शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

शिरसोलीत ३५ गायींचा दुर्दैवी मृत्यू

By admin | Updated: May 31, 2014 08:03 IST

कुर्‍हाडदा रस्त्यावरील काठेवाडी वस्तीतील दोन गोसेवकांच्या ३५ गायींचा तणनाशकाची फवारणी केलेले गवत खाण्यात आल्याने मृत्यू झाला. आणखी १५ गायींची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांकडून त्यांच्यावर शर्तीचे उपचार सुरू आहेत.

शिरसोली : कुर्‍हाडदा रस्त्यावरील काठेवाडी वस्तीतील दोन गोसेवकांच्या ३५ गायींचा तणनाशकाची फवारणी केलेले गवत खाण्यात आल्याने मृत्यू झाला. आणखी १५ गायींची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांकडून त्यांच्यावर शर्तीचे उपचार सुरू आहेत.तणनाशक औषधामुळे मृत्यूशिरसोली परिसरातील कुर्‍हाडदा रस्त्यावर भिमा काठेवाडी, हिरा काठेवाडी, रघुनाथ काठेवाडी यांच्यासह पाच ते सहा जणांची वस्ती आहे. गो-पालन आणि संगोपन हा व्यवसाय असलेल्या भिमा काठेवाडी व रघुनाथ काठेवाडी यांनी मंगळवार २७ रोजी शिरसोली रेल्वे स्टेशन परिसरात गायी चराईसाठी आणल्या होत्या. चराई दरम्यान काही शेतातील तणनाशक औषध फवारणी केलेले गवत या गायींच्या खाण्यात आले. पाणी प्यायल्यानंतर तत्काळ मृत्यूसंध्याकाळी गायींना भिमा काठेवाडी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी वाड्यावर आणले. वाड्यावर गायींनी पाणी प्यायल्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने गायी दगावण्यास सुरुवात झाली. पाणी प्यायल्यानंतर पोट फुगून कातडी कोरडी पडायला सुरुवात झाली. एकाच वेळी दहा ते ११ गायी दगावल्यानंतर काठेवाडी कुटुंबात घबराट पसरली. त्यांनी शिरसोली गावात धाव घेत गुरांच्या डॉक्टरांना उपचारासाठी बोलविले. डॉक्टरांनी उपचार केले मात्र गायी दगावणे सुरुच होते. बुधवारी भिमा काठेवाडी यांनी महाबळ परिसरातील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडे धाव घेत उपचारासाठी बोलविले. या दरम्यान गुरांचे दगावणे सुरुच असल्याने डॉक्टरदेखील हतबल झाले. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत भिमा काठेवाडी यांचे २० आणि रघुनाथ काठेवाडी यांच्या मालकीच्या १५ गायींचा मृत्यू झाला आहे. तर अजून १५ गायी गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.मृत गायींचा व्हिसेरा पुण्याला रवानामृत झालेल्या ३५ गायींपैकी काही गायींचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. चार्‍यासोबत अतितीव्र स्वरूपाची औषधी पोटात गेल्यामुळे गायींचे यकृत खराब झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. डॉक्टरांनी मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी व्हिसेरा तपासणीसाठी पशुरोग अन्वेशण विभाग प्रयोगशाळा, पुणे येथे पाठविला आहे.डॉक्टरांचे पथक तळ ठोकूनगंभीर आजारी असलेल्या गायींवर उपचार उपलब्ध व्हावे यासाठी डॉ.एन.ई.चोपडे, आर.एस.जाधव, डॉ.गोपाळ सोनवणे, डॉ.बारेला, डी.एम.महाजन, एन.डी.पाटील यांचे पथक शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत थांबून होते. गंभीर आजारी असलेल्या १५ गायींवर औषधोपचार सुरू आहेत.