शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

लाॅकडाऊनमध्ये गावात परतलेले तरुण रोजगार हमी योजनेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 22:33 IST

ग्रामीण भागातील चित्र : महानगरांमध्ये पुन्हा मिळाला रोजगार, रोहयोची कामे घटली

धुळे : कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे भल्याभल्यांचे अर्थचक्र थांबले होते. महानगरात मिळालेले काम बंद झाल्याने गावाकडे परतलेल्या तरुणांसह अनेक कुटूंबे शेतीकामासह रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करताना दिसली. सुदैवाने आता परिस्थिती रुळावर आली आहे.ग्रामीण भागातील अनेक कुटूंबे रोजगारासाठी मुंबई, पुणे, नाशिक, सुरत, अहमदाबाद अशा शहरांमध्ये स्थलांतरीत झाली होती. पंरतु लाॅकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याने रोजगार बंद पडला. पुन्हा कधी सुरू होईल याची कल्पना नसल्याने ही कुटूंबे आणि तरुणही गावाकडे परतले. बेरोजगार झालेल्या या तरुणांना गावात रोजगार हमी योजनेत काम मिळाले. तर कुटूंबातील महिला शेतशिवारांमध्ये काम करताना दिसल्या. लाॅकडाऊन काळात हे चित्र सर्वत्र सारखे होते आणि ग्रामीण भागामध्ये हा विषय अतीशय चर्चेचा ठरला होता. प्रशासनाने रोजगार हमी योजनेची कामे वाढविल्याने या तरुणांना रोजगार मिळाला.दरम्यान, शासनाने अनलाॅक केल्यापासून उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत. अनेकांना पुन्हा रोजगार मिळाला आहे. गावी आलेले तरुण आणि इतर कुटूंबे पुन्हा शहरात परतली आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे सध्या कमी झाली आहेत. परंतु ज्यांना अजुनही रोजगार मिळाला नाही त्यांना याच कामांचा दिलासा आहे.वर्षात रोहयोची कामे वाढली लाॅकडाऊनमुळे ग्रामीण भागातील असंख्य कामगार गावाकडे परतले होते. अशा परिस्थितीत त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रोहयोची कामे सुरू केली होती. मे २०२० मध्ये २४३१ कामांवर ११ हजार ८०० मजूर होते तर जूनमध्ये पावसाळा लागल्याने कामांची संख्या १३४७ वर आली होती. त्यावेळी ६८३२ मजूर कामावर होते. गेल्या वर्र्षीच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे. पंरतु आता नोव्हेंबरमध्ये केवळ २६५ कामे आहेत.गावात काम नसल्याने गुजरातमधील सुरत शहरात चांगले काम मिळाले होते. लाॅकडाऊनमध्ये काम बंद झाल्याने पुन्हा गावाकडे परतलो. गावात आल्यावर रोजगार हमी योजनेत काम मिळाले. त्यामुळे लाॅकडाऊनमध्ये पोटापाण्याचा प्रश्न सुटला.  - सोमनाथ सोनवणे, रोहयो कामगार,लाॅकडाऊनमध्ये कुणीही बेरोजगार राहू नये अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात रोहयो कामांची संख्या वाढविण्यात आली. मागेल त्याला काम देण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. परंतु आता शहरांमध्ये पुन्हा रोजगार मिळाल्याने मजुर कमी झाले आहेत.- गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी, रोहयो

टॅग्स :Dhuleधुळे