शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

वन्य जिवांची तहान भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाण्याची सोय वन विभाग : जिल्ह्यात ८५ कृत्रिम तर ६० नैसर्गिक पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST

उन्हाळ्याच्या एप्रिल हीटच्या चटक्यांनी वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी उन्हाळ्यात पाणी पातळी खोलवर ...

उन्हाळ्याच्या एप्रिल हीटच्या चटक्यांनी वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी उन्हाळ्यात पाणी पातळी खोलवर जात आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील वन क्षेत्रांमध्ये असलेले नैसर्गिक पाणवठे देखील आता आटले असून कृत्रिम पाणवठ्यांमध्येही ठणठणाट आहे. वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी वन विभागाचे अधिकारी सरसावले आहेत.

वनक्षेत्रातील पाणवठ्यांमध्ये पाणी नसले तर पाण्याच्या शोधात वन्य प्राणी शेतशिवारांमध्ये किंवा वस्त्यांमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ सध्या शेतशिवारांमध्ये पाणी आहे. अशा परिस्थितीत वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या संपर्कात येऊन गंभीर घटना घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. नंदुरबार जिल्ह्यात बिबट्या आणि अस्वलाच्या हल्ल्याच्या दोन घटना गेल्या वर्षी घडल्या होत्या. साक्री तालुक्यात बिबट्यांचा शेतशिवारांमध्ये वावर असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे वन विभागाने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी उपलब्ध राहील याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे़

काही नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये काही प्रमाणात पाणी आहे तर काही पाणवठे आटले आहेत. कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी नसल्याचे चित्र आहे. हे वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वन विभागाची आहे़ त्यानुसार वन विभागाकडून पाण्याची उपलब्धता केली जात आहे. धुळे शहरानजीकच्या लळिंग कुरणातील कृत्रिम पाणवठ्यांमध्येदेखील पाणी टॅंकरद्वारे पाणी भरले जात आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लळिंग वनक्षेत्रामध्ये पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून दिले जाते़ लांडोर बंगल्याच्या परिसरात पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी टाकले जाते. तसेच काही अंतरावर असलेल्या पाणवठ्यांपर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी जाते. शिवाय लळिंग कुरणातील धरण आणि काही पाझर तलावांमध्ये अजुनही पाणीसाठा शिल्लक असल्याने वन्य प्राण्यांची पाण्याची सोय होत आहे. लांबच्या पाणवठ्यांमध्ये पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. वन्य जिवांसाठी पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्याच्या मोहिमेत सातत्याची गरज आहे.