शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोलीत ३५ गायींचा दुर्दैवी मृत्यू

By admin | Updated: May 31, 2014 08:03 IST

कुर्‍हाडदा रस्त्यावरील काठेवाडी वस्तीतील दोन गोसेवकांच्या ३५ गायींचा तणनाशकाची फवारणी केलेले गवत खाण्यात आल्याने मृत्यू झाला. आणखी १५ गायींची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांकडून त्यांच्यावर शर्तीचे उपचार सुरू आहेत.

शिरसोली : कुर्‍हाडदा रस्त्यावरील काठेवाडी वस्तीतील दोन गोसेवकांच्या ३५ गायींचा तणनाशकाची फवारणी केलेले गवत खाण्यात आल्याने मृत्यू झाला. आणखी १५ गायींची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांकडून त्यांच्यावर शर्तीचे उपचार सुरू आहेत.तणनाशक औषधामुळे मृत्यूशिरसोली परिसरातील कुर्‍हाडदा रस्त्यावर भिमा काठेवाडी, हिरा काठेवाडी, रघुनाथ काठेवाडी यांच्यासह पाच ते सहा जणांची वस्ती आहे. गो-पालन आणि संगोपन हा व्यवसाय असलेल्या भिमा काठेवाडी व रघुनाथ काठेवाडी यांनी मंगळवार २७ रोजी शिरसोली रेल्वे स्टेशन परिसरात गायी चराईसाठी आणल्या होत्या. चराई दरम्यान काही शेतातील तणनाशक औषध फवारणी केलेले गवत या गायींच्या खाण्यात आले. पाणी प्यायल्यानंतर तत्काळ मृत्यूसंध्याकाळी गायींना भिमा काठेवाडी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी वाड्यावर आणले. वाड्यावर गायींनी पाणी प्यायल्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने गायी दगावण्यास सुरुवात झाली. पाणी प्यायल्यानंतर पोट फुगून कातडी कोरडी पडायला सुरुवात झाली. एकाच वेळी दहा ते ११ गायी दगावल्यानंतर काठेवाडी कुटुंबात घबराट पसरली. त्यांनी शिरसोली गावात धाव घेत गुरांच्या डॉक्टरांना उपचारासाठी बोलविले. डॉक्टरांनी उपचार केले मात्र गायी दगावणे सुरुच होते. बुधवारी भिमा काठेवाडी यांनी महाबळ परिसरातील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडे धाव घेत उपचारासाठी बोलविले. या दरम्यान गुरांचे दगावणे सुरुच असल्याने डॉक्टरदेखील हतबल झाले. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत भिमा काठेवाडी यांचे २० आणि रघुनाथ काठेवाडी यांच्या मालकीच्या १५ गायींचा मृत्यू झाला आहे. तर अजून १५ गायी गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.मृत गायींचा व्हिसेरा पुण्याला रवानामृत झालेल्या ३५ गायींपैकी काही गायींचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. चार्‍यासोबत अतितीव्र स्वरूपाची औषधी पोटात गेल्यामुळे गायींचे यकृत खराब झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. डॉक्टरांनी मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी व्हिसेरा तपासणीसाठी पशुरोग अन्वेशण विभाग प्रयोगशाळा, पुणे येथे पाठविला आहे.डॉक्टरांचे पथक तळ ठोकूनगंभीर आजारी असलेल्या गायींवर उपचार उपलब्ध व्हावे यासाठी डॉ.एन.ई.चोपडे, आर.एस.जाधव, डॉ.गोपाळ सोनवणे, डॉ.बारेला, डी.एम.महाजन, एन.डी.पाटील यांचे पथक शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत थांबून होते. गंभीर आजारी असलेल्या १५ गायींवर औषधोपचार सुरू आहेत.