शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

कचराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST

धुळे : येथील महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कचऱ्याचा प्रश्न पुन्हा पेटला. कचरा संकलनामध्ये वाॅटरग्रेस कंपनी असमर्थ ठरल्याने ठेका रिलायबलला ...

धुळे : येथील महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कचऱ्याचा प्रश्न पुन्हा पेटला. कचरा संकलनामध्ये वाॅटरग्रेस कंपनी असमर्थ ठरल्याने ठेका रिलायबलला देण्याचे ठरले. मात्र, रिलायबलने ऐनवेळी नकार देत महापालिका प्रशासनाला तोंडघशी पाडले. हाच मुद्दा धरून सदस्यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. सभापती सुनील बैसाणे यांनीदेखील शंका उपस्थित केल्याने हा मुद्दा वादाचा ठरला. येथील महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक सभापती सुनील बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सहायक आयुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.

स्थायी समितीच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे वॉटरग्रेस आणि रिलायबल या दोन कंपन्यांभोवती चर्चा फिरली. माजी सभापती युवराज पाटील यांनी कचऱ्याचा प्रश्न मांडला. ते म्हणाले, शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. जनता आता आमच्या दारापुढे कचरा टाकू लागले आहेत. अमोल मासुळे म्हणाले, वॉटरग्रेसचे काम योग्य नसल्याने त्या कंपनीला काळ्या यादीत टाकले जाणार होते. मात्र, त्यांनी कार्यमुक्ती मागितल्याने ब्लॅकलिस्टेड केले गेले नाही. वॉटरग्रेस डच्चू देत रिलायबलला काम दिले जाणार होते. मात्र, या कंपनीने काम सुरू करण्यापूर्वीच नकार का दिला. प्रशासन वॉटरग्रेसला पाठीशी घालत आहे का, असा सवालही त्यांनी केला. नगरसेवक संतोष खताळ म्हणाले, वॉटरग्रेसवर कारवाई न करू शकणे म्हणजेच महापालिकेची नामुष्की आहे. यातून प्रशासन हतबल दिसत आहे. वॉटरग्रेसच्या भरवशावर कचरा संकलनाचे काम कसे होणार, नागरिकांना सुविधा मिळत नाही, वॉटरग्रेसचा मनमानी कारभार यापुढे सहन केला जाईल का, असा सवालही उपस्थित केला. सभापती बैसाणे यांनीदेखील वॉटरग्रेस कंपनीवर टीकेचे बाण सोडत काम न करता बिल कसे अदा केले गेले, असा सवाल उपस्थित केला.

कमलेश देवरे यांनी देवपुरातील रस्त्यांच्या समस्यांबाबत पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित केला. भूमिगत गटारीसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र, रस्त्यांची कामे झालेली नाहीत. आता ठेकेदारावर कोणती कारवाई होईल, असा सवाल उपस्थित केला. यावर अभियंता शिंदे म्हणाले, भूमिगत गटारीचे काम समाधानकारक नाही. त्यांच्याकडे पुन्हा तक्रार केली जाईल. त्यांनी ऐकले नाही, तर शेवटी निविदा रद्द करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.