शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

धुळे जिल्ह्यात ५५ हजार शेतक-यांना कर्जमाफीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 18:09 IST

कर्जमाफी : लाभ न मिळालेल्या शेतकºयांच्या अर्जांची पडताळणीचे काम सुरू

ठळक मुद्देकर्जमाफीचा लाभ शेतक-यांना मिळावा; यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय कमिटी गठीत करण्यात आली होती. या कमिटीतील सदस्य अद्याप ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही; अशा शेतकºयांच्या अर्जांची पडताळणीचे काम करत आहे.अनेकांचे कर्ज घेतांना नाव दुसरे व अर्ज भरताना वेगळ्या नावाने भरले गेले आहे. तर अनेकांनी कर्जमाफीसाठी अर्ज करूनही त्यांचे नाव यादीतच आले नसल्याची परिस्थिती आहे.तालुकास्तरीय कमिटी शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी करून त्याचा अहवाल तयार करून राष्टÑीयकृत बॅँकांना देणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ८७ हजार ७०५ शेतकºयांनी अर्ज भरले होते. पैकी जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार २०२ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे; तर जिल्ह्यात ५५ हजार ५०३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. अद्याप ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकºयांच्या अर्ज  पडताळणीचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. राज्य शासनाने शेतकºयांसाठी  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकदीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व  दीड लाख रुपयांवरील शेतकºयांना एकवेळ समझोता योजना लागू केली होती. तसेच २०१५-२०१६, २०१६-२०१७ वर्षात ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमित परतफेड केली, अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. २००९- २०१० ते २०१५-२०१६ या कालावधित कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकºयांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील. त्यांना वरील योजनेचा लाभ देण्याचे घोषीत करण्यात आले होते. 

३२ हजार शेतक-यांच्या खात्यात ११८ कोटी जमा शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्ह्यात ८७ हजार ७०५ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आपले सरकार या पोर्टलवर अर्ज केले होते. त्यानुसार आतापर्यंत ३२ हजार २०२ शेतकºयांना आतापर्यंत लाभ मिळाला असून या शेतकºयांच्या बॅँक खात्यात ११८ कोटी ९४ लाख १६ हजार ९४६ जमा करण्यात आले आहे. ३२ पैकी २५ हजार शेतकरी जिल्हा बॅँकेचे कर्जमाफीसाठी अर्ज करणाºया एकूण शेतकºयांपैकी २५ हजार ११ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचे कर्जदार असून त्यांच्या खात्यात ६८ कोटी ७२ लाख १६ हजार ९४६ इतकी रक्कम जानेवारी अखेरपर्यंत जमा झाली आहे. तर उर्वरीत ७ हजार १९१ शेतकरी हे राष्टÑीयकृत बॅँकेचे कर्जदार असून या शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची ५० कोटी २२ लाख रुपये रक्कम जमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.