शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आधुनिक औषधांशिवाय पर्याय नाही - धुळ्यातील चर्चासत्रातील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 17:48 IST

राज्यस्तरीय : आयएमए व अंनिसतर्फे आयोजन, बुवाबाजीला विरोध

ठळक मुद्देधुळ्यात राज्यस्तरीय चर्चासत्रआयएमए आणि अंनिसचा पुढाकारबुवाबाजीवर कडाडून टिका

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दिवसेंदिवस बुवाबाजीचे प्रकार वाढत आहे़ त्याला कडाडून विरोध करण्यासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समिती पुढे सरसावली असताना आयएमएने देखील पुढाकार घेतला आहे़ वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक उपचार पध्दती आणि औषधांमुळे रुग्णांना निश्चित फायदा होत आहे़ भोळ्या लोकांना लुबाडण्याचा प्रकार थांबवायला हवा असा सूर अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या राज्यस्तरीय चर्चासत्रातून रविवारी निघाला़  इंडियन मेडिकल असोसिएशन व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आयएमए सभागृहात ‘वैद्यकीय क्षेत्रातील फसव्या उपचार पद्धती व शोषण विरोधी भूमिका’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र पार पडले़ यावेळी आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ़ रवी वानखेडकर, आयएमए धुळेचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप पाटील, डॉ रवींद्रनाथ टोणगावकर, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अ‍ॅड़ जे. टी. देसले, डॉ़ सुरेश वसईकर, डॉ़ सुरेश बिºहाडे, सुरेश थोरात, प्रा़ दीपक बाविस्कर आदी उपस्थित होते़ डॉ़ वानखेडकर म्हणाले, भारतीय चिकित्सा पध्दतीला विरोध नाही़ शास्त्रीय ज्ञानाप्रमाणे त्याचा अंमल झाला पाहीजे़ आजच्या स्थितीत तावून सलाखून डॉक्टर होत असताना दुसरीकडे मात्र अल्पावधीचे कोर्स घेऊन डॉक्टर तयार होत असल्याचा धोकाही त्यांनी दर्शविला़ आरोग्याचे राष्ट्रीयकरण झाले पाहीजे़ शासनाने ही आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी स्विकारण्याची आवश्यकता आहे़ डॉ़ टोणगावकर म्हणाले, आजच्या स्थितीत फसवे विज्ञान वाढत असताना ते रोखण्याची जबाबदारी स्विकारण्याची गरज आहे़ अंधश्रध्दा फोफावत असल्याने परिणामी ग्रामीण भागात मृत्यू दराची संख्या वाढत आहे़ ते रोखण्यासाठी आधुनिक उपचार पध्दती अंगिकारायल हवी़ ताणतणाव वाढत असल्याने आजाराचे प्रमाण वाढत आहे़ मन आणि आजार यांचा जवळचा संबंध आहे़ त्यामुळे सकारात्मकता बाळगावी आणि अंधश्रध्देपासून दूर रहावे असा सल्लाही त्यांनी दिला़ अविनाश पाटील यांनी वाढत असलेल्या अंधश्रध्देवर कडाडून टिका केली़ राज्यात अनेक ठिकाणी जावून चुकीचा प्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे़ काही ठिकाणी पोलिसात तक्रारी देखील दाखल केल्या आहेत़ अंधश्रध्दा निर्मुलन करण्यासाठी जिल्हावार चर्चासत्र घेत असताना आता विभागीय पातळीवर घेण्याचे नियोजन आखण्यात येईल़ शिक्षणाप्रमाणे आरोग्याचे खासगीकरण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली़ चर्चासत्राचे सुत्रसंचालन दिनेश मोरे यांनी तर प्रास्ताविक डॉ़ सुरेश वसईकर यांनी केले़ चर्चासत्राला मान्यवर उपस्थित होते़ 

टॅग्स :Dhuleधुळे