शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धुळे जिल्ह्यात ५५ हजार शेतक-यांना कर्जमाफीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 18:09 IST

कर्जमाफी : लाभ न मिळालेल्या शेतकºयांच्या अर्जांची पडताळणीचे काम सुरू

ठळक मुद्देकर्जमाफीचा लाभ शेतक-यांना मिळावा; यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय कमिटी गठीत करण्यात आली होती. या कमिटीतील सदस्य अद्याप ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही; अशा शेतकºयांच्या अर्जांची पडताळणीचे काम करत आहे.अनेकांचे कर्ज घेतांना नाव दुसरे व अर्ज भरताना वेगळ्या नावाने भरले गेले आहे. तर अनेकांनी कर्जमाफीसाठी अर्ज करूनही त्यांचे नाव यादीतच आले नसल्याची परिस्थिती आहे.तालुकास्तरीय कमिटी शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी करून त्याचा अहवाल तयार करून राष्टÑीयकृत बॅँकांना देणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ८७ हजार ७०५ शेतकºयांनी अर्ज भरले होते. पैकी जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार २०२ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे; तर जिल्ह्यात ५५ हजार ५०३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. अद्याप ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकºयांच्या अर्ज  पडताळणीचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. राज्य शासनाने शेतकºयांसाठी  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकदीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व  दीड लाख रुपयांवरील शेतकºयांना एकवेळ समझोता योजना लागू केली होती. तसेच २०१५-२०१६, २०१६-२०१७ वर्षात ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमित परतफेड केली, अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. २००९- २०१० ते २०१५-२०१६ या कालावधित कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकºयांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील. त्यांना वरील योजनेचा लाभ देण्याचे घोषीत करण्यात आले होते. 

३२ हजार शेतक-यांच्या खात्यात ११८ कोटी जमा शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्ह्यात ८७ हजार ७०५ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आपले सरकार या पोर्टलवर अर्ज केले होते. त्यानुसार आतापर्यंत ३२ हजार २०२ शेतकºयांना आतापर्यंत लाभ मिळाला असून या शेतकºयांच्या बॅँक खात्यात ११८ कोटी ९४ लाख १६ हजार ९४६ जमा करण्यात आले आहे. ३२ पैकी २५ हजार शेतकरी जिल्हा बॅँकेचे कर्जमाफीसाठी अर्ज करणाºया एकूण शेतकºयांपैकी २५ हजार ११ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचे कर्जदार असून त्यांच्या खात्यात ६८ कोटी ७२ लाख १६ हजार ९४६ इतकी रक्कम जानेवारी अखेरपर्यंत जमा झाली आहे. तर उर्वरीत ७ हजार १९१ शेतकरी हे राष्टÑीयकृत बॅँकेचे कर्जदार असून या शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची ५० कोटी २२ लाख रुपये रक्कम जमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.