका वेगळ्या अर्थाने हे वर्ष नव्या आगळ्यावेगळ्या उद्दिष्टाचे सार्थक वर्ष ठरले हे निश्चित. आपली दिशा-दशा बदलणारे ठरले. आपल्या डोळ्यात अंजन घालणारे वर्ष, आपल्याला नवी दृष्टी देणारे वर्ष. आपल्याला आपला खरा चेहरा दाखवणारे वर्ष. फक्त शरीर अन् शरीराच्या गरजा महत्त्वाच्या नाहीत; तर या शरीराच्या आत जे मन आहे, मनात जे विचार आहेत, त्याचेही आरोग्य सांभाळणे जास्त महत्त्वाचे. जगण्यासाठी फक्त शरीर महत्त्वाचे नसते; ते तर क्षणभंगुर. मनाचे, विचारांचे आरोग्य, विकारांचे नियमन जास्त महत्त्वाचे. २०२० या स्वातंत्र्य वर्षाने हे सारे आपल्याला शिकवले. जगाला सार्वत्रिक भीतीच्या खाईत लोटणाºया कोरोनाचे हे ‘बाय प्रॉडक्ट’ काही कमी महत्त्वाचे नाही. बाकी घसरलेल्या सर्व गाड्या यथावकाश रुळावर येतीलच. त्याची चिंता नको.

(लेखक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आहेत)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या