शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: March 24, 2017 00:23 IST

जैताणे : नकट्या बंधाºयात ३० टक्केच पाणीसाठा

जैताणे :  साक्री  तालुक्यातील माळमाथा परिसरातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाºया जैताणे गावातील ग्रामस्थांवर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. येथील नकट्या बंधाºयात ३० ते ३५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. जैताणे परिसरातील भूजल पातळी कमालीची घसरल्याने पाणीपुरवठ्यासाठी वापरात असणाºया कूपनलिकाही एकापाठोपाठ आटत चालल्या आहेत.  ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा विभाग दिवसरात्र परिश्रम घेऊन पाणीपुरवठा करण्यासाठी झटत आहे. आटत जाणाºया कूपनलिकांऐवजी पर्यायी राखीव कूपनलिकांचा वापर करून समस्येवर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. काही कूपनलिकांमधील सबमर्सिबल पंप अधिक खोलवर उतरवून पाणी शोधले जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून पाच ते सहा दिवसांआड नळांना पाणी येत असल्याने वेळप्रसंगी पाण्यासाठी पायपीट करून भटकंती करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढवली आहे.परिसरातील जलपातळीचे प्रमुख स्त्रोत असणाºया नकट्या बंधाºयाच्या जलसाठ्यातही झपाट्याने घट होत चालली आहे. आजअखेर फक्त ३० ते ३५ टक्केच जलसाठा या बंधाºयात शिल्लक आहे. त्यात अजून पूर्ण उन्हाळा बाकी आहे. आजच अशी स्थिती असल्याने पुढे काय? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नकट्या बंधाºयाची उंची वाढवण्याची मागणी परिसरातून प्रशासनाकडे व शासनदप्तरी वारंवार करण्यात येऊनही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. जलसाठा झपाट्याने संपत असल्यामुळे पुन्हा एकदा या मागणीने उचल धरली आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. वीज महावितरण कंपनीच्या मनमानी भारनियमनाचा फटकाही सार्वजनिक पाणीपुरवठ्याला बसत आहे. येथील सरपंच संजय खैरनार यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात भारनियमन बंद करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. ठरलेल्या भारनियमनाच्या वेळेव्यतिरिक्तही चार-पाच तास वीजपुरवठा खंडित असतो. म्हणून वेळेत कूपनलिकांवरून जलकुंभ भरणे शक्य होत नाही. त्याचा विपरित परिणाम पाणीपुरवठ्याच्या नियमिततेवर होत असल्याची प्रतिक्रिया यादव भदाणे यांनी दिली.