शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे पांढरे सोने मालपूर परिसरात पडले लाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:34 IST

कापूस हे शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे नगदी पीक आहे. तालुक्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी नऊ हजारांच्या वर याला ...

कापूस हे शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे नगदी पीक आहे. तालुक्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी नऊ हजारांच्या वर याला विक्रमी किंमत मिळाल्याने, शेतकऱ्यांच्या आशा चांगल्याच पल्लवीत झाल्या, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याही. मात्र, या चालू आठवड्यात येथील संपूर्ण कापूस लागवड केलेले क्षेत्रफळ लाल पडत असून, झाडावरील पाने गळून नुसते काही ठिकाणी काड्या उभ्या असून, नुसते लाल बोंडे चमकत आहेत. त्या बोंडाच्या आतही अळी प्रादुर्भाव असून हा बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे का लाल्याचा, हेही येथील शेतकऱ्यांना लक्षात येत नसल्यामुळे आता काय करावे, हेच त्यांना सूचत नसल्याचे चित्र शेतशिवारातील बांधावर दिसून आले. यामुळे या हतबल झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन तर विमा कंपन्यांनी विमाचा मोबदला त्वरित उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

कापसासह खरिपातील कांदा या चलनी पिकाचीही येथे वाताहत झालेली दिसून येत आहे. मागील आठवड्यात चांगली तरतरीत वाढीस लागलेली पात पिरगळली गेली असून, वाफे बसण्याचा प्रकार जाणवत असल्याने, पिके लांबलेला पाऊस आला अन् घातच झाला, असे येथील शेतकरी सांगताना दिसून येत आहेत. आजच्या बाजारभावानुसार चांगली स्वप्ने उराशी बाळगून हा निसर्गाने घात केल्यामुळे पाऊस दाखल झाला, तरी नुकसान व नाही आला असता, तरी नुकसान हे ठरलेलेच आहे. यामुळे आता शेती हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. वाढती मजुरी लक्षात घेऊन पिकांची अवस्था बघता, या वर्षीही लावलेले भांडवल निघणे मुश्कील झाले आहे.

या वर्षी सुरुवातीला कापसाला चांगला भाव आहे. मात्र, या लाल्याच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन पाहिजे तेवढे हाती लागणार नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट दिसून येत आहे. दरवर्षी उत्पादन यायचे, तर अपेक्षित भाव मिळत नव्हता, अशी खंत येथील शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. यासाठी आमच्या पिकाच्या विमा उतरविलेल्या कंपन्यांनी याची त्वरित दखल घ्यावी, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्यांनी त्यांना मदत देण्यास भाग पाडावे, अशी येथील शेतकरी किसन खलाणे, मच्छिंद्र सोनावणे सह कैलास खलाणे, ईश्वर वाघ, गिरधन माळी, वसंत आबा, पुंडलिक अहिरे, सुनील भलकार आदींनी केली आहे.

प्रतिक्रिया.... कापूस लागवडीपूर्वी प्रमाणित केल्यानुसार शेणखत, १ जूननंतर लागवड, रासायनिक खतांची योग्य वेळेवर मात्रा, तसेच चार कीटनाशकांची वेळोवेळी फवारणी करूनही अख्खा कापूस लाल पडून बोंडे किळली. या आठवडय़ात याचा प्रादुर्भाव जास्त झाला. लाल झाल्यावर फवारणी करून काहीच उपयोग झाला नाही. विमा काढला असून, कंपनीने पंचनामा करून योग्य भरपाई द्यावी.

- किसन यादव खलाणे, शेतकरी मालपूर ता.शिंदखेडा.

फोटो : मालपूर येथील शेतकऱ्यांचे पांढरे सोने असे लाल झाले.

120921\20210911_161002.jpg~120921\20210911_155932.jpg

मालपूर येथील कलवाडे शिवारातील किसन खलाणे यांच्या शेतातील लाल झालेला कापुस.~फोटो नं दोन