शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: March 24, 2017 00:23 IST

जैताणे : नकट्या बंधाºयात ३० टक्केच पाणीसाठा

जैताणे :  साक्री  तालुक्यातील माळमाथा परिसरातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाºया जैताणे गावातील ग्रामस्थांवर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. येथील नकट्या बंधाºयात ३० ते ३५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. जैताणे परिसरातील भूजल पातळी कमालीची घसरल्याने पाणीपुरवठ्यासाठी वापरात असणाºया कूपनलिकाही एकापाठोपाठ आटत चालल्या आहेत.  ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा विभाग दिवसरात्र परिश्रम घेऊन पाणीपुरवठा करण्यासाठी झटत आहे. आटत जाणाºया कूपनलिकांऐवजी पर्यायी राखीव कूपनलिकांचा वापर करून समस्येवर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. काही कूपनलिकांमधील सबमर्सिबल पंप अधिक खोलवर उतरवून पाणी शोधले जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून पाच ते सहा दिवसांआड नळांना पाणी येत असल्याने वेळप्रसंगी पाण्यासाठी पायपीट करून भटकंती करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढवली आहे.परिसरातील जलपातळीचे प्रमुख स्त्रोत असणाºया नकट्या बंधाºयाच्या जलसाठ्यातही झपाट्याने घट होत चालली आहे. आजअखेर फक्त ३० ते ३५ टक्केच जलसाठा या बंधाºयात शिल्लक आहे. त्यात अजून पूर्ण उन्हाळा बाकी आहे. आजच अशी स्थिती असल्याने पुढे काय? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नकट्या बंधाºयाची उंची वाढवण्याची मागणी परिसरातून प्रशासनाकडे व शासनदप्तरी वारंवार करण्यात येऊनही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. जलसाठा झपाट्याने संपत असल्यामुळे पुन्हा एकदा या मागणीने उचल धरली आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. वीज महावितरण कंपनीच्या मनमानी भारनियमनाचा फटकाही सार्वजनिक पाणीपुरवठ्याला बसत आहे. येथील सरपंच संजय खैरनार यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात भारनियमन बंद करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. ठरलेल्या भारनियमनाच्या वेळेव्यतिरिक्तही चार-पाच तास वीजपुरवठा खंडित असतो. म्हणून वेळेत कूपनलिकांवरून जलकुंभ भरणे शक्य होत नाही. त्याचा विपरित परिणाम पाणीपुरवठ्याच्या नियमिततेवर होत असल्याची प्रतिक्रिया यादव भदाणे यांनी दिली.