शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धुळे तालुका जि.प.तील सत्तेला सुरूंग लावणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST

दरम्यान २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी २०१८ मध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ७३ ...

दरम्यान २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी २०१८ मध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ७३ टक्के आरक्षण काढण्यात आले होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. निवडणुका झाल्या तरी या याचिकेवर कामकाज सुरू हाेते. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसावे, असे जाहीर करीत नवीन आरक्षण काढून दोन आठवड्याच्या आत १५ जागांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे.

दरम्यान या निर्णयामुळे धुळे तालुक्यातील ११ व शिंदखेडा तालुक्यातील ४ गटातील सदस्यांवर गंडांतर आलेले आहे.

दरम्यान २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत धुळे तालुक्यातील १५पैकी बोरकुंड व नेर या दोन गटातच भाजपला विजय मिळविता आला होता. तर कॉंग्रेसला ९ जागा मिळालेल्या होत्या. मात्र २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला अवघ्या दोन जागांवरच समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत भाजपने तब्बल १० जागांवर विजय मिळविला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनासाठी भाजपला धुळे तालुक्याची मोठ्या प्रमाणात मदत झालेली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर धुळे तालुक्यातील ११ गटातील सदस्यांच्या सदस्यतेत्वर गंडांतर आलेले आहे. त्यात भाजपचे ८, शिवसेनेचे दोन व कॉंग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. आता या ११ गटांसाठी पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाआघाडीची सत्ता आहे. अनेक ठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र येत निवडणुका लढविल्या आहेत. त्यामुळे राज्याचा हा पॅटर्न धुळे तालुक्यात राबवून धुळे तालुक्यात तिन्ही पक्ष एकत्रित येऊन भाजपच्या सत्तेला सुरूंग लावणार का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. निकालानंतर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आम्ही जिल्हा परिषदेत सत्तांतर करून दाखवू, अशी भविष्यवाणी केलेली आहे. त्यामुळे धुळे तालुक्यातील ११ गटांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या निकालावरच विद्यमान सत्ताधाऱ्यांची भिस्त अवलंबून राहणार आहे. मात्र मिळालेली सत्ता भाजपचे नेते, कार्यकर्ते सहजासहजी जाऊ देतील, असे वाटत नाही. निवडणुका झाल्यास ते देखील चांगलीच रणनीती आखतील यात शंका नाही.