शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत बदल करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:47 IST

निवेदनात म्हटले आहे की, ६ जानेवारी २१च्या मार्गदर्शन पत्रान्वये व तालुका स्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांच्या सुचनेनुसार ...

निवेदनात म्हटले आहे की, ६ जानेवारी २१च्या मार्गदर्शन पत्रान्वये व तालुका स्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांच्या सुचनेनुसार ५० टक्के शिक्षक उपस्थितीबाबत प्रत्येक मुख्याध्यापकाकडून नियोजन मागवले होते. त्याप्रमाणे सकाळी ८ ते ११ वाजेचे नियोजन केंद्रप्रमुखांकडे दिले होते. परंतु दोन दिवसांपूर्वी चारही तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांनी ते नियोजन रद्द करून मागील परिपत्रकानुसार शाळेची वेळ ९.४५ ते ४.३० केली आहे, अशा तालुकास्तरावर सूचना दिलेल्या आहेत. परंतु कोरोना काळात शाळा बंद होत्या. पण शिक्षक ऑनलाईन दरदिवशी दोन तास शिकवत होते. विद्यार्थ्यांचे पालकही या वेळेत घरी असल्याने ते विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेत होते .

शाळेच्या वेळेत बदल केल्यास पालक मोबाईलसह रोजगारासाठी निघून जातात. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात खंड पडण्याची व विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

शासन निर्णय दिनांक १५ जून २०२०च्या पत्रान्वये सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत, दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत किंवा सोमवार, बुधवार व शुक्रवार वर्ग १ व २ व मंगळवार, गुरुवार व शनिवार वर्ग ३ व ४ असे सुरू करणेबाबत आदेश आहेत. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी दररोज ८ ते ११ याच वेळेत त्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देण्याचे आदेश द्यावेत व शाळेची वेळ ७.३० ते ११ अशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदन देताना समन्वय समितीचे अध्यक्ष शिवानंद बैसाणे, सरचिटणीस किशोर पाटील, सदस्य शरद पाटील, उमराव बोरसे, प्रवीण भदाणे, चंद्रकांत सत्तेसा, भुपेश वाघ, संजय शिंदे, पुखराज पाटील, योगेश धात्रक, ज्ञानेश्वर बाविस्कर आदी समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.