शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पिस्तुलचा धाक दाखवत ट्रक पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 18:54 IST

महामार्गावर दरोडा : मुद्देमालही लंपास

ठळक मुद्देधुळ्यानजिकची घटनामोहाडी पोलिसात नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर सशस्त्र दरोडेखोरांनी चालकावर पिस्तुल रोखून सुमारे १३ लाखांच्या मुद्देमालांसह ट्रक पळविल्याची घटना सोमवारी रात्री घडली़ याप्रकरणी मंगळवारी पहाटे मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला़ शरद बाळासाहेब चव्हाण (३२, बांभोरा जि़ अहमदनगर) या तरुण शेतकºयाने फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, शरद चव्हाण हे लेबर कॉन्ट्रॅक्टर असून ते दौंड येथील साखर कारखान्यात मजूर पुरविण्याची कामे करतात़ सोमवार २२ आॅक्टोबर रोजी अमळनेर येथून एमएच १८ एए ४४५१ या ट्रकमध्ये ११ बैल तर एमएच १८ एए ५७२४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये ७ बैल आणि १० लोखंडी गाडे भरलेले होते़ हे दोनही ट्रक अमळनेर येथून धुळेमार्गे दौंडकडे जात असताना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे तालुक्यातील अवधान गावाजवळ एमएच १८ एए ५७२४ हा ट्रक पुढे निघून गेला़ त्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दुसरा ट्रक महामार्गावर निघाला़ अवधान एमआयडीसीपासून १ किमी इतक्या अंतरावर दुचाकी आणि चार चाकी वाहनातून आलेल्या २५ ते ३० जणांनी ट्रकला घेरले़ पोलिसात असल्याचे सांगून दोन दरोडेखोर गावठी कट्टे घेऊन ट्रकमध्ये चढले़ चालकावर पिस्तूल रोखून त्यांनी ट्रक अवधान फाट्यापर्यंत आणला़ त्यानंतर या दरोडेखोरांनी ट्रक चालकाला ट्रकमधून उतरविले आणि ट्रकसह पलायन केले़ एकूण १२ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल दरोडेखोरांनी जबरीने चोरुन नेला़ २५ ते ३० वयोगटातील दरोडेखोर मराठी व हिंदी भाषा बोलत होते़ याप्रकरणी भादंवि कलम ३९५ प्रमाणे मोहाडी पोलिसात दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी