शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

धुळ्यातील जे. आर. सिटी शाळेत जनजाती संस्कृती रक्षा संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 20:49 IST

दत्तात्रय पवार : लेझीम पथकाने वेधले लक्ष 

ठळक मुद्देसंमेलनाच्या शेवटी संजय नरगान व विजय पावरा यांनी दोन ठरावांचे वाचन केले. पहिला ठराव हा जनजाती समाजाची परंपरागत आस्था आणि देवस्थानांचे संरक्षण तसेच त्यांच्या बोली भाषांचा विकास व्हावा, यासंबंधी होता. दुसरा ठराव हा धर्मांतरणांच्या दुष्परिणामांचे अध्ययन करण्यासाठी एक केंद्रीय चौकशी आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी करण्यात आली.संमेलनापूर्वी वनवासी क न्या संस्कार केंद्राच्या मुलींच्या लेझीम पथकाने चित्तवेधक प्रात्यक्षिक सादर करून येथे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विजय पावरा यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देशात एकूण ४०० जाती आहेत. त्यात महाराष्टÑ राज्यात २४ प्रमुख जनजाती आहेत. वनवासी समाज हा प्रामाणिक आहे. ‘वनवासी, ग्रामवासी आम्ही सर्व भारतवासी’ या संकल्पनेतूनच वनवासी कल्याण आश्रम काम करते, असे प्रतिपादन दत्तात्रय पवार यांनी येथे केले. दरम्यान, संमेलनापूर्वी विद्यार्थिनींनी लेझीमचे प्रात्यक्षिक सादर करून लक्ष वेधून घेतले. वनवासी कल्याण आश्रमतर्फे जनजाती रक्षा संमेलनाचे आयोजन शनिवारी जे. आर. सिटी हायस्कूलच्या मैदानात करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संमेलन समितीचे स्वागताध्यक्ष डॉ.जितेंद्र ठाकूर, देवगिरी प्रांताचे अध्यक्ष चैत्राम पवार, प्रा. बी. एस. काळे, के. के. पावरा, संजय नरगान आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संजय पाडवी यांनी केले. आभार अनारसिंग पावरा यांनी मानले. सकारात्मक विचार करून विकास साधावावनवासी समाज हा अल्पसंतुष्ट असला तरी तो समाधानी आहे. वनवासी कल्याण आश्रम हे माध्यम म्हणून काम करते. तरुणांनी सकारात्मक विचार करून आपला विकास साधला पाहिजे. तसेच आपल्या संस्कृतीचे रितीरिवाजांचे संरक्षण केले पाहिजे, असे त्यांनी येथे नमूद केले. संस्कृती संवर्धनासाठी संमेलन प्रास्ताविक वनवासी कल्याण आश्रमाचे जिल्ह्याचे सचिव प्रा. बी. एस. काळे यांनी केले. ते म्हणाले, की जनजाती संस्कृती रक्षा संमेलनाचा मुख्य उद्देश हा आपली संस्कृती रक्षणाचा संकल्प करण्यासाठी व संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी असल्याचे सांगितले. वनवासी कल्याण आश्रम ही सेवाभावी संस्था गेल्या ६५ वर्षांपासून वनवासींच्या कल्याणासाठी काम करत आहे. धुळे जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील शिरपूर व साक्री तालुक्यात वनवासी कल्याण आश्रमाचे काम मोठ्या प्रमाणात आहे. तसेच धुळे व शिंदखेड्यातही काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील ६२ गावांतील १०४ प्रकल्प वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून चालत असल्याचे त्यांनी येथे सांगितले. रितीरिवाजांची जपवणूक करा के. के. पावरा म्हणाले, की आदिवासी संस्कृती लोप पावत चालली आहे. दिवसेंदिवस तिच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्या संस्कृतीच्या चालीरिती, रिवाज, जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे संस्कार यांची जपवणूक केली पाहिजे, असे आवाहन केले. या वेळी त्यांनी आदिवासी भाषेत गीते सादर करून येथे उपस्थितांची मने जिंकली. या वेळी चैत्राम पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. दुर्गम भागात सुधारणा पाहिजेडॉ. जितेंद्र ठाकूर म्हणाले, की दुर्गम भागातील लोकांना रोजगार, कुपोषण, शिक्षण, बालसंस्कार, आरोग्य या समस्या व अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. यात सुधारणा झाली पाहिजे. आदिवासी संस्कृती  जतन करावी, असा सल्ला त्यांनी दिला.