शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

‘त्यांनी आधी केले आणि मग सांगितले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:16 IST

जलसिंचन व्यवस्था करुन निसर्गपूर्वक व सेंद्रिय खतांनी फुलविली शेती...

हर्षद गांधी ।निजामपूर : शेतीत कष्ट करून आणि स्वत: रासायनिक खते टाळून सेंद्रिय खतांचा वापर करून लावलेली शेती ठरते अनुकरणीय. विविध फळ, फुल झाडे लावून फुलविलेली शेती निश्चितच हेवा करावी अशी आहे. शिवसडे शिवारात जैताणे येथील दुल्लभ माळी यांनी मोठ्या कष्टाने, जिद्दीने आणि आवडीने प्रयत्न करून शेती फुलविली. कृषी मेळाव्यात जेव्हा ते बोलतात तेव्हा वाटते खरच ‘त्यांनी आधी केले आणि मग सांगितले’ हे पटते.शेताच्या उत्तरेस खुडाणे रस्ता ओलांडून पलीकडे टेकड्यांना जोडणारा बांध गतवर्षी पावसाळ्या पूर्वी लोक सहभागातून घातला. डोंगर दऱ्यात धो-धो पडणारे व रोहिणी नदीत वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून परिसरास जलसिंचन वाढविले. पाणी आडवा, पाणी जिरवा केले. पर्यावरणाच्या दृष्टीने डी.एफ.ओ. धुळे, तहसीलदार, रेंज आॅफिसर आणि ग्रामस्थांच्या सहभागाने विविध प्रकारची ५४० रोपे लावलीत. जिल्हाधिकारी यांनीही येथे येऊन पाहणी केली होती. आता उन्हाळ्यात त्या रोपांना पाणी मिळावे म्हणून ठिबक सिंचन व्यवस्थाही केली आहे. स्वत:च्या शेताबाहेर त्यांनी हे केले आहे ते विशेष महत्त्वाचे ठरते.शेतीबाहेर आहे गुरांचे शेण साठवणूक व्यवस्था. तेच शेणखत गव्हाच्या शेतात टाकले जाते. कापणीवर आलेले सेंद्रिय गव्हाचे सोन्यासारखे पिवळे धमक वाºया बरोबर डुलतांना दिसते. सेंद्रिय खते लावून आलेले कांदे वर्षभरापासून विनासड घरात साठवलेले दाखविले. आता कांद्याचे रोप तयार करीत आहेत. लगतच्या एक एकरात आहे शेवग्याची शेती आणि त्या लगत लिंबूची ४० झाडे. शेवगा फुलून शेंगा लोंबकळू लागल्यात. आता ते गांडूळ शेतीकडे वळणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना नमूद केले. निसर्गपूरक शेतीतून निरोगी व आरोग्यास विना अपायकारक पिके येतात.फळ, फुल झाडे फुललीतया शिवाय शेतात गतवर्षी जांभूळ, आंबा, चिक्कू, आवळ्याची २५ झाडे आणि सागाची ५० रोपे लावलीत. फळांचे नकदी उत्पन्न शेतकºयास बियाणे, मजुरीसाठी उपयोगात येते. १० वर्षांआधीच्या २५ आम्र वृक्षांना मोहोर फुललेत. शेतीच्या बांधावर लावलेले मोरपंखी, चाफा, कण्हेर, बांबू उंच वाढलेत. संरक्षक भिंतच झाली आहे. दुल्लभ माळी हे धुळे जिल्हा भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष आहेत. आता ते येथील शेतकऱ्यांना याद्वारे आणि विविध कार्यक्रमातून मार्गदर्शन करतात. खरे तर ‘त्यांनी आधी केले मग सांगितले’ याचे ते उदाहरणच आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे