शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

लाॅकडाऊनमध्ये गावात परतलेले तरुण रोजगार हमी योजनेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 22:33 IST

ग्रामीण भागातील चित्र : महानगरांमध्ये पुन्हा मिळाला रोजगार, रोहयोची कामे घटली

धुळे : कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे भल्याभल्यांचे अर्थचक्र थांबले होते. महानगरात मिळालेले काम बंद झाल्याने गावाकडे परतलेल्या तरुणांसह अनेक कुटूंबे शेतीकामासह रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करताना दिसली. सुदैवाने आता परिस्थिती रुळावर आली आहे.ग्रामीण भागातील अनेक कुटूंबे रोजगारासाठी मुंबई, पुणे, नाशिक, सुरत, अहमदाबाद अशा शहरांमध्ये स्थलांतरीत झाली होती. पंरतु लाॅकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याने रोजगार बंद पडला. पुन्हा कधी सुरू होईल याची कल्पना नसल्याने ही कुटूंबे आणि तरुणही गावाकडे परतले. बेरोजगार झालेल्या या तरुणांना गावात रोजगार हमी योजनेत काम मिळाले. तर कुटूंबातील महिला शेतशिवारांमध्ये काम करताना दिसल्या. लाॅकडाऊन काळात हे चित्र सर्वत्र सारखे होते आणि ग्रामीण भागामध्ये हा विषय अतीशय चर्चेचा ठरला होता. प्रशासनाने रोजगार हमी योजनेची कामे वाढविल्याने या तरुणांना रोजगार मिळाला.दरम्यान, शासनाने अनलाॅक केल्यापासून उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत. अनेकांना पुन्हा रोजगार मिळाला आहे. गावी आलेले तरुण आणि इतर कुटूंबे पुन्हा शहरात परतली आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे सध्या कमी झाली आहेत. परंतु ज्यांना अजुनही रोजगार मिळाला नाही त्यांना याच कामांचा दिलासा आहे.वर्षात रोहयोची कामे वाढली लाॅकडाऊनमुळे ग्रामीण भागातील असंख्य कामगार गावाकडे परतले होते. अशा परिस्थितीत त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रोहयोची कामे सुरू केली होती. मे २०२० मध्ये २४३१ कामांवर ११ हजार ८०० मजूर होते तर जूनमध्ये पावसाळा लागल्याने कामांची संख्या १३४७ वर आली होती. त्यावेळी ६८३२ मजूर कामावर होते. गेल्या वर्र्षीच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे. पंरतु आता नोव्हेंबरमध्ये केवळ २६५ कामे आहेत.गावात काम नसल्याने गुजरातमधील सुरत शहरात चांगले काम मिळाले होते. लाॅकडाऊनमध्ये काम बंद झाल्याने पुन्हा गावाकडे परतलो. गावात आल्यावर रोजगार हमी योजनेत काम मिळाले. त्यामुळे लाॅकडाऊनमध्ये पोटापाण्याचा प्रश्न सुटला.  - सोमनाथ सोनवणे, रोहयो कामगार,लाॅकडाऊनमध्ये कुणीही बेरोजगार राहू नये अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात रोहयो कामांची संख्या वाढविण्यात आली. मागेल त्याला काम देण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. परंतु आता शहरांमध्ये पुन्हा रोजगार मिळाल्याने मजुर कमी झाले आहेत.- गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी, रोहयो

टॅग्स :Dhuleधुळे