शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

शत प्रतिशत बेबनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2015 23:46 IST

दोन परस्पर विरोधी विधाने एकाच दमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथे झालेल्या भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीच्या अखेरीस बोलताना केली आहेत.

युती तुटल्यामुळे भाजपाला आपली ताकद कळली, पण मुंबई महापालिकेच्या निवडणुका युतीच लढेल, अशी दोन परस्पर विरोधी विधाने एकाच दमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथे झालेल्या भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीच्या अखेरीस बोलताना केली आहेत. आम्ही युतीस तयार आहोत, पण अवास्तव अटी मान्य करणार नाही, पाहिजे तर बघा, अन्यथा आमची ताकद आम्ही दाखवून दिलीच आहे, असा सेनेला इशारा देण्यासाठी ही परस्पर विरोधी वक्तव्यं केली जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आधी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘शत प्रतिशत’चा नारा दिला. अर्र्थात ही ‘शत प्रतिशत’ची आकांक्षा तशी जुनीच आहे आणि त्याचे कारणही सेना व भाजपाच्या युतीत सुरूवातीपासूनच असलेले ताणतणाव हेच आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र आले, ते आपापले हितसंबंध जपून ते जोपासले जावेत, याचसाठी. महाराष्ट्रातील भाजपात ‘सोशल इंजिनियरिंग’चा प्रयोग वसंतराव भागवत यांनी १९७७ साली केला, तरीही या पक्षाची राज्यातील प्रतिमा ही मुख्यत: व्यापारी, उद्योजक, शहरी मध्यमवर्ग यांच्या हितसंबंधांची पाठराखण करणारा अशीच होती. उलट साठच्या दशकाच्या मध्यास स्थापन झालेल्या सेनेचा ‘मराठी बाण्या’चा प्रयोग ऐंशीच्या दशकाच्या सुरूवातीस अर्थव्यवहाराचे चक्र बदलू लागल्यावर कंटाळवाणा ठरू लागला होता. तोपर्यंत मुंबई-पुणे पट्ट्याबाहेर पसरत चाललेल्या सेनेचा आपल्या वाढीसाठी वापर करून घेण्याचा भाजपाचाही इरादा होता. सेना भाजपाला कायम ‘छोटा भाऊ’ म्हणून नव्हे, तर युतीतील ‘दुय्यम घटक’ म्हणून वागवत आली होती. सेनाप्रमुखानंतर उद्धव ठाकरे यांच्या हाती पक्षाची सूत्रे आली, भाजपाच्या भल्या भल्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याआधी त्यांच्या खाजगी सचिवाशी चर्चा करावी लागत होती. सेना देत असलेल्या अशा वागणुकीमुळे जी चीड होती, त्यातून काही वर्षांपूर्वी ‘शत प्रतिशत’ची मोहीम भाजपाने हाती घेतली होती. पण तेव्हा देशातील एकूण वातावरण आणि राज्यातील राजकीय परिस्थिती भाजपाने ‘शत-प्रतिशत’ बनण्यासाठी अजिबात अनुकूल नव्हती. आता ‘मोदी लाटे’वर स्वार झालेल्या भाजपाने सेनेला मागे टाकले आहे. ‘दिल्लीत तुम्ही मोठे भाऊ, तर राज्यात आम्ही’ ही सेनेची भूमिका भाजपाने रणनीतीचा भाग म्हणून जागा वाटपाच्या चर्चेचा घोळ घालून पद्धतशीरपणे झिडकारली. उलट आपण राज्यात दुय्यम बनलो आहोत आणि हे वास्तव बदलायचे असल्यास राजकीय धमक दाखवण्याची गरज आहे, हे सेनेला पटवून घेता आलेले नाही. याचे एक प्रमुख कारण म्हणजे १५ वर्षे सत्तेपासून दूर राहिल्याने सेनेतील बहुसंख्य नेते घायकुतीला आले होते. अशा नेत्यांना भाजपा सत्तापदाचे गाजर दाखवत होती आणि त्याचबरोबर आम्ही सांगतो त्या अटीवर सत्तेत सहभागी व्हा, अन्यथा तुमचा पक्ष फोडू, अशी अप्रत्यक्ष धमकीही सेनेला देत होती. भाजपाची सगळी सूत्रे हाती असलेल्या मोदी-शहा या दुकलीला सेना नकोच आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठबळ फडणवीस यांच्यामागे उभे करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस हा नावापुरताच ‘राष्ट्रीय’ पक्ष आहे, प्रत्यक्षात तो प्रादेशिक पक्ष आहे. असा पक्ष राज्यात पुन्हा सत्तेच्या आधारे पाय रोवत असेल, तर आपल्याला मागे सारण्याची ही रणनीती आहे, हे सेना चांगलेच ओळखून आहे. उलट फडणवीस यांना ‘स्वच्छ प्रतिमे’चा सोस आहे. त्यामुळे पक्षातील दिल्लीश्वरांचे मन वळवून सेनेला युतीत सहभागी करून घेण्याचा डाव फडणीस विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी खेळले. पण सेनेला दुय्यम वागणूक देऊन खिजवतच राहिले. परिणामी सेना चडफडत राहिली आणि सत्तेत असूनही ‘विरोधी’ भूमिका घेत आहे. जैतापूरचा वाद हा सेना नेतृत्वाच्या या मन:स्थितीचाच परिपाक आहे. तेथेही सत्तेतील व पक्षातील सेना नेते यांच्यात कशी दुही आहे, हे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि सेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यात जैतापूरवरून जुंपलेली शाब्दिक चकमक दर्शवते. फडणवीस यांचे वक्तव्य हा इशारा आहे, हे सेना चांगलेच जाणते. मुंबई महापालिकेतील सत्ता हा सेनेचा ‘राजकीय प्राणवायू’ आहे. ही सत्ता गेली अथवा ती निसटण्याची वेळ आली, तर तगून राहणे सेनेला कठीण जाईल. भाजपाच्या आक्रमकतेमुळे सेनेचा जो खंदा पाठीराखा मतदार आहे, तो निवडणुकीपासूनच दुखावला गेला आहे. शिवाय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनात गुजराती भाषिकांंबद्दल एक सुप्त अढी आहे. या दोन मुद्यांचा वापर करून सेना आपले पाठबळ वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणूनच सरकारी कार्यालये, व्यापार-उद्योग गुजरातेत जाण्याचा मुद्दा गेल्या सहा-सात महिन्यात वारंवार उफाळून येत राहिला आहे. भाजपा आपला हात सोडणार आणि धरून ठेवला, तरी तो पिरगळत राहणार, हे सेनेला ठाऊक आहे. स्वबळावर सेनेच्या हाती राज्याची सत्ता येऊ शकत नाही. फक्त प्रश्न आहे, तो सत्तेत समान वाटा मिळविण्याचा. तो कसा सेनेला मिळता कामा नये, यासाठी भाजपाचे सारे डावपेच आहेत. असा हा युतीतील ‘शत प्रतिशत’ बेबनाव आहे.