शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात ५५ हजार शेतक-यांना कर्जमाफीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 18:09 IST

कर्जमाफी : लाभ न मिळालेल्या शेतकºयांच्या अर्जांची पडताळणीचे काम सुरू

ठळक मुद्देकर्जमाफीचा लाभ शेतक-यांना मिळावा; यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय कमिटी गठीत करण्यात आली होती. या कमिटीतील सदस्य अद्याप ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही; अशा शेतकºयांच्या अर्जांची पडताळणीचे काम करत आहे.अनेकांचे कर्ज घेतांना नाव दुसरे व अर्ज भरताना वेगळ्या नावाने भरले गेले आहे. तर अनेकांनी कर्जमाफीसाठी अर्ज करूनही त्यांचे नाव यादीतच आले नसल्याची परिस्थिती आहे.तालुकास्तरीय कमिटी शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी करून त्याचा अहवाल तयार करून राष्टÑीयकृत बॅँकांना देणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ८७ हजार ७०५ शेतकºयांनी अर्ज भरले होते. पैकी जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार २०२ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे; तर जिल्ह्यात ५५ हजार ५०३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. अद्याप ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकºयांच्या अर्ज  पडताळणीचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. राज्य शासनाने शेतकºयांसाठी  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकदीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व  दीड लाख रुपयांवरील शेतकºयांना एकवेळ समझोता योजना लागू केली होती. तसेच २०१५-२०१६, २०१६-२०१७ वर्षात ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमित परतफेड केली, अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. २००९- २०१० ते २०१५-२०१६ या कालावधित कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकºयांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील. त्यांना वरील योजनेचा लाभ देण्याचे घोषीत करण्यात आले होते. 

३२ हजार शेतक-यांच्या खात्यात ११८ कोटी जमा शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्ह्यात ८७ हजार ७०५ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आपले सरकार या पोर्टलवर अर्ज केले होते. त्यानुसार आतापर्यंत ३२ हजार २०२ शेतकºयांना आतापर्यंत लाभ मिळाला असून या शेतकºयांच्या बॅँक खात्यात ११८ कोटी ९४ लाख १६ हजार ९४६ जमा करण्यात आले आहे. ३२ पैकी २५ हजार शेतकरी जिल्हा बॅँकेचे कर्जमाफीसाठी अर्ज करणाºया एकूण शेतकºयांपैकी २५ हजार ११ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचे कर्जदार असून त्यांच्या खात्यात ६८ कोटी ७२ लाख १६ हजार ९४६ इतकी रक्कम जानेवारी अखेरपर्यंत जमा झाली आहे. तर उर्वरीत ७ हजार १९१ शेतकरी हे राष्टÑीयकृत बॅँकेचे कर्जदार असून या शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची ५० कोटी २२ लाख रुपये रक्कम जमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.