शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 22:39 IST

तºहाडी, मोहाडी प्र.डांगरी परिसर : लष्करी अळीचे मका पिकावर आक्रमण

तºहाडी/मोहाडी प्र.डांगरी : परिसरातील शेत शिवारात लष्करी अळीने मका पिकावर हल्ला चढविल्याने हातातोंडाशी आलेली पिके जाण्याची भीती व्यक्त होत आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.तºहाडी परिसरशिरपूर तालुक्यातील तºहाडीसह परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची पेरणी केली आहे. शेकडो एकरवरील मका पिकावर लष्करी अळीने आक्रमण केल्याने हाता तोंडाशी आलेले पिक वाया जाण्याच्या भितीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.ऐन दुष्काळी परिस्थितीत मका पिकापासून जनावरांना चारा उपलब्ध होईल. या भरवशावर शेतकºयांनी पेरा केला होता. परंतू मका पिकावर मोठ्या प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव झाल्याने तो चारा जनावरांना घातल्यास जनावरे दगावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही दिवसापुर्वी मक्याच्या एका रोपट्यात तीन ते चार अळ्या आतील भागात दिसून येत होत्या. मात्र, आता त्याच अळ्या मक्याच्या कणसात शिरल्याने मका पिक पूर्णपणे उध्वस्त झाले असून शेतकºयांना मक्याचा हुरडा खाण्याचीही भिती वाटु लागली आहे. कृषी विभागाने शेतकºयांना फवारणी करण्याचे आवाहन केले होते. परंतू त्या फवारणीने काहीच परिणाम झाला नसल्याने कृषी विभागही मार्गदर्शन करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. पिकावर चार फवारणी करूनही मका पिक हातातून गेले असून महागडया औषधांचाही काहीच परिणाम दिसून आला नसल्याने शेतकरी मोठया संकटात सापडले आहेत.मका पिकापासून उत्पादन तर मिळणार नाहीच, परंतू चाराही मिळणार नसल्याने शेतकरी हताश झाले आहे. पाच-सहा वर्षांपासून दुष्काळात होरपळलेला शेतकरी यंदा मोठया पावसाच्या प्रतीक्षेत होता. सततच्या रिमझिम पावसाने पिकेही चांगली आली होती. परंतू मका पिकावर लष्करी अळीने आक्रमण करुन पिक हिरावून घेतले आहे.मका पिकावर शेतकºयांनी हजारो रुपये खर्च केले. मात्र, लष्करी अळीच्या आक्रमणामुळे झालेला खर्चही निघाणार नाही. त्यामुळे शासनाने पिकाचे पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.मोहाडी प्र.डांगरी परिसरधुळे तालुक्यातील मोहाडी प्र.डांगरीसह परिसरातील सातरने, विश्वनाथ, सुकवड, हेंकलवाडी, तामसवाडी, शिरढाने, जापी आदी शिवारात मका पिकावर लष्करी अळीने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.मोहाडी परिसरात मका पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कारण विनाखर्चीक हे पीक असल्यामुळे यावर्षीही मोठया प्रमाणात मक्याचा पेरा झालेला आहे. परंतू पिकाच्या प्राथमिक अवस्थेत पोग्यावरच अळीचे आक्रमण झाल्यामुळे महागडे कीटकनाशक फवारणी करूनही अळी आटोक्यात आली नव्हती. आता तर पीक मोठे झाले असून चार ते पाच फवारण्या करूनही अळी आटोक्यात न येता कणसात शिरली आहे. त्यामुळे उत्पन्नात जास्त घट येण्याची शक्यता शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत.अळीचा प्रादुर्भाव जास्त झालेल्या क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून कृषी विभागाने त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मध्यंतरी कृषी पर्यवेक्षक पी.जे. पाटील यांनी भेट देऊन शेतकºयांना अळीला अटकाव करण्यासाठी फवारणीबाबत योग्य ते मार्गदर्शन केले होते. दरम्यान, अळीचा प्रादुर्भाव असाच राहिला तर शेतकरी मका पिकाकडे पाठ फिरवतील व त्यामुळे भविष्यात चारा टंचाईचा सामना करावा लागेल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे