शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

अमरावती प्रकल्पातून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST

आगामी पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी १५ मार्च रोजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात अमरावती ...

आगामी पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी १५ मार्च रोजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात अमरावती मध्यम प्रकल्पातील १३६.४९३ दशलक्ष घनफूट पाणी हे शिंदखेडा तालुक्यातील ११ गावांसाठी आरक्षित करण्यात आले होते. तसा दोंडाईचा अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी टंचाईचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार आज वरीलप्रमाणे पहिले आवर्तन सोडण्यात आले असल्याचे अमरावती मध्यम प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता पीयूष पाटील यांनी सांगितले.

हे पाणी फक्त पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. कोणीही कोल्हापुरी बंधारे अथवा शेतात वळवू नये. यासाठी सिंचन विभागाने पथक तयार करून पाण्याची चोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी व तसेच पाणी चोरी आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे.

हे पाणी उजव्या कालव्यातून जाणार असल्यामुळे कालव्याच्या आजूबाजूच्या जमिनीतील पाण्याची पातळी वाढून विहिरींचा जलस्रोतदेखील वाढणार आहे. यामुळे बागायती कापूस लागवडीसाठी संधी असल्याने अप्रत्यक्षपणे तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, तर प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत कालव्यातील पाणी झिरपत असल्याने तेथील शेतकऱ्यांचा आगामी खरीप हंगाम मात्र लांबणीवर पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यावेळी प्रकल्पातून पाणी सोडताना विखरणचे सरपंच महेंद्र पवार, खर्दे सरपंच सुरेश पवार, अमरावती मध्यम प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता पीयूष पाटील, विशाल अहिरराव, प्रकल्पाचे कर्मचारी मगन चौधरी, जगन पवार, भुरु गिरासेे आदींसह टंचाईग्रस्त गावातील प्रतिनिधी उपस्थित होते.

पाणी वाया जाण्याची भीती

उजव्या कालव्यातून हे पाणी सोडले जाणार आहे. कालवा नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाण्याची भीती मालपूरकरांनी व्यक्त केली आहे.

असा प्रयोग भरपावसाळ्यात ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्यातून विखरण तलाव भरण्यासाठी केला गेला होता. मात्र, तेथे घोटभर पाणी पोहोचले नसल्याचे त्यावेळी दिसून आले..

यासाठी प्रथम कालव्याची दुरुस्ती महत्त्वाची असून एक्स्प्रेस कालवा झाला तरच पाणी विखरण तलावात पोहोचेल. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.