शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

वन्य जिवांची तहान भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाण्याची सोय वन विभाग : जिल्ह्यात ८५ कृत्रिम तर ६० नैसर्गिक पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST

उन्हाळ्याच्या एप्रिल हीटच्या चटक्यांनी वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी उन्हाळ्यात पाणी पातळी खोलवर ...

उन्हाळ्याच्या एप्रिल हीटच्या चटक्यांनी वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी उन्हाळ्यात पाणी पातळी खोलवर जात आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील वन क्षेत्रांमध्ये असलेले नैसर्गिक पाणवठे देखील आता आटले असून कृत्रिम पाणवठ्यांमध्येही ठणठणाट आहे. वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी वन विभागाचे अधिकारी सरसावले आहेत.

वनक्षेत्रातील पाणवठ्यांमध्ये पाणी नसले तर पाण्याच्या शोधात वन्य प्राणी शेतशिवारांमध्ये किंवा वस्त्यांमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ सध्या शेतशिवारांमध्ये पाणी आहे. अशा परिस्थितीत वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या संपर्कात येऊन गंभीर घटना घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. नंदुरबार जिल्ह्यात बिबट्या आणि अस्वलाच्या हल्ल्याच्या दोन घटना गेल्या वर्षी घडल्या होत्या. साक्री तालुक्यात बिबट्यांचा शेतशिवारांमध्ये वावर असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे वन विभागाने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी उपलब्ध राहील याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे़

काही नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये काही प्रमाणात पाणी आहे तर काही पाणवठे आटले आहेत. कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी नसल्याचे चित्र आहे. हे वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वन विभागाची आहे़ त्यानुसार वन विभागाकडून पाण्याची उपलब्धता केली जात आहे. धुळे शहरानजीकच्या लळिंग कुरणातील कृत्रिम पाणवठ्यांमध्येदेखील पाणी टॅंकरद्वारे पाणी भरले जात आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लळिंग वनक्षेत्रामध्ये पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून दिले जाते़ लांडोर बंगल्याच्या परिसरात पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी टाकले जाते. तसेच काही अंतरावर असलेल्या पाणवठ्यांपर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी जाते. शिवाय लळिंग कुरणातील धरण आणि काही पाझर तलावांमध्ये अजुनही पाणीसाठा शिल्लक असल्याने वन्य प्राण्यांची पाण्याची सोय होत आहे. लांबच्या पाणवठ्यांमध्ये पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. वन्य जिवांसाठी पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्याच्या मोहिमेत सातत्याची गरज आहे.