शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

धुळे जिल्ह्यातील चिमठावळ येथे तीन भावंडाचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 11:44 IST

मृतांमध्ये दोन सख्खे तर एक चुलत भाऊ

सोनगीर (जि.धुळे): शिंदखेडा तालुक्यातील चिमठावळ येथील तीन भावंडांचा विहिरीत बुडून मयत झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास उघडकीस आली. तीन पैकी दोन सख्खे भाऊ व एक चुलत भाऊ होता़ गौरव लिलाधर जाधव (१७), दीपक लिलाधर जाधव (११) व दीपक ज्ञानेश्वर जाधव (१५) असे मयतांची नावे आहेत.चिमठावळ येथील गौरव व दोन्ही दीपक हे तिघेजण रविवारी सायंकाळी चारवाजेच्या सुमारास स्वत:च्या शेतात चारा घेण्यासाठी सायकलवर गेले होते. सायंकाळ झाली तरी ते परत न आल्याने गौरवचे काका शेतात त्यांना शोधण्यासाठी गेले असता त्यांना ते दिसून आले नाही. पण विहीरीपासून काही अंतरावर शेतात सायकली उभ्या असलेल्या त्यांना दिसून आल्या. संशय आल्याने त्यांनी विहीरीत डोकावून पाहिले तेव्हा पाण्यावर एकाची चप्पल तरंगताना दिसून आली. ते धावतच गावात आले. त्यांनी गौरव व दीपकचे वडील लिलाधरला ही घटना सांगितली. त्यांचे नातेवाईक मनोहर पाटील व नितीन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी विहिरीत उतरून एक एक करीत तिघांना बाहेर काढले. तीनही मयत मुलांना सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ डॉ. किरणकुमार निकवाडे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.गौरव हा अकरावीला येथील एन. जी. बागूल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होता. त्याचा लहान भाऊ दीपक हा येथील आनंदवन माध्यमिक विद्यालयात सहावीचा विद्यार्थी होता. चुलतभाऊ दीपक हा सोंडले आश्रमशाळेत नववीत शिकत होता.दीपकचे वडील लिलाधर जाधव हे येथील विठ्ठल रखुमाई पतसंस्थेत शिपाई म्हणून कार्यरत असून दररोज जा ये करायचा व मुलांना शाळेत घेऊन यायचा. त्यांना दोन मुले असून. ते दोघेही मयत झाले. तर दुसºया दीपकचे वडील ज्ञानेश्वर जाधव हे बांधकाम ठेकेदाराकडे काम करतात. त्यांना दीपक हा एकुलता मुलगा व एक मुलगी आहे. दोन्ही परिवार गरीब कुटुंबातील आहेत. या घटनेमुळे चिमठावळ गावावर शोककळा पसरलेली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे