शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला का होतोय विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 14:19 IST

वार्तापत्र, सुनील बैसाणे सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. त्यानुसार शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यापासून याबाबत जोरदार ...

वार्तापत्र, सुनील बैसाणे

सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. त्यानुसार शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यापासून याबाबत जोरदार तयारी सुरू केली होती. शिक्षकांची कोरोना चाचणी देखील युध्द पातळीवर सुरू केली. सोमवारपासून शाळा सुरू करावयाच्या असल्याने शिक्षण विभाग रविवारी सायंकाळपर्यंत कामात व्यस्त होता. सोमवारपासून शाळा सुरू होत असल्याच्या बातम्याही शिक्षण विभागाने दिल्या होत्या. परंतु हा महत्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी घेतील याबाबत हा विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसले. कारण शाळा सुरू करण्याच्या बाबतीत घाईघाईत निर्णय घेणे योग्य नसल्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी रविवारी सांयकाळी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. जगातील काही देशांमध्ये आणि भारतात देखील काही राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याच्या बातम्या येत असताना विद्यार्थी आणि शिक्षकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नसल्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. शिक्षण महत्वाचे असल्याने शाळा सुरू झाल्या पाहिजेत; परंतु त्यासाठी सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना शाळांमध्ये आहेत का, विद्यार्थी वाहतुकीची परिस्थिती काय आहे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी विद्यार्थींकडून करुन घेणे शाळा प्रशासनाला शक्य होईल का आदी प्रश्न जिल्हा प्रशासनाला सतावत आहेत.त्यामुळे गावपातळीवरील कोरोनाच्या परिस्थितीचा आणि सुरक्षा उपाययोजनांचा बारकाईने अभ्यास करुन एकाच वेळी सर्व शाळा सुरू न करता टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट मत आहे. शाळा पातळीवर थर्मल गन, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे किंवा नाही याचा अभ्यास करुन सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी शिक्षण विभागाला दिले. तसेच कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या गावांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा सुरू करु नये अशी पालकांची भूमिका आहे. शिवाय काही शिक्षक संघटनांनी देखील याला विरोध केला आहे. तपासणीत सहा शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थींच्या सुरक्षेला प्राधान्य देत पालकांना विश्वासात घेतल्याशिवाय शाळा सुरू करणार नाही, या जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेचे स्वागतच होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे