शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

धुळ्याहून अद्याप मुंबईसाठी अद्यापही बस सुरूच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 11:21 AM

पुण्यासाठी दिवसभरात फक्त पाच बसेस

आॅनलाइन लोकमतधुळे : अनलॉकच्या चौथ्या टप्यात आंतरजिल्हा बससेवा सुरू झालेली आहे. मात्र अजूनही राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसाठी धुळ्यातून एकही बस अद्याप सुरू झालेली नाही. तर पुण्यासाठी दिवसभरात फक्त पाच बसेस आहे. त्यामानाने औरंगाबाद, नाशिकसाठी पुरेशाप्रमाणात बसेस उपलब्ध आहेत.नाशिक, पुणे हे एस.टी. महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारे मार्ग समजले जातात. अनेक आगाराच्या बसेस याच मार्गावर धावत असतात.सध्या रेल्वेसेवाही सुरू नाही. त्यामुळे अनलॉकच्या टप्यात आता प्रवाशी महामंडळाच्या बसनेच प्रवास करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. मात्र बसेसची अपुर्ण संख्येमुळे त्यांनाही नाईलाजास्तव खाजगी बससेवेकडे वळावे लागत आहे.आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत पुण्यासाठी फक्त पाच बसेस जात आह. यात अमळनेर आगाराच्या दोन, धुळे आगाराच्या दोन व शिरपूर आगाराच्या एका बसचा समावेश आहे.दरम्यान राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसाठी अद्यापही बस सुरू झालेली नाही. धुळेच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातूनही मुंबईसाठी बसेस नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या भागातील प्रवाशांना मुंबईला जायाचे असल्यास त्यांना दोन टप्यातच प्रवास करावा लागत आहे.दरम्यान चोपडा आगाराची वाशी बस सुरू असून ती फक्त ठाण्यापर्यंत जाते. तर यावल, रावेर, धुळे, नंदुरबार, अक्कलकुवा येथून कल्याणसाठी बसेस उपलब्ध आहेत. मात्र थेट मुंबईपर्यंत एकही बस नाही. त्यामुळे धुळे आगारातून रात्रीच्यावेळेला मुंबईसाठी एक बस सुरू करावी अशी मागणी आता जोर पकडू लागली आहे.नाशिकसाठी बसेस उपलब्धदरम्यान नाशिकला जाण्यासाठी सकाळी ५.३० वाजेपासूनच बसेस उपलब्ध आहेत. त्यामुळे नाशिकला जाण्यासाठी प्रवाशांना तूर्ततरी कुठलीही अडचण भासत नाही. तीच स्थिती औरंगाबादची आहे. या मार्गावरही पुरेशा प्रमाणात बस सुरू असल्याचे धुळे आगारातून सांगण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे